शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना; टोल वाचविण्यासाठी शोधला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 10:40 IST

नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत.

ठळक मुद्देबनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळअंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत. ‘लोकमत’चमूने या परिसराची पाहणी केली असता, पेवठा ते बनवाडी मार्गावर बनविण्यात आलेला टोल नाका वाचविण्याच्या प्रयत्नात जड वाहनांची वर्दळ या रस्त्यांवर वाढली आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत या परिसरातील रस्ते नादुरुस्त झाले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.हजारो रुपयांची बचतटोल नाक्यावर ट्रक चालकांकडून ८०० रुपये एका फेरीचे घेतले जातात. या रस्त्यावरून दिवसभरात एकाच कंपनीचे डझनभर ट्रक ये-जा करीत असतात. त्यामुळे टोलसाठी हजारो रुपये खर्च करावे लागात. परंतु जेव्हापासून झरी मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू केली तेव्हापासून हजारो रुपयांच्या टोल टॅक्सची बचत होत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.बॅरिकेडस् तोडलेटोल वाचविण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावरून जड वाहनांची झरी रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. याचा विचार करता स्थानिक नागरिकांनी बनवाडी गावाच्या वळणावर बॅरिकेडस् लावले होते. परंतु वाहन चालकांनी लोखंडी बॅरिकेडस् काढून टाकले. आता या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक बेरोक-टोक वाहतूक सुरू आहे. बनवाडी पंचायतकडे ग्रामस्थांनी याची तक्रार केली होती. परंतु पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविण्यात आलेला रस्ता नादुरुस्त झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.पाच वर्षांच्या देखभालीला अर्थच काय?प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या रस्त्यावर फलक लावण्यात आला आहे. यावर रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे लिहिले आहे. परंतु २०१४ ला बनविण्यात आलेल्या या रस्त्याची तीन वर्षातच अवस्था गंभीर झालेली आहे. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडली आहे. जागोजागी खड्डे आहेत. असे असूनही कंत्राटदार दुरुस्ती करीत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. परंतु कंत्राट देताना असलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित कंत्राटदार रस्त्याची देखभाल व दुरुस्ती का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक