शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका; तांदूळ महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:23 IST

मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत.

ठळक मुद्देकिलोमागे आठ रुपयाची वाढजय श्रीराम व चिन्नोरला सर्वाधिक मागणी

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत. पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका बसल्यामुळे तांदळाच्या भावात निर्माण होणारी तेजीची परंपरा यावर्षी कायम राहिली.महिनाभरात तांदळाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. विशेषत: जय श्रीराम आणि चिन्नोर तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन तांदूळ बाजारात आले तेव्हा भाव कमी होते. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ७ ते ८ रुपये किलोने भाव वधारल्याची माहिती व्यावसायिक रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. विदर्भात जय श्रीराम आणि चिन्नोर या तांदळाच्या वाणाला जास्त मागणी आहे. यंदा याच तांदळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. सध्या किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रति किलो ४५ ते ५० रुपये भाव आहेत. तर चिन्नोरचे भाव वधारले असून भाव ५५ ते ६० रुपयांदरम्यान आहेत.या वाणाच्या धानाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये क्विंटल आहेत. या तुलनेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील धान २,२०० ते २,३०० रुपयांत मिल मालकांना सहजरीत्या उपलब्ध आहेत. यावर्षी तांदळाच्या भाववाढीचा गरीब आणि सामान्यांना फटका बसत आहे.

विदर्भात ५० टक्के कमी उत्पादनधानाचे पीक नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक होते. दर्जेदार उत्पादनामुळे अन्य राज्याच्या तुलनेत भाव थोडे जास्तच आहेत. पण पाऊस कमी आल्यामुळे ५० टक्के धानाच्या पिकाला फटका बसला. याउलट भरपूर पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये धानाचे विक्रमी उत्पादन निघाले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून नागपुरात दररोज २५ ट्रकची (५०० टन) आवक आहे. याशिवाय उपरोक्त चारही राज्यातून संपूर्ण देशात तांदळाचा पुरवठा होत आहे. दोन राज्यातून नागपुरात तांदळाची आवक नसती तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत भाव आकाशाला भिडले असते, असे उमाटे यांनी स्पष्ट केले.

तूर डाळ ६० ते ७० रुपयेतूर डाळीतील मंदी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तुरीचे नवीन पीक निघाले असून चांगल्या उत्पादनाची शक्यता आहे. सध्या किरकोळमध्ये तूर डाळीचे भाव दर्जानुसार ६० ते ७० रुपये प्रति किलो आहेत. यंदा भाववाढीची शक्यता नाही.

टॅग्स :agricultureशेती