शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
2
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
3
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
4
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
5
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
6
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
7
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
8
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
10
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
11
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
12
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
13
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
14
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
15
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
16
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
17
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
18
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
19
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
20
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
Daily Top 2Weekly Top 5

तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘अविश्वासा’चे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

शरद मिरे भिवापूर : थेट जनतेतून पदारूढ झालेल्या सरपंचाोनी दोन वर्षाचा कालखंड पूर्ण करताच त्यांच्या मागे अविश्वासाचे घोडे धावत ...

शरद मिरे

भिवापूर : थेट जनतेतून पदारूढ झालेल्या सरपंचाोनी दोन वर्षाचा कालखंड पूर्ण करताच त्यांच्या मागे अविश्वासाचे घोडे धावत सुटले आहे. तालुक्यात एका पाठोपाठ दोन ठिकाणी अविश्वास पारित होऊन जनतेने सरपंचांना पायउतार केले आहे. मात्र या अविश्वासाचे ठोस कारण अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही. तालुक्यात मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन काळे यांच्या पाठोपाठ जवराबोडीचे सरपंच अशोक गोंगल यांनासुध्दा जनतेचा अविश्वास भोवला आहे. बेसूरमध्ये मात्र सदस्यांच्या अविश्वासाला ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने चोख उत्तर दिले आहे. आता या तीन ग्रामपंचायतींनंतर तालुक्यातील पुन्हा काही ग्रामपंचायतींवर अविश्वासाचे सावट आहे. यापूर्वी सदस्यांतून निवडून आलेल्या सरपंचांना सदस्यांचा विश्वास कायम ठेवणे गरजेचे होते. मात्र मध्यंतरी शासनाने थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाला सदस्यांसह जनतेचा विश्वास कमाविणे व कायम ठेवणे महत्वाचे ठरले आहे. येथेच गणित बिघडत असल्यामुळे सरपंचाला अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे. सदस्यातून निवडून येणारा सरपंच सदस्यांनी घेतलेल्या अविश्वास ठरावाच्या आधारे थेट पायउतार होतो. मात्र जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाविरोधात अविश्वास आल्यानंतर थेट पायउतार न करता, ग्रामसभेचे आयोजन व मतदान प्रक्रिया राबविली जाते.

ही आहेत कारणे

१) सरपंचाविरोधात अविश्वास आणताना ठरावात काही कारणे नमूद असतात. त्यात सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच कामे करत असल्याचे बहुतांशी नमूद असते. त्यापाठोपाठ नियोजन, वेळेत कामे पूर्ण न करणे या बाबीसुध्दा अधोरेखित असतात. असे असले तरी बिघडलेल्या 'अर्थ'कारणाचा कुठेच उल्लेख नसतो हे विशेष!

२) थेट जनतेतून निवडून आल्याच्या अविभार्वात सरपंच सदस्यांना महत्त्व देत नाही. त्यांना विश्वासात घेत नाही. त्यामुळेसुध्दा सदस्य दुखावल्या जातात. यातूनही अविश्वासाचे आगमन होते.

३) जनतेतून सरपंच निवडण्याच्या पध्दतीत सर्वात मोठी अडचण म्हणजे, अनेक ठिकाणी बहुमत एका पक्षाला आणि सरपंच दुसऱ्याच पक्षाचा अशी परिस्थिती अनेक ग्रामपंचायतीत आहे. त्यामुळेसुध्दा अविश्वास येत आहे.