शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

तालुक्यातील ग्रामपंचायतींमध्ये ‘अविश्वासा’चे राजकारण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:09 IST

शरद मिरे भिवापूर : थेट जनतेतून पदारूढ झालेल्या सरपंचाोनी दोन वर्षाचा कालखंड पूर्ण करताच त्यांच्या मागे अविश्वासाचे घोडे धावत ...

शरद मिरे

भिवापूर : थेट जनतेतून पदारूढ झालेल्या सरपंचाोनी दोन वर्षाचा कालखंड पूर्ण करताच त्यांच्या मागे अविश्वासाचे घोडे धावत सुटले आहे. तालुक्यात एका पाठोपाठ दोन ठिकाणी अविश्वास पारित होऊन जनतेने सरपंचांना पायउतार केले आहे. मात्र या अविश्वासाचे ठोस कारण अद्यापही स्पष्ट होताना दिसत नाही. तालुक्यात मानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंच नूतन काळे यांच्या पाठोपाठ जवराबोडीचे सरपंच अशोक गोंगल यांनासुध्दा जनतेचा अविश्वास भोवला आहे. बेसूरमध्ये मात्र सदस्यांच्या अविश्वासाला ग्रामस्थांनी मोठ्या विश्वासाने चोख उत्तर दिले आहे. आता या तीन ग्रामपंचायतींनंतर तालुक्यातील पुन्हा काही ग्रामपंचायतींवर अविश्वासाचे सावट आहे. यापूर्वी सदस्यांतून निवडून आलेल्या सरपंचांना सदस्यांचा विश्वास कायम ठेवणे गरजेचे होते. मात्र मध्यंतरी शासनाने थेट जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाला सदस्यांसह जनतेचा विश्वास कमाविणे व कायम ठेवणे महत्वाचे ठरले आहे. येथेच गणित बिघडत असल्यामुळे सरपंचाला अविश्वासाला सामोरे जावे लागत आहे. सदस्यातून निवडून येणारा सरपंच सदस्यांनी घेतलेल्या अविश्वास ठरावाच्या आधारे थेट पायउतार होतो. मात्र जनतेतून निवडून येणाऱ्या सरपंचाविरोधात अविश्वास आल्यानंतर थेट पायउतार न करता, ग्रामसभेचे आयोजन व मतदान प्रक्रिया राबविली जाते.

ही आहेत कारणे

१) सरपंचाविरोधात अविश्वास आणताना ठरावात काही कारणे नमूद असतात. त्यात सदस्यांना विश्वासात न घेता सरपंच कामे करत असल्याचे बहुतांशी नमूद असते. त्यापाठोपाठ नियोजन, वेळेत कामे पूर्ण न करणे या बाबीसुध्दा अधोरेखित असतात. असे असले तरी बिघडलेल्या 'अर्थ'कारणाचा कुठेच उल्लेख नसतो हे विशेष!

२) थेट जनतेतून निवडून आल्याच्या अविभार्वात सरपंच सदस्यांना महत्त्व देत नाही. त्यांना विश्वासात घेत नाही. त्यामुळेसुध्दा सदस्य दुखावल्या जातात. यातूनही अविश्वासाचे आगमन होते.

३) जनतेतून सरपंच निवडण्याच्या पध्दतीत सर्वात मोठी अडचण म्हणजे, अनेक ठिकाणी बहुमत एका पक्षाला आणि सरपंच दुसऱ्याच पक्षाचा अशी परिस्थिती अनेक ग्रामपंचायतीत आहे. त्यामुळेसुध्दा अविश्वास येत आहे.