शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
3
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
4
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
5
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
6
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
7
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
8
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
9
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
10
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
11
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
12
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
13
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
14
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
15
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
16
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
17
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
18
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
19
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
20
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!

पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका; तांदूळ महागला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 11:23 IST

मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत.

ठळक मुद्देकिलोमागे आठ रुपयाची वाढजय श्रीराम व चिन्नोरला सर्वाधिक मागणी

मोरेश्वर मानापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागणी आणि पुरवठ्यात तफावत निर्माण झाल्यामुळे यावर्षी तांदळाचे भाव प्रति किलो ५ ते ८ रुपयांनी वधारले आहेत. पूर्व विदर्भात कमी पावसाचा धानाला फटका बसल्यामुळे तांदळाच्या भावात निर्माण होणारी तेजीची परंपरा यावर्षी कायम राहिली.महिनाभरात तांदळाच्या बाजारात तेजी निर्माण झाली आहे. विशेषत: जय श्रीराम आणि चिन्नोर तांदळाच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दोन महिन्यापूर्वी नवीन तांदूळ बाजारात आले तेव्हा भाव कमी होते. तेव्हापासून आतापर्यंत तब्बल ७ ते ८ रुपये किलोने भाव वधारल्याची माहिती व्यावसायिक रमेश उमाटे यांनी लोकमतशी बोलताना दिली. विदर्भात जय श्रीराम आणि चिन्नोर या तांदळाच्या वाणाला जास्त मागणी आहे. यंदा याच तांदळाच्या उत्पादनाला फटका बसला आहे. सध्या किरकोळ बाजारात दर्जानुसार प्रति किलो ४५ ते ५० रुपये भाव आहेत. तर चिन्नोरचे भाव वधारले असून भाव ५५ ते ६० रुपयांदरम्यान आहेत.या वाणाच्या धानाचे भाव २,३५० ते २,४५० रुपये क्विंटल आहेत. या तुलनेत कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील धान २,२०० ते २,३०० रुपयांत मिल मालकांना सहजरीत्या उपलब्ध आहेत. यावर्षी तांदळाच्या भाववाढीचा गरीब आणि सामान्यांना फटका बसत आहे.

विदर्भात ५० टक्के कमी उत्पादनधानाचे पीक नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक होते. दर्जेदार उत्पादनामुळे अन्य राज्याच्या तुलनेत भाव थोडे जास्तच आहेत. पण पाऊस कमी आल्यामुळे ५० टक्के धानाच्या पिकाला फटका बसला. याउलट भरपूर पावसामुळे आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये धानाचे विक्रमी उत्पादन निघाले आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटक राज्यातून नागपुरात दररोज २५ ट्रकची (५०० टन) आवक आहे. याशिवाय उपरोक्त चारही राज्यातून संपूर्ण देशात तांदळाचा पुरवठा होत आहे. दोन राज्यातून नागपुरात तांदळाची आवक नसती तर यावर्षी गतवर्षीच्या तुलनेत भाव आकाशाला भिडले असते, असे उमाटे यांनी स्पष्ट केले.

तूर डाळ ६० ते ७० रुपयेतूर डाळीतील मंदी गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही राहण्याची शक्यता आहे. यावर्षी तुरीचे नवीन पीक निघाले असून चांगल्या उत्पादनाची शक्यता आहे. सध्या किरकोळमध्ये तूर डाळीचे भाव दर्जानुसार ६० ते ७० रुपये प्रति किलो आहेत. यंदा भाववाढीची शक्यता नाही.

टॅग्स :agricultureशेती