शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे राज्यात विजेचे संकट; पॉवर एक्स्चेंजमधून रेकॉर्ड ९३४२ मेगावॉट खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 20:29 IST

Nagpur News कडक उन्ह तापू लागताच मुंबईसह राज्यभरात विजेची मागणी २७,५३० मेगावॅटवर पोहोचली. दुसरीकडे महावितरणकडे केवळ महाजनको व संयत्रांमधून केवळ १६,७१२ मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकली.

नागपूर : वीज कर्मचाऱ्यांचा दोनदिवसीय संप रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू झाला आणि सोमवारी दुपारनंतरच या संपाचा परिणाम दिसून आला. कडक उन्ह तापू लागताच मुंबईसह राज्यभरात विजेची मागणी २७,५३० मेगावॅटवर पोहोचली. दुसरीकडे महावितरणकडे केवळ महाजनको व संयत्रांमधून केवळ १६,७१२ मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकली. परिणामी, पॉवर एक्स्चेंजमधून महागड्या दरावर ९,३४२ मेगावॅट वीज खरेदी करावी लागली. साधारणमध्ये दीड ते दोन हजार मेगावॅट वीज खरेदी करावी लागते.

भारतीय मजूर संघ व मागासवर्गीय संघटना सोडून २७ कामगार संघटनांच्या संघर्ष समितीने जाहीर केलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर मेस्मा लागू करण्यात आला आहे. ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कंपनी बनविणे आणि केंद्र सरकारचा प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी कायदा याविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. यात लाईनमनपासून, तर उपकार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अधिकारी सहभागी झाले आहेत. कामगार संघटनांचा असा दावा आहे की, आता हळूहळू विजेचे उत्पादन करणारे युनिट बंद होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्य अंधारात बुडण्याची शक्यता आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यादरम्यान वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी सांगितले की, दीड महिन्यापूर्वी संपाची नोटीस दिल्यानंरही व्यवस्थापन सक्रिय झाले नाही. कामगार ग्राहकांना अडचणीत आणू इच्छित नाही. आम्ही केवळ शासनाच्या धोरणांचा विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी मंत्रालयात बैठक

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी आज, मंगळवारी दुपारी दोन वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली जाईल. संपामुळे उत्पादनावर परिणाम पडल्याची बाब ऊर्जामंत्र्यांनीसुद्धा मान्य केली. नाशिक येथील दोन युनिट बंद झाली आहेत. परंतु, कुठेही लोडशेडिंग होऊ दिले जाणार नाही. बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत, शेतकऱ्यांना शेतात पाणी हवे आहे, ऊन वाढत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन कामगार संघटनांनी संप मागे घ्यायला हवा. सकारात्मक चर्चेसाठी मी तयार आहे. राज्यातील कोणत्याही वीज कंपनीच्या खासगीकरणाला कुठलाही विचार नाही, असेही ऊर्जामंत्री राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीज