शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

नागपूरच्या पोरी हुश्शार...

By admin | Updated: May 31, 2017 02:44 IST

दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे.

बारावी निकाल तिन्ही शाखांत विद्यार्थिनींचाच वरचष्मा, यंदाही यशोशिखर कायम लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दरवर्षीप्रमाणे यंदादेखील बारावीच्या परीक्षेत मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. राज्याप्रमाणेच नागपूर विभागातदेखील विज्ञान, वाणिज्य, कला या तिन्ही शाखांतील गुणवंतांमध्ये मुलींचाच जास्त भरणा आहे. कला व वाणिज्य शाखेत विद्यार्थिनींनीच पहिला क्रमांक पटकाविला आहे. निकालानंतर सगळीकडेच ‘सबसे सफल, बेटी हमारी’ या शब्दांत गुणवंतांचे कौतुक सुरू होते.विज्ञान शाखेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी आनंद जवादे याने ९८.१५ टक्के (६३८) गुणांसह पहिला क्रमांक पटकाविला. त्याच्यापाठोपाठ सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी अस्मिता मस्के हिने ९७.८४ टक्के (६३६) गुणांसह दुसरा क्रमांक मिळविला. तिसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा विद्यार्थी दुर्गेश अग्रवाल व सेंट पॉल कनिष्ठ महाविद्यालयाचा तन्मय शेंडे हे दोघे आहेत. त्यांनी ९७.२३ टक्के (६३२) गुण मिळविले आहे. वाणिज्य शाखेत कमला नेहरू महाविद्यालयाची अंजली शहा हिने ९६.७६ टक्के (६२९) गुण मिळवित प्रथम क्रमांक पटकाविला आहे. ९५.५ टक्के (६२५) गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर डॉ. आंबेडकर महाविद्यालयाचा ऋषी काकडे हा विद्यार्थी आहे. याच महाविद्यालयाची शिवानी पारधी हिने ९३.८५टक्के (६१०) गुणांसह तिसरे स्थान पटकाविले. कला शाखेत मुलींचाच वरचष्मा असून ‘एलएडी’ महाविद्यालयाची जुई सगदेव व हिस्लॉप महाविद्यालयाचा अनिस बन्सोड यांनी अनुक्रमे ९४.७६ टक्के (६१६) व व ९२.७६ (६०३) गुण मिळवित प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिसऱ्या क्रमांकावर ९२.४६ टक्के (६०१) गुणांसह हिस्लॉप महाविद्यालयाची शर्वरी जळगावकर ही आहे. नागपूर जिल्ह्यातून दिव्यांगांमधून एलएडी महाविद्यालयातील कला शाखेची विद्यार्थिनी दिविजा सुतोणे ही ८८.६० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ‘एमसीव्हीसी’तून कमला नेहरू महाविद्यालयाच्या अश्विनी पराळे हिने ७९.०७ टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविला. नागपूर विभागातून ८५.६८० पैकी ७८,७९५ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. त्यांच्या उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९१.९६ टक्के इतकी आहे तर विद्यार्थ्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८६.१३ टक्के इतके आहे. नागपूर जिल्ह्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर ३४,१६७ पैकी ३१,७४३ विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. त्यांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९२.९१ टक्के इतके आहे. गेल्या वर्षीपेक्षा ही आकडेवारी १.०९ टक्क्यांनी अधिक आहे. नागपूर जिल्ह्यातून ९६.१६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. संपूर्ण जिल्ह्याचा एकूण निकाल ८९.५४ टक्के इतका राहिला.