शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
2
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
3
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
4
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
5
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आज कराडात! सातारा जिल्ह्यामधील महाविकास आघाडी बाबत होणार निर्णय?
6
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
7
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
8
IPL 2026 : अय्यरसह मसल पॉवर रसेल OUT! मिनी लिलावासाठी शाहरुखच्या KKR च्या पर्समध्ये सर्वाधिक पैसा
9
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
10
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
11
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
12
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
13
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
14
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
15
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
16
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
17
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
18
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
19
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
20
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
Daily Top 2Weekly Top 5

पोस्टल दिन सप्ताह विशेष; अद्याप पोस्टमनची सायकल सुटली नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 11:39 IST

सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.

ठळक मुद्देसुविधा नाही, पेट्रोलचा भत्ताही नाही अल्प मनुष्यबळातच करावे लागते काम

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोबाईल तंत्रज्ञानाच्या, सोशल मीडियामुळे पत्राची संकल्पना आता मागे पडली आहे. ख्यालीखुशालीची पत्रे दिसत नसली तरी पोस्टमन मात्र आजही आपल्या सेवेत आहे. काळ बदलला तसे काम बदलले, पण अवस्था मात्र तशीच आहे. सर्वच क्षेत्रात तंंत्रज्ञानाचे घोडे सुसाट पळत असताना हा पोस्टमन मात्र आजही त्याच्या सायकलने दारोदार भटकताना दिसतो. कामाचा व्याप वाढला आहे, पण पत्राच्या आतुरतेमुळे पूर्वी मिळणारा आपुलकीचा आदर मात्र हरवला आहे.आधुनिक काळाच्या गरजेनुसार सर्वच क्षेत्रात मोठा बदल घडून येत असताना टपाल विभागातही बदल घडणे साहजिकच होते. दीडशे वर्षे पत्राद्वारे जनतेची सेवा करणाऱ्या या विभागाचाही व्याप आता वाढला आहे. विमा योजना आणि बचत खात्याने सुरू झालेला हा बदल पुढे स्पीड पोस्ट, पोस्ट बँक, आधार केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्राच्या कामांचीही यात भर पडली आहे. नागरिकांची पत्रे पाठविण्याची सवय कमी झाली असली, तरी कॉपोर्रेट व सरकारी कामांसाठी रजिस्टर्ड पत्रे पाठविणे बंधनकारक असल्याने काम वाढले आहे. यासह नवीन सेवांचीही जबाबदारी पोस्टमनला सांभाळावी लागते आहे. हा सगळा व्याप वाढला असताना बदलत्या काळानुसार लागणाऱ्या सुविधा मिळण्याचे भाग्य मात्र पोस्टमनला लाभले नाही, असे दिसते. अनेक पोस्टमननी नाव न सांगण्याच्या अटीवर आपल्या व्यथा मांडल्या. हा पोस्टमन आजही त्याच्या सायकलने दारोदार फिरतो. विभागातर्फे त्यांना पेट्रोलचा भत्ताही मिळत नसल्याने त्यांना सायकलने फिरण्याशिवाय पर्याय नाही. पोस्टाच्या उच्च अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विभागातर्फे २०१७ ला पार्सल डिलिव्हरी सेंटर सुरू करण्यात आले व हे पार्सल वितरण करणाºयांना पेट्रोलचा भत्ता मिळतो, मात्र इतर कामांसाठी त्यांना अशी कुठलीही सुविधा मिळत नाही. दुसरीकडे अल्प मनुष्यबळामुळेही कर्मचाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पत्रव्यवहार कमी झाले असले तरी इतर कामांचा व्याप वाढला आहे. या आवश्यकतेनुसार भरती मात्र होत नाही. एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे ५० जागांची भरती करायला वर्ष-दोन वर्ष लागतात. ही भरती होईपर्यंत नवीन बॅकलॉग तयार होतो. अनेक वर्षांपासून टपाल खात्यात मोठी भरती करण्यात आली नाही. त्यामुळे मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने कामाचा ताण कर्मचाऱ्यांवर पडतो. पोस्टमनबाबतही हीच अवस्था आहे.

२२५ पोस्टमनवर शहराचा भारकेवळ नागपूर शहराचा विचार केल्यास निर्धारीत संख्येनुसार ३३० पोस्टमनची गरज असताना केवळ २०० ते २२५ पोस्टमन कार्यरत आहेत. ही गरजही १० वर्षापूर्वी नोंदविण्यात आली होती. शहराचा प्रचंड वाढलेला व्याप बघता, या कर्मचाऱ्यांना किती अडचणी येत असतील हा विचार केलेलाच बरा. एका पोस्टमनने दिलेल्या माहितीनुसार दररोज पाठीवर २० ते ३० किलोचे वजन घेऊन पत्र, रजिस्टर, लेटरहेड, स्पीड पोस्ट वाटत फिरत असतो. २२ ते २५ इमारतींमध्ये चढ-उतर करावी लागत आहे. या इमारतींना लिफ्टची सुविधा नसल्यास अनेक मजले चढून पत्ता शोधावा लागतो. त्यामुळे तंत्रज्ञानानुसार पोस्टाच्या व्यवहारात बदल करण्यात आले असले तरी मनुष्यबळ आणि सुविधांच्या बाबतीच अजूनही १९ व्या शतकानुसारच काम होते की काय, अशी शंका उत्पन्न झाल्याशिवाय राहत नाही.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिस