शहरं
Join us  
Trending Stories
1
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
2
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
4
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
5
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
6
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
7
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
8
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
9
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
10
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
11
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
12
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?
13
Budh Gochar 2025: दसऱ्याला बाराही राशी सौभाग्याचे सोने लुटणार, बुध गोचर भाग्य पालटणार
14
माझ्याविरुद्ध तिहेरी कट, डोनाल्ड ट्रम्प का संतापले?; ‘सिक्रेट सर्व्हिस’ला चौकशीचे आदेश
15
Nashik Crime: मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावून घेतलं अन् हल्लेखोरांना केला 'मेसेज'; नाशिकमध्ये तरुणाची कॅफेमध्ये कोयत्याने हत्या
16
आता Aadhaar अपडेट करणं होणार सोपं! घरबसल्या बदलू शकता लिंक मोबाईल नंबर, केव्हापासून मिळणार सुविधा
17
नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
18
Israel attack Yemen: इस्रायलचा येमेनवर मोठा हवाई हल्ला, राजधानी सना हादरली, हुथी बंडखोरांच्या हल्ल्यानंतर पलटवार
19
Post Office च्या 'या' स्कीममध्ये ₹१०,००० च्या गुंतवणूकीवर मिळेल ₹१,१३,६५८ चं गॅरंटीड रिटर्न, पटापट चेक करा डिटेल्स
20
रोज रात्री बॉयफ्रेंडला व्हिडीओ कॉल करायची अन् नवऱ्याच्या चुगल्या सांगायची, पण झाली अशी चूक की...

लोकसभेत त्रिशंकू निकालांचीच शक्यता : यशवंत देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 21:36 IST

पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या जागा वाढणार, पण सर्वात मोठा पक्ष राहणार नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुढील लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वच पक्षांनी जोर लावला असून, भाजपाला यंदा संपूर्ण बहुमत मिळणे कठीण आहे. काँग्रेसची आक्रमक भूमिका, महाआघाडीच्या माध्यमातून एकत्रित आलेले प्रादेशिक व राष्ट्रीय पक्ष यामुळे लोकसभा निवडणुकांचे निकाल त्रिशंकूच राहतील, असा अंदाज निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी व्यक्त केला. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने उपराजधानीत आले असताना त्यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला.येत्या निवडणुका या खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे. २०१४ नंतर सातत्याने काँग्रेसची पीछेहाट होत होती. मात्र पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर पक्षात नवचैतन्य संचारले. लोकसभा निवडणुकांत २०१४ च्या तुलनेत निश्चितच काँग्रेसच्या जागा वाढतील. मात्र सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेस समोर येऊ शकणार नाही. दुसरीकडे विधानसभांमध्ये भाजपाला अपयश आले असले तरी, लोकसभेचे गणित वेगळे असल्यामुळे त्या निकालांचा फारसा फटका भाजपाला तेथे बसणार नाही. संपूर्ण बहुमताच्या आकडेवारीपासून भाजपा दूरच असेल. उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांतील जागा निश्चितच कमी होतील. परंतु ओडिशा, पश्चिम बंगाल यांच्यासह ईशान्येकडील राज्यांत भाजपाच्या जागा वाढतील. त्यामुळे साधारणत: भाजपा दोनशेच्या आसपास जागा जिंकू शकेल. बहुमतासाठी रालोआला जागा कमी पडल्या तर तेलंगणा राष्ट्र समिती, वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतील, असे यशवंत देशमुख म्हणाले.उत्तर प्रदेशच ठरणार ‘किंगमेकर’, राज्यात युतीचा फायदालोकसभा निवडणुकांत उत्तर प्रदेश राज्यच ‘किंगमेकर’ ठरणार असल्याचा दावा यशवंत देशमुख यांनी केला. उत्तर प्रदेशमध्ये मागील निवडणुकांत ८० पैकी ७१ जागांवर भाजपाने विजय मिळविला होता. मात्र सपा-बसपा यांनी हातमिळावणी केल्यामुळे भाजपासमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानांच्या समर्थनार्थ वक्तव्य केल्यामुळे, बसपासाठी सपाचे जुनेजाणते कार्यकर्ते कितपत काम करतील हा देखील एक मुद्दा आहे, असे यशवंत देशमुख म्हणाले. राज्यात भाजपा-सेना वेगवेगळे लढले असले तर नुकसान झाले असते. युतीमुळे दोन्ही पक्षांना फायदा होईल, असा दावादेखील त्यांनी केला.निवडणूक प्रचाराचा मुद्दा काय असणार ?काँग्रेसकडून राफेल, नोटाबंदी, जीएसटी यांच्यावर मागील काही काळापासून सातत्याने आवाज उचलण्यात येत आहे. तर भाजपाने विकासकार्ड खेळण्याची तयारी दाखविली आहे. पाच वर्ष भाजपाने मध्यमवर्गाकडे फारसे लक्ष दिले नाही. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पातून या वर्गाच्या अपेक्षांवर भर दिला. परंतु निवडणुका घोषित व्हायला काही दिवसांचा अवधी असला तरी निवडणुकांच्या प्रचाराचा मुद्दा नेमका काय असेल याची दिशा अद्याप स्पष्ट झालेली नाही. त्यातच पुलवामा येथील हल्ल्यानंतर जनतेमध्ये आक्रोश आहे. यावर भारताकडून कारवाई कशी होते, यावरदेखील निवडणुकांचे चित्र अवलंबून राहू शकते, असेदेखील यशवंत देशमुख म्हणाले.प्रियंका गांधींमुळे काँग्रेसला निश्चितच फायदाप्रियंका गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा दिल्याचा पक्षाला निश्चितच फायदा पोहोचणार आहे. प्रियंका गांधी यांची कार्यप्रणाली, बोलण्याची शैली व आत्मविश्वास नक्कीच आश्वासक आहेत. विशेषत: ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील मतदारांवर त्यांचा प्रभाव पडेल. मात्र नवमतदारांकडून कौल मिळेल का याबाबत शंका असल्याचे यशवंत देशमुख म्हणाले.

 

टॅग्स :ParliamentसंसदElectionनिवडणूक