शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी आराखडा तयार करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 10:20 IST

संत्रानगरीची शान असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, असा मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी धरण सुरक्षा संघटनेला दिला.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश धरण सुरक्षा संघटनेला दिली १५ एप्रिलपर्यंत मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संत्रानगरीची शान असलेल्या अंबाझरी तलावाच्या सुरक्षेसाठी येत्या १५ एप्रिलपर्यंत सर्वसमावेशक आराखडा तयार करण्यात यावा, असा मोठा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी धरण सुरक्षा संघटनेला दिला.सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद शाहीद शरीफ जमशेद शरीफ यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून मेट्रो रेल्वेच्या बांधकामामुळे अंबाझरी तलावाला धोका निर्माण झाला, असा दावा केला होता. न्यायालयाने हा आदेश देऊन सदर याचिका निकाली काढली. अंबाझरी तलावाच्या सुरक्षा भिंतीपासून मेट्रो रेल्वेचा मार्ग गेला. त्यासाठी सुरक्षा भिंतीच्या पायथ्याशी खोल खोदकाम करून मोठमोठे पिलर उभे केले जात आहेत. धरण सुरक्षा संघटनेने सांगितलेल्या सात सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याच्या अटीवर महापालिकेकडून मेट्रो रेल्वेला अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी बांधकाम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, निश्चित आराखडा असल्याशिवाय सुरक्षाविषयक उपाययोजना केल्या जाऊ शकत नसल्याची बाब लक्षात घेता, उच्च न्यायालयाने धरण सुरक्षा संघटनेला सदर आदेश दिला. धरण सुरक्षा संघटनेकडे तज्ज्ञ अभियंते आहेत. त्यामुळे त्यांनी अंबाझरी तलावाच्या सुरक्षेकरिता आराखडा तयार करावा. यासाठी आवश्यकता वाटल्यास महापालिका, मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन व विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळातील अधिकारी व तज्ज्ञाचे सहकार्य घ्यावे, असे न्यायालयाने सांगितले. मेट्रो रेल्वे अंबाझरी तलावाच्या पायथ्याशी ३४२ मीटरपर्यंत बांधकाम करणार आहे. त्यामुळे एवढ्या परिसरातील सुरक्षाविषयक कामांचा खर्च मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनने तर, उर्वरित कामांचा खर्च राज्य सरकारने करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला. याचिकाकर्त्यातर्फे वरिष्ठ अधिवक्ता एम. जी. भांगडे व अ‍ॅड. अरुण पाटील, मेट्रो रेल्वेतर्फे वरिष्ठ अधिवक्ता एस. के. मिश्रा व कौस्तुभ देवगडे तर, सरकारतर्फे अ‍ॅड. दीपक ठाकरे यांनी बाजू मांडली.

पैशांवरून राज्य सरकारला तंबीअंबाझरी तलाव १४५ वर्षे जुना आहे. या तलावाचे संवर्धन शहराकरिता अत्यावश्यक आहे. त्यामुळे सुरक्षाविषयक कामांसाठी पैसे नसल्याचे कारण खपवून घेतले जाणार नाही. यासाठी राज्याचे मुख्य सचिव सर्वस्वी जबाबदार राहतील, अशी तंबी न्यायालयाने दिली आहे.

टॅग्स :Ambazari Lakeअंबाझरी तलाव