शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून : रामदास आठवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 01:18 IST

काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.

ठळक मुद्देडॉ. ज्योती लांजेवार स्मृती दिवस कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काँग्रेसची सत्ता दलित मतांवर अवलंबून आहे. दलित मते विरोधात गेल्यानंतर काँग्रेस कधीच सत्तेवर येत नाही असे मत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी साहित्यिक डॉ. ज्योती लांजेवार यांच्या पाचव्या स्मृती दिवस कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.डॉ. ज्योती लांजेवार स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने शंकरनगर चौकातील राष्ट्रभाषा संकुलस्थित श्रीमंत बाबुराव धनवटे सभागृह येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्राचे अध्यक्ष गिरीश गांधी अध्यक्षस्थानी तर, विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष सुखदेव थोरात, ज्येष्ठ समीक्षक डॉ. वि.स. जोग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलसचिव पुरणचंद्र मेश्राम, रिपाईचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भूपेश थुलकर व माजी आमदार अनिल गोंडाने व्यासपीठावर उपस्थित होते.आपण मंत्रिपदासाठी वेगवेगळ्या पक्षांसोबत युती करीत असल्याचा आरोप होतो. त्यात काहीच तथ्य नाही. दलित समाजाच्या भल्यासाठी असे निर्णय घ्यावे लागतात. मी कुणाच्याही भूलथापांना बळी पडणारा माणूस नाही. समाजाच्या अधिकारांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे असे आठवले यांनी पुढे बोलताना सांगितले. तसेच, त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार व ज्योती लांजेवार यांचे साहित्य यावरही विस्तृत मार्गदर्शन केले.थोरात यांनी दलित साहित्याचे महत्त्व समजावून सांगितले. दलित साहित्य भव्य असून त्याचा सर्वत्र विस्तार झाला आहे. आज सर्वच भाषांतील साहित्यावर दलित साहित्याचा प्रभाव दिसून येतो. या साहित्याने अदृश्य असणाऱ्या समाजाला दृश्य केले. ज्योती लांजेवार यांनीही आपल्या साहित्यातून दलित समाजाच्या वेदना बाहेर काढल्या असे मत त्यांनी व्यक्त केले.ज्योती लांजेवार यांना स्वत:च्या समाजातूनच भरपूर आघात सहन करावे लागले होते. असे असले तरी त्यासंदर्भातील कटुता त्यांनी साहित्यात उमटू दिली नाही असे गांधी यांनी सांगितले. याप्रसंगी आठवले यांच्या हस्ते ‘वादळ उठणार आहे’ या काव्यसंग्रहाचे लोकार्पण करण्यात आले. ज्योती लांजेवार यांच्या कवितांचे संकलन या पुस्तकात आहे. जोग यांनी हा काव्यसंग्रह दलित समाज व दलित साहित्याची समीक्षा असल्याचे मत व्यक्त केले. प्रा. डॉ. अपर्णा लांजेवार-बोस यांनी प्रास्ताविक, प्रा. डॉ. अजय चिकाटे यांनी संचालन तर, महेंद्र गायकवाड यांनी आभार व्यक्त केले.मंदिर बनावे न्यायालयाच्या निर्णयातूनराम मंदिराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्धव ठाकरे मंदिरासाठी महासभा घेणार आहेत. संतांनी सरकारवर दबाव वाढविला आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी मंदिरासाठी हुंकार दिला आहे. कायदा कुणी हाती घेऊ नये, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येणार आहे. हे सरकार सर्वच जाती धर्माचे असल्याने न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून सरकारने निर्णय घ्यावा, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मांडली.रविभवन येथे झालेल्या पत्रपरिषदेत राम मंदिराच्या मुद्यावर बोलत होते. न्यायालयाच्या निर्णयापूर्वीच अध्यादेश काढणे अडचणीचे ठरेल, असे ते म्हणाले. राम मंदिराच्या जागेवर हिंदू, मुस्लीम आणि बौद्ध समाजानेही दावा केला आहे. त्यामुळे सामोपचाराने हा प्रश्न सोडवावा, अशी भूमिका त्यांनी मांडली. यावेळी पाच राज्यात सुरू असलेल्या निवडणुकीच्यासंदर्भात बोलताना ते म्हणाले की, तीन राज्यात १०० टक्के भाजप सरकार येईल. राजस्थानमध्ये काटे की टक्क र राहणार असल्याचे ते म्हणाले. रिपाइंचा २० जानेवारीला विदर्भस्तरीय मेळावा नागपुरात होणार आहे. या मेळाव्यात स्वतंत्र विदर्भाचा ठराव घेण्यात येणार असल्याचे सांगितले.

 

 

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPoliticsराजकारण