शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या पोरी हुश्शार...

By admin | Updated: May 31, 2017 02:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे.

बारावी निकाल तिन्ही शाखांत विद्यार्थिनींचाच वरचष्मा, यंदाही यशोशिखर कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याप्रमाणेच नागपूर विभागातदेखील विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांतील गुणवंतांमध्ये मुलींचाच जास्त भरणा आहे. कला व वाणिज्य शाखेत विद्यार्थिनींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आनंद जवादे याने ९८.१५ टक्के (६३८) गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. त्याच्यापाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अस्मिता मस्के हिने ९७.८४ टक्के (६३६) गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. तिसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी दुर्गेश अग्रवाल व सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा तन्मय शेंडे हे दोघे आहेत. त्यांनी ९७.२३ टक्के (६३२) गुण मिळविले आहे. वाणिज्य शाखेत कमला नेहरू महाविद्यालयाची अंजली शहा हिने ९६.७६ टक्के (६२९) गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ९५.५ टक्के (६२५) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा ऋषी काकडे हा विद्यार्थी आहे. याच महाविद्यालयाची शिवानी पारधी हिने ९३.८५टक्के (६१०) गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. कला शाखेत मुलींचाच वरचष्मा असून ‘एलएडी’ महाविद्यालयाची जुई सगदेव व हिस्लॉप महाविद्यालयाचा अनिस बन्सोड यांनी अनुक्रमे ९४.७६ टक्के (६१६) व व ९२.७६ (६०३) गुण मिळवित प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ९२.४६ टक्के (६०१) गुणांसह हिस्लॉप महाविद्यालयाची शर्वरी जळगावकर ही आहे. नागपूर जिल्ह्यातून दिव्यांगांमधून एलएडी महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी दिविजा सुतोणे ही ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ‘एमसीव्हीसी’तून कमला नेहरू महाविद्यालयाच्या अश्विनी पराळे हिने ७९.०७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. नागपूर विभागातून ८५.६८० पैकी ७८,७९५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९६ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ३४,१६७ पैकी ३१,७४३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९२.९१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.०९ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९६.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.५४ टक्के इतका राहिला.