शहरं
Join us  
Trending Stories
1
Dadar Kabutarkhana: दादरमध्ये जोरदार राडा! कबुतरखान्यावरील ताडपत्र्या आंदोलकांनी हटविल्या, पोलिसांसोबत झटापट
2
भारतीय वृत्तसंस्थेच्या पत्रकाराने भारताच्या आरोपावर प्रश्न विचारला, अन् ट्रम्प यांचे तोंड बंद झाले...
3
RBI Repo Rate: रेपो रेट म्हणजे काय रे भाऊ? तो वाढल्यानं का वाढतो तुमचा EMI? जाणून घ्या
4
Video : दुचाकीवर हेल्मेट घालणं टाळता? हा व्हिडीओ बघाल तर पुढच्यावेळी घरातूनच हेल्मेट घालून बाहेर पडाल! 
5
RBI MPC Meeting: रिझर्व्ह बँकेकडून रेपो दर 'जैसे थे', ईएमआयमध्ये कोणताही बदल होणार नाही
6
ट्रम्प यांनी जपानला फसवलंय, आता भारताची पाळी..; चिनी एक्सपर्टनं अमेरिकेचा असा केला पर्दाफाश
7
प्रियकरासोबत संबंध बनवताना प्रायव्हेट पार्टला इजा; महिलेने मुंबई पोलिसांना गंडवलं, सत्य भलतेच निघाले
8
दुसरा श्रावण गुरुवार: फक्त १० मिनिटे ‘अशी’ स्वामी सेवा करा; चिंतामुक्त व्हा, पुण्यच लाभेल!
9
वाहन विमा नाही? मग भरा पाचपट दंड...! ड्रायव्हिंग लायसन्स नूतनीकरणासाठीही नवीन अटी
10
पाकिस्तानी दहशतवादी रशियाच्या मदतीला! युक्रेनविरोधात लढत असल्याचा झेलेन्स्कींचा दावा
11
फक्त रशियचां तेल नाही, तर 'या' ३ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा तिळपापड; भारताला पुन्हा धमकी
12
'पाच महिन्यात पाच युद्ध थांबवली आता...'; ट्रम्प यांनी पुन्हा घेतले भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदीचे श्रेय
13
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
14
आजचे राशीभविष्य, ०६ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, लोकप्रियतेत वाढ; मान-सन्मानाचा दिवस
15
हिंगोली रेल्वेस्टेशनवरील उभ्या बोगीला आग; संपूर्णतः जळून खाक
16
Share Market Today: शेअर बाजाराची पुन्हा रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' स्टॉक्सचा घसरणीसह सुरू झाला व्यवहार
17
राजा रघुवंशी २.०; बॉयफ्रेंडसोबत थाटायचा होता संसार, पत्नीने पतीला जंगलात बोलावलं अन्...
18
कोणताही नवा चित्रपट नाही, तरीही सर्वात श्रीमंत; जुही चावलानं कशी बनवली ₹४,६०० कोटींची संपत्ती
19
मोठी बातमी: महादेव मुंडे खून प्रकरणातील माहिती देणाऱ्यास बक्षीस; एसआयटीकडून गोपनीयतेची हमी
20
Hiroshima Day : ६ ऑगस्ट १९४५चा 'तो' दिवस सुरू होताच 'लिटिल बॉय' पडला अन् अवघ्या जगाने विध्वंस पाहिला!

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:36 IST

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जागा वाढणार, पण सर्वात मोठा पक्ष राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.येत्या निवडणुका या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. २०१४ नंतर सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत होती. मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षात नवचैतन्य संचारले. लोकसभा निवडणुकांत २०१४ च्या तुलनेत निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येऊ शकणार नाही. दुसरीकडे विधानसभांमध्ये भाजपाला अपयश आले असले तरी, लोकसभेचे गणित वेगळे असल्यामुळे त्या निकालांचा फारसा फटका भाजपाला तेथे बसणार नाही. संपूर्ण बहुमताच्या आकडेवारीपासून भाजपा दूरच असेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील जागा निश्चितच कमी होतील. परंतु ओडिशा, पश्चिम बंगाल यांच्यासह ईशान्येकडील राज्यांत भाजपाच्या जागा वाढतील. त्यामुळे साधारणत: भाजपा दोनशेच्या आसपास जागा जिंकू शकेल. बहुमतासाठी रालोआला जागा कमी पडल्या तर तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असे यशवंत देशमुख म्हणाले.उत्तर प्रदेशच ठरणार ‘किंगमेकर’, राज्यात युतीचा फायदालोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश राज्यच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा यशवंत देशमुख यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांत ८० पैकी ७१ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. मात्र सपा-बसपा यांनी हातमिळावणी केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे, बसपासाठी सपाचे जुनेजाणते कार्यकर्ते कितपत काम करतील हा देखील एक मुद्दा आहे, असे यशवंत देशमुख म्हणाले. राज्यात भाजपा-सेना वेगवेगळे लढले असले तर नुकसान झाले असते. युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावादेखील त्यांनी केला.निवडणूक प्रचाराचा मुद्दा काय असणार ?काँग्रेसकडून राफेल, नोटाबंदी, जीएसटी यांच्यावर मागील काही काळापासून सातत्याने आवाज उचलण्यात येत आहे. तर भाजपाने विकासकार्ड खेळण्याची तयारी दाखविली आहे. पाच वर्ष भाजपाने मध्यमवर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून या वर्गाच्या अपेक्षांवर भर दिला. परंतु निवडणुका घोषित व्हायला काही दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकांच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असेल याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच पुलवामा येथील हल्ल्यानंतर जनतेमध्ये आक्रोश आहे. यावर भारताकडून कारवाई कशी होते, यावरदेखील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहू शकते, असेदेखील यशवंत देशमुख म्हणाले.प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला निश्चितच फायदाप्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा दिल्याचा पक्षाला निश्चितच फायदा पोहोचणार आहे. प्रियंका गांधी यांची कार्यप्रणाली, बोलण्याची शैली व आत्मविश्वास नक्कीच आश्वासक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील मतदारांवर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र नवमतदारांकडून कौल मिळेल का याबाबत शंका असल्याचे यशवंत देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूक