शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
2
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
3
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
4
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
5
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
6
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
7
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
8
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
9
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
10
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
11
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
12
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
13
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
14
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
15
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
16
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
17
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
18
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
19
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
20
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...

अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित होणाऱ्या गावांसाठी कृती आराखडा सज्ज ठेवा - विजयलक्ष्मी बिदरी

By आनंद डेकाटे | Updated: May 31, 2024 19:51 IST

मान्सुनपूर्व तयारीचा आढावा, वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागपूर : हवामान खात्याने विदर्भात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असून अतिवृष्टी व पुरामुळे जनजीवन विस्कळीत होणार नाही तसेच बाधित होणाऱ्या गावांसाठी विशेष कृती आराखडा तयार करुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिल्या.जिल्हा व तालुकास्तरावर महसूल, जलसंपदा, आरोग्य तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने नियंत्रण कक्ष तयार करुन तात्काळ मदतीसाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रणा सज्ज ठेवावी तसेच विविध विभागांमध्ये समन्वय ठेवून मतदकार्यासाठी नियोजन करावे, असे निर्देशही यावेळी बिदरी यांनी दिले.

नागपूर विभागातील मान्सूनपूर्व नियोजनाचा आढावा शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, विभागातील सर्व जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, रेल्वे, वायुसेना, आर्मी, भारतीय हवामान खाते, एनडीआरएफ, एसडीआरएफ, पोलीस, स्थानिक स्वराज्य संस्था आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षाच्या पावसाळ्यात ज्या गावांना पुराच्या पाण्यामुळे बाधित झाली होती अशा गावातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिने आर्मी, एयरफोर्स तसेच एसडीआरएफ व एनडीआरएफ या यंत्रणांनी सज्जता ठेवावी. जिल्हाधिकारी यांनी मागणी करताच जलद गतीने बचाव कार्य सुरु करता येईल. गडचिरोली जिल्ह्यातील १२० पेक्षा जास्त गावांचा पुरामुळे संपर्क तुटतो तसेच भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यातही अशा प्रकारची परिस्थीती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेवून महसूल विभागाने सज्जता ठेवावी अशी सूचना केली.

वैनगंगा नदीवरील संजय सागर तसेच तेलंगाना राज्यातील मेडीगट्टा या प्रकल्पातून पाणी सोडतांना समन्वय ठेवण्याच्या दृष्टिने आंतरराज्य बैठक आयोजित करण्यात आली आहे. या दोन्ही प्रकल्पावर नियंत्रणासाठी अधिकाऱ्याची नियुक्ती करावी. सिंचन प्रकल्पातून पाणी सोडतांना नागपूर, भंडारा, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्हाधिकाऱ्यांना पूर्वसूचना द्यावी. त्यानुसार यंत्रणा सज्ज ठेवणे सोयीचे होईल. सिंचन विभागातर्फे नियंत्रण कक्षाद्वारे विभागातील सर्व प्रकल्पांच्या जलसाठ्याबद्दलची माहिती जिल्हा प्रशासनाला नियमित सादर करावी अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.असे आहेत निर्देश- पावसासंबंधी पूर्व सूचना सर्व समाजमाध्यमाद्वारे द्यावी- साथीचे आजार होणार नाही यादृष्टिने नियोजन करावे- नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी उपाययोजना कराव्यात.- पावसाळ्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक- आरोग्य केंद्रांना जिल्हाधिकारी यांनी नियमीत भेट देवून तपासणी करावी.- आरोग्य विभागाने रॅपिड रिस्पॉन्स टिम तयार करुन ज्या भागात साथीच्या रोगाचे प्रमाण आढळून येईल अशा भागांना भेट देवून आरोग्य तपासणी करावी.- आरोग्य विभागाने नियंत्रण कक्ष सज्ज ठेवावे.- सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ते व पुलांची मान्सुनच्या दृष्टिने विशेष दुरुस्ती करावी- रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी विशेष कृती आराखडता तयार करावा.- महानगरपालिकांनी नाले सफाईला प्राधान्य देवून मान्सुन येण्यापूर्वी पावसाचे पाणी कुठेही थांबणार नाही याची दक्षता घ्यावी