शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सत्यपाल महाराज यांना प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 23:09 IST

सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना मारवाडी फाऊंडेशनच्यावतीने स्व. प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. याच श्रुंखलेत सप्तखंजेरी भजनांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील संत व महापुरुषांचे परिवर्तनवादी विचार आकर्षक शैलीत लोकांपर्यंत पोहचवून समाज प्रबोधन करणारे सत्यपाल महाराज यांना २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.फाऊंडेशनच्यावतीने येत्या २१ सप्टेंबर रोजी साई सभागृह, शंकरनगर येथे सायंकाळी ५.३० वाजता आयोजित भव्य समारोहात सत्यपाल महाराज यांना हा पुरस्कार सन्मानपुर्वक प्रदान करण्यात येणार आहे. तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून यावेळी राज्याचे माजी मंत्री शशिकांत सुतार, माजी खासदार अजय संचेती प्रामुख्याने उपस्थित राहतील. लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा यांच्या अध्यक्षतेत हा समारोह होईल. प्रबोधनकार ठाकरे यांच्या परिवर्तनवादी कार्याला मानाचा मुजरा करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनतर्फे दरवर्षी त्यांच्या नावाने प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या अनेक वर्षापासून सत्यपाल महाराज यांनी अनोख्या शैलीने व सप्तखंजेरीने लोकांमध्ये परिवर्तनाचे विचार पोहचविले आहेत. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत असल्याचे फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी यांनी सांगितले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर