शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

संपामुळे राज्यात विजेचे संकट; पॉवर एक्स्चेंजमधून रेकॉर्ड ९३४२ मेगावॉट खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2022 20:29 IST

Nagpur News कडक उन्ह तापू लागताच मुंबईसह राज्यभरात विजेची मागणी २७,५३० मेगावॅटवर पोहोचली. दुसरीकडे महावितरणकडे केवळ महाजनको व संयत्रांमधून केवळ १६,७१२ मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकली.

नागपूर : वीज कर्मचाऱ्यांचा दोनदिवसीय संप रविवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू झाला आणि सोमवारी दुपारनंतरच या संपाचा परिणाम दिसून आला. कडक उन्ह तापू लागताच मुंबईसह राज्यभरात विजेची मागणी २७,५३० मेगावॅटवर पोहोचली. दुसरीकडे महावितरणकडे केवळ महाजनको व संयत्रांमधून केवळ १६,७१२ मेगावॅट वीज उपलब्ध होऊ शकली. परिणामी, पॉवर एक्स्चेंजमधून महागड्या दरावर ९,३४२ मेगावॅट वीज खरेदी करावी लागली. साधारणमध्ये दीड ते दोन हजार मेगावॅट वीज खरेदी करावी लागते.

भारतीय मजूर संघ व मागासवर्गीय संघटना सोडून २७ कामगार संघटनांच्या संघर्ष समितीने जाहीर केलेल्या या संपाच्या पार्श्वभूमीवर मेस्मा लागू करण्यात आला आहे. ऊर्जा क्षेत्राचे खासगीकरण, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र कंपनी बनविणे आणि केंद्र सरकारचा प्रस्तावित इलेक्ट्रिसिटी कायदा याविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. यात लाईनमनपासून, तर उपकार्यकारी अभियंत्यांपर्यंतचे अधिकारी सहभागी झाले आहेत. कामगार संघटनांचा असा दावा आहे की, आता हळूहळू विजेचे उत्पादन करणारे युनिट बंद होऊ लागले आहेत. अशा परिस्थितीत राज्य अंधारात बुडण्याची शक्यता आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सोमवारी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यादरम्यान वर्कर्स फेडरेशनचे कार्याध्यक्ष मोहन शर्मा यांनी सांगितले की, दीड महिन्यापूर्वी संपाची नोटीस दिल्यानंरही व्यवस्थापन सक्रिय झाले नाही. कामगार ग्राहकांना अडचणीत आणू इच्छित नाही. आम्ही केवळ शासनाच्या धोरणांचा विरोध करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगळवारी मंत्रालयात बैठक

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितले की, वीज कर्मचाऱ्यांच्या सर्व मागण्यांविषयी आज, मंगळवारी दुपारी दोन वाजता मंत्रालयातील माझ्या दालनात प्रत्यक्ष बैठक घेऊन सकारात्मक चर्चा केली जाईल. संपामुळे उत्पादनावर परिणाम पडल्याची बाब ऊर्जामंत्र्यांनीसुद्धा मान्य केली. नाशिक येथील दोन युनिट बंद झाली आहेत. परंतु, कुठेही लोडशेडिंग होऊ दिले जाणार नाही. बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत, शेतकऱ्यांना शेतात पाणी हवे आहे, ऊन वाढत आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन कामगार संघटनांनी संप मागे घ्यायला हवा. सकारात्मक चर्चेसाठी मी तयार आहे. राज्यातील कोणत्याही वीज कंपनीच्या खासगीकरणाला कुठलाही विचार नाही, असेही ऊर्जामंत्री राऊत यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :electricityवीज