शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

"किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी; १९७७ ची पुनरावृत्ती होऊ नये"

By आनंद डेकाटे | Updated: February 7, 2024 16:51 IST

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे विधान

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर :  निवडणूकीत जागा व मोदींचा पराभव हा नंतरचा भाग आहे. राजकारण होत राहील. परंतु, सत्तेत आल्यास काय करायचे याचा अजेंडा ठरला पाहिजे. म्हणूनच महाविकास आघाडीच्या बैठकीच्या प्रारंभापासून आपण किमान समान कार्यक्रमावर भर दिला. त्यासाठी आग्रह धरला. यासाठी वंचीतने शेतकऱ्यांच्या प्रश्नासह एकूण ३१ विषयांचा मसुदा तयार केला. आघाडीतील इतरांनीही तो तयार करावा. पुढील बैठकीत या मसुद्यावर चर्चा होईल. त्यानंतरच्या बैठकीत जागा वाटपावार चर्चा होईल, असे स्पष्ट करीत किमान समान कार्यक्रम ठरला तरच आघाडी होईल, असे सूचक विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते व माजी खासदार एड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.

बुधवारी ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. महाविकास आघाडीसोबत चर्चा वाटपावर सध्या कुठलीही चर्चा झालेली नाही. किंवा आमच्याकडून सुद्धा कुठल्याही जागेची मागणी करण्यात आलेली नाही. चर्चा होत नव्हती म्हणून १२ जागांचा मुद्दा छेडण्यात आला होता, असेही एड. प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले. 

एड. प्रकाश आंबेडकर म्हणाले, आघाडीसाठी कॉमन मिनिमम प्रोग्राम व कॉमन अंडरस्टँडिंग आवश्यक आहे. लोकशाही वाचवण्यासाठी १९७७ मध्ये असेच सर्व पक्ष एकत्र आले. सत्ताही आली. त्यानंतर कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरवण्यात आला. त्यातून अनेक पक्ष फुटले. त्याची पुनरावृत्ती  होऊ नये. म्हणून आम्ही खबरदारी घेतोय. कॉमन मिनिमम प्रोग्राम काय असेल हे ठरायला हवे. यासाठी आम्ही ३१ विषय आघाडीकडे सादर केले आहेत. त्यावर चर्चा होणार आहे.  यावर चर्चा होऊन निर्णय होईल. त्यानंतरच जागा वाटपावर चर्चा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रपरिषदेला वंचितचे उपाध्यक्ष धैर्यवर्धन फुंडकर व पूर्व विदर्भ अध्यक्ष माजी मंत्री रमेश गजबे उपस्थित होते.

शरद पवारांचे केवळ चिन्ह गेले लोकं त्यांच्यासोबतच

शरद पवार यांच्या पक्षाचे केवळ चिन्ह गेले, शरद पवार आहे तिथेच आहेत. नागरिकांना सर्व समजते. त्यामुळे लोक (मास) त्यांच्यासोबत आहे, असेही एड. आंबेडकर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर