शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पोर्टल ठप्प, जमा नाही झालेत आयटी रिटर्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 00:27 IST

Portal jammed, no IT returns वित्तीय वर्ष २०१९-२० करिता आयकर रिटर्न जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. पण या दिवशी आयकर विभागाचे पोर्टल दिवसभर ठप्प राहिल्याने आयटी रिटर्न जमा झाले नाहीत. त्यामुळे पेनॉल्टी न घेता आयकर विभागाने रिटर्न जमा करावेत, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने (एनसीसीएल) सरकारकडे केली आहे.

ठळक मुद्दे पेनॉल्टी न घेता रिटर्न जमा करण्याची एनसीसीएलची मागणी

लोकमत  न्यूज  नेटवर्क  

नागपूर : वित्तीय वर्ष २०१९-२० करिता आयकर रिटर्न जमा करण्याची अंतिम तारीख ३१ मार्च होती. पण या दिवशी आयकर विभागाचे पोर्टल दिवसभर ठप्प राहिल्याने आयटी रिटर्न जमा झाले नाहीत. त्यामुळे पेनॉल्टी न घेता आयकर विभागाने रिटर्न जमा करावेत, अशी मागणी नागपूर चेंबर ऑफ कॉमर्सने (एनसीसीएल) सरकारकडे केली आहे.

पोर्टल ठप्प झाल्याने अनेक व्यापारी आयकर रिटर्न जमा करू शकले नाहीत. एनसीसीएलचे माजी अध्यक्ष सीए कैलाश जोगानी म्हणाले, करदात्यांनी दिवसभर पोर्टल सुरू होण्याची वाट पाहिली. ते सुरळीत न झाल्याने रिटर्न जमा करू शकलो नाहीत, असे मत अनेक व्यापारी आणि सीएंचे आहे. रिटर्न जमा न करण्याचे ठोस कारण असल्याने सरकारने या कामासाठी वेळ वाढवून द्यावी अथवा अशा करदात्यांना नोटीस देऊन रिटर्न स्वीकार करावेत. यावर कोणतीही पेनॉल्टी आकारू नये. अन्यथा यामुळे कायदेशीर अडचणी निर्माण होतील.

जोगानी म्हणाले, चेंबरने वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाचे अध्यक्ष मोदी यांना पत्र लिहून रिटर्न भरण्याची तारीख वाढविण्याची मागणी केली आहे. त्यामुळे रिटर्न जमा न करू शकलेल्या व्यापाऱ्यांना मुदत मिळेल. त्यामुळे सरकारचे नुकसान न होता फायदाच होईल, शिवाय कायदेशीर अडचणी येणार नाहीत. सरकार एकीकडे ‘विवाद से विश्वास’ यासारखी योजना आणून वाद निकालात काढू इच्छिते तर दुसरीकडे दररोज नवीन वाद निर्माण करीत आहे. अलीकडचे आयकरात कर निर्धारणाकरिता लाखों प्रकरणे आयकर कलम १४८ अंतर्गत उघडली आहेत. त्याचे कर निर्धारण आयकर विभागाला याचवर्षी पूर्ण करायचे आहे.

आधारला पॅनसोबत जोडणी,अवधी वाढविण्याचे स्वागत

जोगानी म्हणाले, आधारला पॅनसोबत जोडणी करण्याची तारीख तीन महिने वाढवून ३० जून करण्याच्या निर्णयाचे चेंबरने स्वागत केले आहे. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळेल. आधारला पॅनसोबत जोडणी केली नसती तर पॅनची ग्राह्यता १ एप्रिलला निरस्त झाली असतील. त्यामुळे करदात्यांना दिलासा मिळाला आहे. आता व्यापारी आणि करदात्यांनी तातडीने आधारला पॅनसोबत जोडणी करावी आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहन चेंबरने केले आहे.

टॅग्स :Income Taxइन्कम टॅक्स