शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अकरावीच्या प्रवेशाची करा तयारी, आठवडाभरात सुरू हाेईल प्रक्रिया

By निशांत वानखेडे | Updated: May 15, 2024 19:00 IST

केंद्रीय प्रवेश समितीची प्राचार्यांशी बैठक आज : ५४ हजार जागांसाठी हाेणार प्रवेश

नागपूर : केंद्रीय प्रवेश समितीतर्फे इयत्ता अकरावी प्रवेशाची प्रक्रिया लवकरच सुरू हाेण्याची शक्यता आहे. नुकताच सीबीएसई बाेर्डाचा निकाल जाहीर झाला आहे आणि या आठवड्यात राज्य शिक्षण मंडळाचा निकालही जाहीर हाेण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठवडाभरात केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू हाेईल, अशी माहिती समितीच्या अधिकाऱ्यांकडून मिळत आहे.

शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार २०२४-२५ या शैक्षणिक सत्राकरिता इयत्ता ११ वीच्या कला, वाणिज्य, विज्ञान व एमसीव्हीसी अभ्यासक्रमाकरिता केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारे केले जाणार आहेत. गेल्या वर्षीच्या क्षमतेनुसार यावर्षीही महापालिका हद्दीतील कनिष्ठ महाविद्यालये व उच्च माध्यमिक विद्यालयात ११ वीच्या तिन्ही अभ्यासक्रमाच्या ५४ हजार ५६० जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे.

प्रवेश प्रक्रियेवर सविस्तर मार्गदर्शनासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयाद्वारे गुरुवार, १६ मे राेजी कनिष्ठ महाविद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयांचे मुख्याध्यापक व प्राचार्यांची बैठक बाेलाविण्यात आली आहे. शिवाजी विज्ञान महाविद्यालय, काँग्रेसनगर येथे सकाळी ११ वाजता ही सभा हाेणार आहे. सभेला हजर राहताना मुख्याध्यापक व प्राचार्यांनी आपल्यासाेबत २०२३-२४ शैक्षणिक सत्राच्या संच मान्यतेची प्रत, मागील शैक्षणिक वर्षात ऑनलाइन नाेंदणीची प्रत, या सत्राच्या मानधन वाटपाकरिता बॅंक खाते माहितीची नमुनाप्रत, मागील सत्रातील माहितीत बदल असल्यास त्याबद्दलची माहिती व बदल नसल्यास तसे हमीपत्र आणायचे आहे.

सीबीएसई बाेर्डाचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. यात ९५ टक्के विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत. या विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशासाठी लगबग सुरू झाली आहे. दुसरीकडे राज्य मंडळाचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा आहे. या आठवड्यात ताे जाहीर हाेण्याची शक्यता आहे. मात्र, गेल्या वर्षी राज्य मंडळाचा निकाल लागण्यापूर्वीच अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली हाेती. त्यामुळे या आठवड्यात प्रवेश सुरू हाेतील, अशी अपेक्षा आहे.

रिक्त जागा भरण्याचे आव्हानगेल्या वर्षीप्रमाणे यावेळीही २०२४-२५ या शैक्षणिक सत्रासाठी ५४ हजार ५०० जागांसाठी प्रवेश हाेणार आहेत. गेल्या वर्षी विज्ञान शाखेत सर्वाधिक १९,९४८ जागांवर प्रवेश झाले हाेते. त्याखाली वाणिज्य ७९२२ आणि कला शाखेचे ३४४५ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. एमसीव्हीसीच्या १२४९ जागा भरल्या हाेत्या. असे एकूण ३२,५६४ जागांवर प्रवेश निश्चित झाले हाेते. शेवटच्या राउंडपर्यंत जवळपास २२ हजार जागा रिक्त राहिल्या हाेत्या. या रिक्त जागा भरणे यावर्षीचेही आव्हान ठरणार आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर