शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना : नागपूर जिल्ह्यात कामाचा दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:09 IST

वर्ष २०१५ मध्ये झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील डांबर बेपत्ता, पुलाच्या सळाकी निघाल्या

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. दुसरीकडे शहरापासून फक्त १५ किलोमीटर परिसरातील पाच गावे अशी आहेत की, येथे वाहनाने जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या गावांना जोडणारे रस्ते नादुरुस्त आहेत. वर्ष २०१५ मध्ये या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. गिट्टी उखडली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.नागपूरपासून १५ किलोमीटर परिसरात ही पाच गावे आहेत. सर्व गावांचे एकमेकापासूनचे अंतर जेमतेम दोन किलोमीटर आहे. ग्राम सडक योजनेंतर्गत वर्ष २०१४ मध्ये वर्धा रोड ते झरी, बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या ९.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. यावर ६ कोटींचा खर्च करण्यात आला.परंतु आता या मार्गावरील गिट्टी उखडली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालविणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे लक्ष विचलित झाले की, खड्ड्यात पडून अपघात होण्याचा गंभीर धोका आहे.

उखडलेल्या पुलामुळे धोका वाढला९.५० किलोमीटर परिसरात झरीनजिक जगानन बाबा मंदिर व दर्गा आहे. मात्र येथून जवळचे असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या पुलाची अवस्था बिकट आहे. पुलावरून वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. पुलावरील सिमेंटचा थर पूर्णपणे निघाला आहे. पुलाच्या सळाकी बाहेर निघाल्या आहेत. वाहनचालकांना दूरवरूनच या सळाकी दिसतात. भीतीपोटी वाहन चालक वेग कमी करून पूल पार करतात. येथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

वर्दळीमुळे रस्ता नादुरुस्तप्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या ९.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे रस्त्याची दुर्दंशा झालेली आहे. रस्त्याचे काम करताना गुणवत्ता नियंत्रण तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नागपूर यांच्या माध्यमातून कामाचे कंत्राट देण्यात आले होते. विभागाला त्याचवेळी कामाच्या खर्चात वाढ करण्यास सांगितले होते. परंतु ६ कोटीत डांबराचा एक थर टाकण्याचा कंत्राट देण्यात आला होता. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता उखडला आहे.- श्रीनिवास, मे. गौरी कन्स्ट्रक्शन नागपूर

टॅग्स :Governmentसरकार