शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:19 IST

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ या अभियानांतर्गत मंगळवारी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.काँग्रेसनगर येथील धनवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे हे होते. शिवाय महात्मा गांधी यांचे नातू व इतिहासतज्ज्ञ राजमोहन गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विलास मुत्तेमवार, भालचंद्र कानगो, धनाजी गुरव, के.के.चक्रवर्ती, दामोदर मौझो, प्रज्ञा दया पवार, डॉ.बबन तायवाडे, डॉ.प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यघटनेनुसार सर्वांना धर्म पाळण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कुठलाही धर्म नाही. काही संघटनांनी संविधानाला विरोध केला होता व त्यांचा आताही विरोध आहे. त्यांच्याशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. राजकीय लढाई लढून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत देशात मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, ओबीसी ‘टार्गेट’ होते. परंतु ‘करणी सेने’च्या निमित्ताने हे भांडण आता सवर्णांच्या दारात पोहोचले आहे. परंतु आता देशात मूलभूत लढाईची सुरुवात झाली आहे व सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले. डॉ.गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नयेदेशात आजच्या तारखेत अघोषित आणीबाणी असून, घोषित एकाधिकारशाहीचे चित्र दिसून येत आहे. दडपशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेच्या मनात रोष आहे. पद्म पुरस्कारांची निवड करताना सरकार सर्वसमावेशक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती धूळफेकच आहे. कट्टरतावाद वाढविण्यावर सरकारचा भर आहे. अशा कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नये.-प्रज्ञा दया पवार, प्राध्यापिकाजनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्नदेशात नेमका कुठला व कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा उपयोग करण्यात येत आहे. जनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्यात येत आहे. मूठभर लोकांच्या हाती विकासाची सूत्रे सोपविण्यात येत आहे. जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.-भालचंद्र कानगो, राज्य सरचिटणीस, भाकपही जागे होण्याची वेळगेल्या तीन वर्षांपासून देशात वेगळेच वातावरण असून गुलामगिरीचा नवा चक्रव्यूह निर्माण झाला आहे. आताचे असोत किंवा अगोदरचे सत्ताधारी, सर्वच लोक पुरोगामी प्रवाहांसोबत शत्रूसारखेच वागत आले आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा देत केवळ आपल्या पोळ्या शेकण्याचे काम केले. मात्र आता जनतेने जागे होण्याची वेळ आली आहे.-धनाजी गुरव,मौन तोडले पाहिजेजातीपातीमध्ये भेदभाव करणे हे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधातच आहे. असे प्रयत्न करणारे लोक हे संविधानविरोधीच आहे. संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांना न्यायालयात खेचायला हवे. आता मौन तोडले पाहिजे.-के.के.चक्रवर्तीसंविधानाचे रक्षण झाले पाहिजेदेशात सत्ताबदल झाल्यापासून जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या संविधानासोबत छेडछाड करण्याची भाषा केंद्रातील मंत्री करतात. त्यामुळे पुढील धोक्यांची सूचना मिळते आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.-दामोदर मौझो

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर