शहरं
Join us  
Trending Stories
1
Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ
2
पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट
3
घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 
4
IND vs AUS : गिलनं पुन्हा गमावला टॉस; युवा ऑलराउंडर दुखापतीमुळे OUT; कुलदीपसह प्रसिद्ध कृष्णाला संधी
5
टाटा मोटर्सचं नाव बदललं, आता 'या' नावाने शेअर बाजारात ओळखली जाणार कंपनी; डिमर्जरनंतर झाला मोठा बदल
6
सौदी अरेबियाने पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञाला वाचविले; सीआयएच्या माजी अधिकाऱ्याचे सनसनाटी गौप्यस्फोट 
7
SIP Investment: एका वर्षात एसआयपीनं भरला खिसा, मागील दिवाळीनंतर या ५ म्युच्युअल फंडांनी दिला २०% पेक्षा जास्त रिटर्न
8
"सलमान खानसोबत चित्रपट करणार नाही"; महेश मांजरेकरांचं मोठं विधान, म्हणाले- "मी त्याला शिवी..."
9
महागठबंधन नव्हे महालठबंधन, NDA मोडणार सर्व विक्रम; PM मोदींनी फुंकले प्रचाराचे रणशिंग
10
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..
11
आजचे राशीभविष्य २५ ऑक्टोबर २०२५ : आठ राशींसाठी आजचा दिवस चांगला, इतर...
12
जान्हवी कपूर विवाहबंधनात अडकणार? अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल; लग्नाची तारीख सांगितल्याची चर्चा
13
५ दिवस पुन्हा अवकाळी; उत्तर विदर्भ वगळता राज्यभर बरसणार पावसाच्या सरी, ‘या’ ठिकाणी यलो अलर्ट
14
“...आता राज्यात ‘नैसर्गिक शेती मिशन’ राबविणार”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
15
देवाकडून मार्गदर्शन मागणे म्हणजे फसवणूक नाही; राम मंदिरचा निर्णय अवैध ठरवायची याचिका फेटाळली
16
भारत व्यापार करार दबावाखाली करत नाही; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी अमेरिकेला ठणकावले
17
लोकपाल सदस्यांना बीएमडब्ल्यू देण्यावरून राजकारण तापले; आता स्वदेशी चळवळीचे काय झाले?
18
कोणत्याही शत्रूला कमी न लेखता लष्करी जवानांनी सदैव सतर्क राहावे: संरक्षण मंत्री राजनाथसिंह
19
“तेजस्वी मुख्यमंत्री म्हणजे बिहारचे लोक मुख्यमंत्री”; पहिल्या दिवसापासूनच प्रचार धडाका
20
“राजदचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर बिहारमध्ये खऱ्या अर्थाने दिवाळी”: अमित शाह

अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया

By निशांत वानखेडे | Updated: May 15, 2024 19:00 IST

केंद्रीय प्रवेश समितीची प्राचार्यांशी बैठक आज : ५४ हजार जागांसाठी हाेणार प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू हाेण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बाेर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे गुरुवार, १६ मे राेजी कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक बाेलाविण्यात आली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेसनगर येथे सकाळी ११ वाजता ही सभा हाेणार आहे. सभेला हजर राहताना मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्यासाेबत २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या संच मान्यतेची प्रत, मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन नाेंदणीची प्रत, या सत्राच्या मानधन वाटपाकरिता बॅंक खाते माहितीची नमुनाप्रत, मागील सत्रातील माहितीत बदल असल्यास त्याबद्दलची माहिती व बदल नसल्यास तसे हमीपत्र आणायचे आहे.

सीबीएसई बाेर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात ९५ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्य मंडळाचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. या आठवड्यात ताे जाहीर हाेण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. त्यामुळे या आठवड्यात प्रवेश सुरू हाेतील, अशी अपेक्षा आहे.

रिक्त जागा भरण्याचे आव्हानगेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी ५४ हजार ५०० जागांसाठी प्रवेश हाेणार आहेत. गेल्या वर्षी विज्ञान शाखेत सर्वाधिक १९,९४८ जागांवर प्रवेश झाले हाेते. त्याखाली वाणिज्य ७९२२ आणि कला शाखेचे ३४४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. एमसीव्हीसीच्या १२४९ जागा भरल्या हाेत्या. असे एकूण ३२,५६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. शेवटच्या राउंडपर्यंत जवळपास २२ हजार जागा रिक्त राहिल्या हाेत्या. या रिक्त जागा भरणे यावर्षीचेही आव्हान ठरणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर