शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

'थर्टी फर्स्ट'च्या जल्लोषाची तयारी जोमात : संक्रमणाची धास्ती कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 23:19 IST

'Thirty First' Preparations वर्षाचा अखेरचा दिवस अनेकांसाठी अनेकार्थाने महत्त्वाचा असतो. जुन्या वर्षाला जल्लोषाने निरोप देण्यासाठी सगळेच आतूर असतात. यंदा कोरोना संक्रमणाने या जल्लोषावर पाणी फेरले आहे. सरकारनेही मार्गदर्शिका जारी केल्या असल्याने सार्वजनिक स्थळांवर जल्लोषासंदर्भातील आयोजन होणार नाही.

ठळक मुद्देदिशानिर्देशांनी आयोजनावर फेरले पाणी

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वर्षाचा अखेरचा दिवस अनेकांसाठी अनेकार्थाने महत्त्वाचा असतो. जुन्या वर्षाला जल्लोषाने निरोप देण्यासाठी सगळेच आतूर असतात. अनेक जण कुटुंबासह बाहेर जातात तर काही जण शहरातच मित्रांसोबत थर्टी फर्स्टचा जल्लोष साजरा करतात आणि नव्या वर्षाचे स्वागत करतात. परंतु, यंदा कोरोना संक्रमणाने या जल्लोषावर पाणी फेरले आहे. सरकारनेही मार्गदर्शिका जारी केल्या असल्याने सार्वजनिक स्थळांवर जल्लोषासंदर्भातील आयोजन होणार नाही.

जल्लोषाच्या आनंदावर थोडे विरजण असले तरी सरत्या वर्षाला निरोप आणि नव्या वर्षाचे स्वागत होणारच आहे. प्रत्येकच जण आपल्या अंदाजात हा सोहळा साजरा करणार आहेत. विशेष म्हणजे, येणारे २०२१ हे वर्ष केवळ नवे वर्ष नव्हे तर ते एक स्वप्न असणार आहे. या स्वागत सोहळ्याच्या आनंदात प्रत्येकच जण २०२० मध्ये आलेल्या महामारीला आणि टाळेबंदीत कुलूपबंद अवस्थेला विसरण्यास आतूर आहेत.

नव्या मार्गदर्शिकानुसार शहरात नव्या वर्षाच्या स्वागताचे सोहळे खूप कमी होणार आहेत. इच्छुकांनी अनेक योजना आखल्या आहेत. पोलीस आणि निर्बंधाच्या दूर जाऊन हा सोहळा साजरा करण्याची तयारी सुरू झाली आहे. अनेक जण कुटुंब आणि मित्रांसोबतच घरच्याघरी आयोजन करणार आहेत.

सोशल मीडियावर नव्या संदेशांची शोधमोहिम

थर्टी फर्स्टच्या तयारीसोबतच काही लोक वेगळ्र्या अंदाजात सेलिब्रेशन करण्याची तयारी करीत आहेत. सोशल मीडियावर शुभेच्छा देण्यासाठी नव्या संदेशांची शोधमोहिम सुरू झाली आहे. नव्या वर्षाचा शुभेच्छा संदेश वर्षभर आठवणीत राहावा, असे प्रयत्न केले जात आहेत.

जल्लोष तर होणारच

सार्वजनिक आयोजनाचे निर्बंध असले तरी काही हॉटेल व्यावसायिकांनी उपाय शोधले आहेत. वेगवेगळे पॅकेजेस ग्राहकांना देण्यात येत आहेत. ३१ डिसेंबरच्या दुपारपर्यंत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन करण्यास इच्छुक असणाऱ्यांनी हॉटेलमध्ये चेक इन करायचे आहे. त्यांना पॅकेजनुसार रूम अलॉट केले जातील. रात्रीला हॉटेलमध्येच जल्लोषाचे आयोजन होईल. उत्तररात्री कुणाला घरी जायची परवानगी नसेल. दुसऱ्या दिवशी दुपारीच हॉटेलमधून चेकआऊट करावे लागणार आहे. अशा आयोजनाने दिशानिर्देशांचे पालनही होईल आणि जल्लोषही साजरा करता येणार, असा हा उपाय आहे.

टॅग्स :New Yearनववर्षnagpurनागपूर