शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राजकारण असंतुष्ट आत्म्यांचा महासागर; नितीन गडकरींचे नेत्यांच्या वर्मावर बोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 05:48 IST

मुख्यमंत्रीदेखील दु:खी असतात. हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, असे गडकरी म्हणाले.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणातील अस्वस्थतेबाबत परखडपणे भाष्य करत अनेक नेत्यांच्या वर्मावरच बोट ठेवले आहे. राजकारण हे असंतुष्ट आत्म्यांचा महासागर असून येथे बहुतांश नगरसेवकांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रत्येक जण अस्वस्थ असतो, असे प्रतिपादन गडकरी यांनी केले. नागपुरात एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

राजस्थानच्या विधिमंडळात मी एकदा उदाहरण दिले होते. राजकारणात जवळपास प्रत्येक जण दु:खी आहे. जो नगरसेवक बनतो त्याला आमदारपदाची संधी मिळाली नाही म्हणून तो दु:खी असतो, आमदाराला मंत्रिपद मिळालेे नाही म्हणून तो दु:खी असतो, तर मंत्र्याला चांगले खाते मिळाले नाही म्हणून तो दु:खी असतो. अगदी मुख्यमंत्रीदेखील दु:खी असतात. हायकमांड कधीही पद सोडण्याला सांगेल याची भीती असते, असे गडकरी म्हणाले.

जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो!

समाजात आपण कुठल्याही क्षेत्रात असलो तरी समस्या असतातच. आयुष्य म्हणजे संघर्ष आहे. मात्र असे असतानाही जीवनात आनंद व समाधान निर्माण करणे आवश्यक आहे. युद्धभूमीत हारल्यानंतर कुणीच संपत नाही, जो युद्धभूमीतून पळ काढतो तो हरतो. विशेषत: जास्त विचार करणारे लोक स्वत:च्या विद्वत्तेमुळे अस्वस्थ करून घेतात. त्यांच्या जीवनात समाधान नसते, अतृप्तता असते. अनेकदा अहंकार नुकसान करतो. जो आत्मपरीक्षण करतो त्याच्या आयुष्यात सकारात्मक बदल होतात, याकडे गडकरींनी लक्ष वेधले.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी