शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना : नागपूर जिल्ह्यात कामाचा दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 10:09 IST

वर्ष २०१५ मध्ये झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे.

ठळक मुद्देरस्त्यावरील डांबर बेपत्ता, पुलाच्या सळाकी निघाल्या

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहराचा चौफेर विकास होत आहे. शहरात सिमेंट काँक्रिट रस्त्यांचे जाळे निर्माण केले जात आहे. दुसरीकडे शहरापासून फक्त १५ किलोमीटर परिसरातील पाच गावे अशी आहेत की, येथे वाहनाने जाणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. झरी, बनवाडी, कालडोगरी, गोधनी व सालई या गावांना जोडणारे रस्ते नादुरुस्त आहेत. वर्ष २०१५ मध्ये या परिसरात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आली होती. तीन वर्षातच या रस्त्यांची दुर्दशा झालेली आहे. गिट्टी उखडली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.नागपूरपासून १५ किलोमीटर परिसरात ही पाच गावे आहेत. सर्व गावांचे एकमेकापासूनचे अंतर जेमतेम दोन किलोमीटर आहे. ग्राम सडक योजनेंतर्गत वर्ष २०१४ मध्ये वर्धा रोड ते झरी, बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या ९.५० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात आली. यावर ६ कोटींचा खर्च करण्यात आला.परंतु आता या मार्गावरील गिट्टी उखडली असून जागोजागी खड्डे पडले आहेत. या रस्त्यांवरून वाहन चालविणे म्हणजे आपला जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात वाहन चालकाचे लक्ष विचलित झाले की, खड्ड्यात पडून अपघात होण्याचा गंभीर धोका आहे.

उखडलेल्या पुलामुळे धोका वाढला९.५० किलोमीटर परिसरात झरीनजिक जगानन बाबा मंदिर व दर्गा आहे. मात्र येथून जवळचे असलेल्या सिमेंट काँक्रिटच्या पुलाची अवस्था बिकट आहे. पुलावरून वाहन चालविणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे. पुलावरील सिमेंटचा थर पूर्णपणे निघाला आहे. पुलाच्या सळाकी बाहेर निघाल्या आहेत. वाहनचालकांना दूरवरूनच या सळाकी दिसतात. भीतीपोटी वाहन चालक वेग कमी करून पूल पार करतात. येथे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.

वर्दळीमुळे रस्ता नादुरुस्तप्रधानमंत्री ग्राम सड़क योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या ९.५० किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे रस्त्याची दुर्दंशा झालेली आहे. रस्त्याचे काम करताना गुणवत्ता नियंत्रण तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था नागपूर यांच्या माध्यमातून कामाचे कंत्राट देण्यात आले होते. विभागाला त्याचवेळी कामाच्या खर्चात वाढ करण्यास सांगितले होते. परंतु ६ कोटीत डांबराचा एक थर टाकण्याचा कंत्राट देण्यात आला होता. वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता उखडला आहे.- श्रीनिवास, मे. गौरी कन्स्ट्रक्शन नागपूर

टॅग्स :Governmentसरकार