शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
3
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
4
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
5
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
6
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
7
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
8
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
9
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
10
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
11
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
12
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
13
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
14
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
15
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
16
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
17
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
18
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
19
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
20
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी

विश्वशांतीचे सामर्थ्य फक्त भारतात; प्रल्हाद पै यांचे भावोद्गार, विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2023 09:57 IST

जीवनविद्या मिशनच्या ‘कालदर्शिका’ व डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : जगात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना केवळ भारतच मांडू शकला आहे. कारण भारतीय संस्कृतीने जेवढे तत्त्वज्ञान विकसित केले आहे, तेवढे पाश्चात्त्य देशात नाही.  विश्वाचे कल्याण, विश्वशांती हीच आपली संस्कृती  असल्याने जगात  केवळ भारतच विश्वात शांती घडवू शकतो, असे भावोद्गार जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै यांनी काढले.

जीवनविद्या मिशनतर्फे सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विश्वशांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृहात केले होते. मार्गदर्शक म्हणून जीवनविद्या तत्त्वज्ञानाचे संस्थापक प्रल्हाद वामनराव पै उपस्थित होते. मुख्य अतिथी म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन, माजी खासदार डॉ. विजय दर्डा उपस्थित होते. 

यावेळी जीवनविद्या मिशनचे अध्यक्ष जयंत जोशी व जीवनविद्या फाउंडेशनचे अध्यक्ष दिलीप महाजन उपस्थित होते. यावेळी सद्गुरू वामनराव पै यांनी विश्वाच्या कल्याणाकरिता रचलेल्या विश्वप्रार्थनेचा जपयज्ञ करण्यात आला. त्याचबरोबर जीवनविद्या मिशनच्या ‘कालदर्शिका’ व डॉ. दिलीप पटवर्धन यांच्या ‘दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विजय दर्डा यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

सद्गुरूंनी दाखविला सुखमय जगण्याचा मार्ग- गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सद्गुरू वामनराव पै यांच्याबद्दल म्हणाले की, त्यांनी सुखमय जीवन कसे जगता येईल, हे सामान्य माणसाला, सामान्य भाषेत समजावून सांगितले. त्यांनी विश्वशांतीसाठी जी विश्वप्रार्थना रचली तो मानवतेचा विचार आहे. समाजाचे निर्माण व विश्वाच्या कल्याणाचे कार्य हे जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून सुरू आहे. हे कार्य एकप्रकारचा महायज्ञ आहे.

भगवान महावीरांचे कार्य जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून घडतेय - डॉ. दर्डा

-याप्रसंगी डॉ. विजय दर्डा यांचा प्रल्हाद पै यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी डॉ. दर्डा म्हणाले की, जग हिंसेच्या वेदना अनुभवतो आहे. सध्या सुरू असलेल्या युद्धात प्रेम आणि क्षमाची गरज आहे. भगवान महावीरांनी आपल्या जीवनकार्यात प्रेम आणि क्षमा यावरच जोर दिला. भगवान महावीरांचे कार्य जीवन विद्या मिशनच्या माध्यमातून सद्गुरू वामनराव पै यांच्यानंतर प्रल्हाद पै करीत आहेत. जीवन विद्या मिशन हे सक्षम पिढी घडविणारे कुटुंब आहे. सद्गुरू वामनराव पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मिशनने विश्वाच्या शांतीसाठी विश्वप्रार्थना जपयज्ञ करण्यासाठी नागपूरची निवड केल्याबद्दल डॉ. दर्डा यांनी त्यांचे आभार मानले.

 

टॅग्स :Prallhad Paiप्रल्हाद पै