शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
2
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
3
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
4
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
5
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
6
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
7
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
8
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
9
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
10
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
11
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
12
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
13
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
14
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
15
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
16
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
17
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
18
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
19
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
20
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:36 IST

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जागा वाढणार, पण सर्वात मोठा पक्ष राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.येत्या निवडणुका या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. २०१४ नंतर सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत होती. मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षात नवचैतन्य संचारले. लोकसभा निवडणुकांत २०१४ च्या तुलनेत निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येऊ शकणार नाही. दुसरीकडे विधानसभांमध्ये भाजपाला अपयश आले असले तरी, लोकसभेचे गणित वेगळे असल्यामुळे त्या निकालांचा फारसा फटका भाजपाला तेथे बसणार नाही. संपूर्ण बहुमताच्या आकडेवारीपासून भाजपा दूरच असेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील जागा निश्चितच कमी होतील. परंतु ओडिशा, पश्चिम बंगाल यांच्यासह ईशान्येकडील राज्यांत भाजपाच्या जागा वाढतील. त्यामुळे साधारणत: भाजपा दोनशेच्या आसपास जागा जिंकू शकेल. बहुमतासाठी रालोआला जागा कमी पडल्या तर तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असे यशवंत देशमुख म्हणाले.उत्तर प्रदेशच ठरणार ‘किंगमेकर’, राज्यात युतीचा फायदालोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश राज्यच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा यशवंत देशमुख यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांत ८० पैकी ७१ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. मात्र सपा-बसपा यांनी हातमिळावणी केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे, बसपासाठी सपाचे जुनेजाणते कार्यकर्ते कितपत काम करतील हा देखील एक मुद्दा आहे, असे यशवंत देशमुख म्हणाले. राज्यात भाजपा-सेना वेगवेगळे लढले असले तर नुकसान झाले असते. युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावादेखील त्यांनी केला.निवडणूक प्रचाराचा मुद्दा काय असणार ?काँग्रेसकडून राफेल, नोटाबंदी, जीएसटी यांच्यावर मागील काही काळापासून सातत्याने आवाज उचलण्यात येत आहे. तर भाजपाने विकासकार्ड खेळण्याची तयारी दाखविली आहे. पाच वर्ष भाजपाने मध्यमवर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून या वर्गाच्या अपेक्षांवर भर दिला. परंतु निवडणुका घोषित व्हायला काही दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकांच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असेल याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच पुलवामा येथील हल्ल्यानंतर जनतेमध्ये आक्रोश आहे. यावर भारताकडून कारवाई कशी होते, यावरदेखील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहू शकते, असेदेखील यशवंत देशमुख म्हणाले.प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला निश्चितच फायदाप्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा दिल्याचा पक्षाला निश्चितच फायदा पोहोचणार आहे. प्रियंका गांधी यांची कार्यप्रणाली, बोलण्याची शैली व आत्मविश्वास नक्कीच आश्वासक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील मतदारांवर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र नवमतदारांकडून कौल मिळेल का याबाबत शंका असल्याचे यशवंत देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूक