शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

प्रधानमंत्री ग्राम सडक योजना; टोल वाचविण्यासाठी शोधला मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 10:40 IST

नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत.

ठळक मुद्देबनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळअंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

फहीम खान।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरापासून १५ किलोमीटर अंतरावरील बनवाडी, कालडोंगरी, गोधनी व सालई आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढल्याने रस्ते उखडले आहेत. ‘लोकमत’चमूने या परिसराची पाहणी केली असता, पेवठा ते बनवाडी मार्गावर बनविण्यात आलेला टोल नाका वाचविण्याच्या प्रयत्नात जड वाहनांची वर्दळ या रस्त्यांवर वाढली आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांत या परिसरातील रस्ते नादुरुस्त झाले असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत.हजारो रुपयांची बचतटोल नाक्यावर ट्रक चालकांकडून ८०० रुपये एका फेरीचे घेतले जातात. या रस्त्यावरून दिवसभरात एकाच कंपनीचे डझनभर ट्रक ये-जा करीत असतात. त्यामुळे टोलसाठी हजारो रुपये खर्च करावे लागात. परंतु जेव्हापासून झरी मार्गावरून वाहनांची वर्दळ सुरू केली तेव्हापासून हजारो रुपयांच्या टोल टॅक्सची बचत होत असल्याचे ट्रक चालकांनी सांगितले.बॅरिकेडस् तोडलेटोल वाचविण्याच्या प्रयत्नात या रस्त्यावरून जड वाहनांची झरी रस्त्यावरून वाहतूक सुरू झाल्याने रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. याचा विचार करता स्थानिक नागरिकांनी बनवाडी गावाच्या वळणावर बॅरिकेडस् लावले होते. परंतु वाहन चालकांनी लोखंडी बॅरिकेडस् काढून टाकले. आता या रस्त्यावरून जड वाहनांची वाहतूक बेरोक-टोक वाहतूक सुरू आहे. बनवाडी पंचायतकडे ग्रामस्थांनी याची तक्रार केली होती. परंतु पंचायतच्या पदाधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. यामुळे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून बनविण्यात आलेला रस्ता नादुरुस्त झाला आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत.पाच वर्षांच्या देखभालीला अर्थच काय?प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बनविण्यात आलेल्या रस्त्यावर फलक लावण्यात आला आहे. यावर रस्त्याची पाच वर्षे देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची असल्याचे लिहिले आहे. परंतु २०१४ ला बनविण्यात आलेल्या या रस्त्याची तीन वर्षातच अवस्था गंभीर झालेली आहे. रस्त्यावरील गिट्टी बाहेर पडली आहे. जागोजागी खड्डे आहेत. असे असूनही कंत्राटदार दुरुस्ती करीत नाही. यासंदर्भात संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. परंतु कंत्राट देताना असलेल्या अटी व शर्तीनुसार संबंधित कंत्राटदार रस्त्याची देखभाल व दुरुस्ती का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक