शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:36 IST

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जागा वाढणार, पण सर्वात मोठा पक्ष राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.येत्या निवडणुका या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. २०१४ नंतर सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत होती. मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षात नवचैतन्य संचारले. लोकसभा निवडणुकांत २०१४ च्या तुलनेत निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येऊ शकणार नाही. दुसरीकडे विधानसभांमध्ये भाजपाला अपयश आले असले तरी, लोकसभेचे गणित वेगळे असल्यामुळे त्या निकालांचा फारसा फटका भाजपाला तेथे बसणार नाही. संपूर्ण बहुमताच्या आकडेवारीपासून भाजपा दूरच असेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील जागा निश्चितच कमी होतील. परंतु ओडिशा, पश्चिम बंगाल यांच्यासह ईशान्येकडील राज्यांत भाजपाच्या जागा वाढतील. त्यामुळे साधारणत: भाजपा दोनशेच्या आसपास जागा जिंकू शकेल. बहुमतासाठी रालोआला जागा कमी पडल्या तर तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असे यशवंत देशमुख म्हणाले.उत्तर प्रदेशच ठरणार ‘किंगमेकर’, राज्यात युतीचा फायदालोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश राज्यच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा यशवंत देशमुख यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांत ८० पैकी ७१ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. मात्र सपा-बसपा यांनी हातमिळावणी केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे, बसपासाठी सपाचे जुनेजाणते कार्यकर्ते कितपत काम करतील हा देखील एक मुद्दा आहे, असे यशवंत देशमुख म्हणाले. राज्यात भाजपा-सेना वेगवेगळे लढले असले तर नुकसान झाले असते. युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावादेखील त्यांनी केला.निवडणूक प्रचाराचा मुद्दा काय असणार ?काँग्रेसकडून राफेल, नोटाबंदी, जीएसटी यांच्यावर मागील काही काळापासून सातत्याने आवाज उचलण्यात येत आहे. तर भाजपाने विकासकार्ड खेळण्याची तयारी दाखविली आहे. पाच वर्ष भाजपाने मध्यमवर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून या वर्गाच्या अपेक्षांवर भर दिला. परंतु निवडणुका घोषित व्हायला काही दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकांच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असेल याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच पुलवामा येथील हल्ल्यानंतर जनतेमध्ये आक्रोश आहे. यावर भारताकडून कारवाई कशी होते, यावरदेखील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहू शकते, असेदेखील यशवंत देशमुख म्हणाले.प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला निश्चितच फायदाप्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा दिल्याचा पक्षाला निश्चितच फायदा पोहोचणार आहे. प्रियंका गांधी यांची कार्यप्रणाली, बोलण्याची शैली व आत्मविश्वास नक्कीच आश्वासक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील मतदारांवर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र नवमतदारांकडून कौल मिळेल का याबाबत शंका असल्याचे यशवंत देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूक