शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

अपघात मृत्यू रोखण्यासाठी तीन वर्षाचा कृती आराखडा तयार करा

By आनंद डेकाटे | Updated: January 22, 2025 16:26 IST

मुख्य सचिव सुजाता सौनिक : रस्तासुरक्षा संदर्भात नागपूर-अमरावती विभागाचा आढावा

आनंद डेकाटे, नागपूर लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर  : रस्ते अपघात टाळण्यासोबतच शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी येत्या तीन वर्षाचा जिल्हानिहाय कृती आराखडा तयार करून प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी संबंधित विविध यंत्रणांना दिल्या.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात नागपूर व अमरावती विभागातील रस्ते सुरक्षा तसेच अपघात नियंत्रणासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात मुख्य सचिव सौनिक यांनी बुधवारी आढावा घेतला. रस्त्यावरील शुन्य अपघात मृत्युदर साध्य करण्यासाठी सेव्हलाईफ फाऊंडेशनसह विविध संस्थांसोबत वर्ष २०२८ पर्यंतचा कृती आराखडा तयार करावा, असेही यावेळी त्यांनी सांगितले.

यावेळी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल, नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अंकित गोयल, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्त आंचल गोयल, पोलीस उपायुक्त वाहतूक अर्चित चांडक तसेच दूरदृष्यप्रणालीद्वारे राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भीमनवार, सेव्हलाइफ फाऊंडेशनचे पियुष तिवारी उपस्थित होते.

सकाळी ६ ते १० व रात्री ६ ते ९ यावेळात अपघात टाळण्यासाठी हे करा

  • राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणी मार्गदर्शक फलक, अपघात प्रवण स्थळाच्या ठिकाणी रस्ते विभाजक, साईनबोर्ड तात्काळ लावा.
  • वेग मर्यादा, हेल्मेट व सिटबेल्ट यासारख्या आवश्यक सूचना देतांनाच नागरिकांमध्ये जनजागृती करा
  • अपघातानंतर गोल्डन अव्हरमध्ये वैद्यकीय सुविधा व उपचार तातडीने उपलब्ध होईल यादृष्टीने अशा रूग्णालयांची नोंदणी करण्याला प्राधान्य द्या
  • रस्त्यावरील तसेच फुटपाथ वरील अतिक्रमण तात्काळ काढा
  • अंधार असलेल्या रस्त्यांवर विद्युत व्यवस्था, वेग मर्यादेसाठी आवश्यक उपाययोजनेसह आवश्यक मार्गदर्शक फलक लावा
  • यासाठी परिवहन व महानगरपालिकांने विशेष दक्षता घ्यावी यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून आवश्यक निधी उपलब्ध करून घ्यावा

 विदर्भात रस्ता अपघातातात सरासरी तीन टक्के कमी परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी यावेळी नागपूर-अमरावती विभागात रस्त्यावरील अपघातांमध्ये सरासरी तीन टक्के कमी झाल्याची माहिती दिली. रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी विशेष उपाययोजना राबविण्यात येत असून रस्तेसुरक्षेला प्राधान्य देण्यात येत आहे. परिवहन विभागातर्फे यासाठी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली रस्ते सुरक्षा समितीच्या सुचनेनुसार प्राधान्याने उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

नागपूर जिल्ह्यात अपघातात २.२२ टक्केपर्यंत कमीजिल्हा पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार यांनी सादरीकरणाद्वारे नागपूर जिल्ह्यात रस्ते अपघात कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे अपघातांचे प्रमाण सातत्याने कमी होत असून २.२२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात मदत झाली आहे. यासाठी मुख्यरस्त्यांवर आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यात मदत झाली आहे. वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अर्चित चांडक यांनी शहरात २३ अपघात प्रवण स्थळांपैकी १८ ठिकाणी आवश्यक उपाययोजना केल्यामुळे सुमारे ७५ टक्क्यांपर्यंत अपघात कमी झाले आहे. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग ४७ कोराडी नाका ते भारत माता चौक, जामठा टि पॉइंट, राष्ट्रीय महामार्ग ५३ उमिया आदींचा समावेश आहे.

टॅग्स :nagpurनागपूर