शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
4
Pune Crime: पुण्यात तरुणाची हत्या; पानटपरीवर वाद, थेट कोयताच घातला डोक्यात, हाताची बोटेही तुटली 
5
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
6
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
7
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
8
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
9
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
10
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
11
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
12
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
13
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
14
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
15
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
16
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
17
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
18
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
19
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
20
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा

सूत्रे ताब्यात द्या; ओबीसीला आरक्षण देतो, अन्यथा राजकीय संन्यास ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. वास्तविक ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार आपल्या अपयशाचं खापर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर फोडत आहे. वास्तविक राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी आणि मराठा आरक्षण गेले, असा आरोप करीत तुम्हाला जमत नसेल तर आरक्षणाच्या मोहिमेची सूत्रे आमच्या ताब्यात द्या, ओबीसीला आरक्षण देताे. नाही दिले तर राजकीय संन्यास घेईल, असे आव्हान विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ भाजपच्यावतीने शनिवारी नागपुरात व्हेरायटी चौकात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले. यावेळी फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. ओबीसी आरक्षणाचे मारेकरी कोण आहे हे लोकांना कळले पाहिजे. वाशिममधील काँग्रेसच्या आमदाराचा मुलगा आणि भंडारा जिल्हा परिषदेच्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल केली होती. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे काम ७० वर्षांनंतर मोदी सरकारने केले. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने हे काम केलेले नाही. मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ओबीसींसाठी वेगळे खाते निर्मांण केले. स्वतंत्र आर्थिक तरतूद केली. ५० टक्क्यावरीलही आरक्षण आम्ही वाचवलं होते. पण सरकारमुळे ते गेले. राज्य सरकारने एक मागासवर्गीय आयोग नेमायचा होता आणि या आयोगाला इंम्पेरिकल डाटा गोळा करण्यासाठी एक एजन्सी नेमायची होती. त्यानंतर ते एका अ‍ॅफिडेव्हीटच्या माध्यमातून न्यायालयात सादर करावयाचे होते. त्यामुळे ५० टक्क्यांच्या आतील सर्व आरक्षण अबाधित राहिले असते, असेही फडणवीस म्हणाले.

आंदोलनात आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, माजी आ. अनिल सोले, सुधाकर कोहळे, उपेंद्र कोठेकर, प्रकाश भोयर, धर्मपाल मेश्राम, अर्चना डेहनकर, संजय भेंडे, संजय बंगाले, नरेश बरडे, बाल्या बोरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. संचालन भाजपा ओबीसी मोर्चाचे शहर अध्यक्ष रमेश चोपडे यांनी केले.

....

देशात आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही?

देशाच्या प्रत्येक राज्यात ओबीसींचे आरक्षण असताना महाराष्ट्रातच का नाही असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी वेळकाढूपणा केला. १५ महिने राज्य सरकारने न्यायालयात अ‍ॅफिडेव्हिटच सादर केलं नाही. यासाठी सात वेळा तारखा घेण्यात आल्या होत्या. त्यामुळे संपूर्ण देशात केवळ महाराष्ट्रात ओबीसींचे आरक्षण संपुष्टात आले. याला केवळ राज्य सरकारच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला.

फडवीसांना पोलिसांनी ताब्यात घेतले

व्हेरायटी चौकात आयोजित चक्काजाम आंदोलनात सहभागी झालेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यासह आंदोलकांनी अटक करून घेतली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे शहर अध्यक्ष आ. प्रवीण दटके, महापौर दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, माजी आमदार सुधाकर देशमुख, अविनाश ठाकरे यांच्यासह पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांना पाेलिसांनी ताब्यात घेतले.