शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
3
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
4
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
5
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
7
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
8
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
9
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
10
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
11
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
12
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
13
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
14
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
15
"दिल्ली को दुल्हन बनाएंगे..., आमच्या समोर S-400, राफेल...!"; लश्करच्या दहशतवाद्यानं ओकली गरळ 
16
"हनुकाची पहिली मेणबत्ती...!", ऑस्ट्रेलियात ज्यूंच्या उत्सवादरम्यान झालेल्या गोळीबारावर इस्रायलची पहिली प्रतिक्रिया 
17
सत्याच्या बळावर मोदी-शाह अन् RSS ची सत्ता उलथून लावू; राहुल गांधीचे टीकास्त्र
18
IND vs SA T20: स्टेडियममध्ये दिसलेल्या 'मिस्ट्री गर्ल'ची रंगली चर्चा, जाणून घ्या 'ती' कोण?
19
सिडनी गोळीबारावर PM मोदी म्हणाले, "हा मानवतेवर हल्ला, भारत ऑस्ट्रेलियासोबत खंबीर उभा..."
20
रेस्टॉरंटमध्ये लपला..; ऑस्ट्रेलियातील गोळीबारात इंग्लंडचा माजी कर्णधार थोडक्यात बचावला
Daily Top 2Weekly Top 5

अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया

By निशांत वानखेडे | Updated: May 15, 2024 19:00 IST

केंद्रीय प्रवेश समितीची प्राचार्यांशी बैठक आज : ५४ हजार जागांसाठी हाेणार प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू हाेण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बाेर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे गुरुवार, १६ मे राेजी कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक बाेलाविण्यात आली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेसनगर येथे सकाळी ११ वाजता ही सभा हाेणार आहे. सभेला हजर राहताना मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्यासाेबत २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या संच मान्यतेची प्रत, मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन नाेंदणीची प्रत, या सत्राच्या मानधन वाटपाकरिता बॅंक खाते माहितीची नमुनाप्रत, मागील सत्रातील माहितीत बदल असल्यास त्याबद्दलची माहिती व बदल नसल्यास तसे हमीपत्र आणायचे आहे.

सीबीएसई बाेर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात ९५ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्य मंडळाचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. या आठवड्यात ताे जाहीर हाेण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. त्यामुळे या आठवड्यात प्रवेश सुरू हाेतील, अशी अपेक्षा आहे.

रिक्त जागा भरण्याचे आव्हानगेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी ५४ हजार ५०० जागांसाठी प्रवेश हाेणार आहेत. गेल्या वर्षी विज्ञान शाखेत सर्वाधिक १९,९४८ जागांवर प्रवेश झाले हाेते. त्याखाली वाणिज्य ७९२२ आणि कला शाखेचे ३४४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. एमसीव्हीसीच्या १२४९ जागा भरल्या हाेत्या. असे एकूण ३२,५६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. शेवटच्या राउंडपर्यंत जवळपास २२ हजार जागा रिक्त राहिल्या हाेत्या. या रिक्त जागा भरणे यावर्षीचेही आव्हान ठरणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर