शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर; नितीन गडकरींचे नेत्यांच्या वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 05:48 IST

मुख्यमंत्रीदेखील दु:खी असतात. हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, असे गडकरी म्हणाले.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील अस्वस्थतेबाबत परखडपणे भाष्य करत अनेक नेत्यांच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर असून येथे बहुतांश नगरसेवकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण अस्वस्थ असतो, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजस्थानच्या विधिमंडळात मी एकदा उदाहरण दिले होते. राजकारणात जवळपास प्रत्येक जण दु:खी आहे. जो नगरसेवक बनतो त्याला आमदारपदाची संधी मिळाली नाही म्हणून तो दु:खी असतो, आमदाराला मंत्रिपद मिळालेे नाही म्हणून तो दु:खी असतो, तर मंत्र्याला चांगले खाते मिळाले नाही म्हणून तो दु:खी असतो. अगदी मुख्यमंत्रीदेखील दु:खी असतात. हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, असे गडकरी म्हणाले.

जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो!

समाजात आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी समस्या असतातच. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. मात्र असे असतानाही जीवनात आनंद व समाधान निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धभूमीत हारल्यानंतर कुणीच संपत नाही, जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो. विशेषत: जास्त विचार करणारे लोक स्वत:च्या विद्वत्तेमुळे अस्वस्थ करून घेतात. त्यांच्या जीवनात समाधान नसते, अतृप्तता असते. अनेकदा अहंकार नुकसान करतो. जो आत्मपरीक्षण करतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी