शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा - विजयलक्ष्मी बिदरी

By आनंद डेकाटे | Updated: May 31, 2024 19:51 IST

मान्सुनपूर्व तयारीचा आढावा, वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागपूर : हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही तसेच बाधित होणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.जिल्हा व तालुकास्तरावर महसूल, जलसंपदा, आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नियंत्रण कक्ष तयार करुन तात्काळ मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून मतदकार्यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी बिदरी यांनी दिले.

नागपूर विभागातील मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, वायुसेना, आर्मी, भारतीय हवामान खाते, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षाच्या पावसाळ्यात ज्या गावांना पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली होती अशा गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आर्मी, एयरफोर्स तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ या यंत्रणांनी सज्जता ठेवावी. जिल्हाधिकारी यांनी मागणी करताच जलद गतीने बचाव कार्य सुरु करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील १२० पेक्षा जास्त गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो तसेच भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातही अशा प्रकारची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून महसूल विभागाने सज्जता ठेवावी अशी सूचना केली.

वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. त्यानुसार यंत्रणा सज्ज ठेवणे सोयीचे होईल. सिंचन विभागातर्फे नियंत्रण कक्षाद्वारे विभागातील सर्व प्रकल्पांच्या जलसाठ्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाला नियमित सादर करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.असे आहेत निर्देश- पावसासंबंधी पूर्व सूचना सर्व समाजमाध्यमाद्वारे द्यावी- साथीचे आजार होणार नाही यादृष्टिने नियोजन करावे- नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- पावसाळ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक- आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी नियमीत भेट देवून तपासणी करावी.- आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टिम तयार करुन ज्या भागात साथीच्या रोगाचे प्रमाण आढळून येईल अशा भागांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी.- आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावे.- सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांची मान्सुनच्या दृष्टिने विशेष दुरुस्ती करावी- रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष कृती आराखडता तयार करावा.- महानगरपालिकांनी नाले सफाईला प्राधान्य देवून मान्सुन येण्यापूर्वी पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही याची दक्षता घ्यावी