शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांचं पक्षाने ऐकलं? आमदार किशोर जोरगेवारांना पदावरून हटवलं; भाजपचा निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय
2
५० नगरपालिकांमध्ये भाजपाचा नगराध्यक्ष पण नगरसेवकांची संख्या निम्मीही नाही; २ ठिकाणी 'भोपळा'
3
नक्षलवादानंतर अमित शाहांचे नवे मिशन; 2029 पर्यंत देशातून ड्रग्स हद्दपार करण्याचा निर्धार
4
इन्फोसिसमध्ये फ्रेशर्सची चांदी! 'या' पदांसाठी मिळणार २१ लाखांचे पॅकेज; २०,००० नव्या भरतीचे संकेत
5
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
6
चंद्रपुरात भीषण अपघात! चालकाला लागलेली एक डुलकी ठरली जीवघेणी; ४ मृत्यू, ५ जण जखमी
7
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
8
UPI 'ऑटो-पे'च्या कटकटीतून सुटका! १ जानेवारीपासून लागू होणार ८ मोठे बदल; ग्राहकांचे पूर्ण नियंत्रण
9
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
10
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
11
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
12
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
13
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
14
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
15
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
16
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
17
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
18
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
19
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
20
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण : प्रकाश आंबेडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 00:19 IST

आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्दे‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ अंतर्गत जाहीर सभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आपल्या देशातील राजकीय व्यवस्था कमकुवत होत असल्याचे चित्र आहे. विविध पक्षांची अनेक नेतेमंडळी तर राजकीयदृष्ट्या चक्क ‘आॅपरेशन’च्या टेबलवर असून, त्याची सूत्रे पंतप्रधानांच्या हाती आहेत. देशात ‘ब्लॅकमेलिंग’चे राजकारण फोफावले असून यात सर्वच राजकीय पक्षांचे नेते लुळे, लंगडे व बहिरे झाले आहेत, असे मत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले. ‘दक्षिणायन’च्या ‘समास-२०१८’ या अभियानांतर्गत मंगळवारी आयोजित जाहीर सभेदरम्यान ते बोलत होते.काँग्रेसनगर येथील धनवटे महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामवंत साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे हे होते. शिवाय महात्मा गांधी यांचे नातू व इतिहासतज्ज्ञ राजमोहन गांधी, सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर, विलास मुत्तेमवार, भालचंद्र कानगो, धनाजी गुरव, के.के.चक्रवर्ती, दामोदर मौझो, प्रज्ञा दया पवार, डॉ.बबन तायवाडे, डॉ.प्रमोद मुनघाटे, अरुणा सबाने हे प्रामुख्याने उपस्थित होते. राज्यघटनेनुसार सर्वांना धर्म पाळण्याचा अधिकार आहे. मात्र राज्यघटनेनुसार आपल्या देशाचा कुठलाही धर्म नाही. काही संघटनांनी संविधानाला विरोध केला होता व त्यांचा आताही विरोध आहे. त्यांच्याशी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. राजकीय लढाई लढून काहीही उपयोग होणार नाही. यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत देशात मुस्लीम, ख्रिश्चन, दलित, आदिवासी, ओबीसी ‘टार्गेट’ होते. परंतु ‘करणी सेने’च्या निमित्ताने हे भांडण आता सवर्णांच्या दारात पोहोचले आहे. परंतु आता देशात मूलभूत लढाईची सुरुवात झाली आहे व सर्वांनी यात सहभागी व्हायला हवे, असे प्रतिपादन अ‍ॅड.आंबेडकर यांनी केले. डॉ.गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नयेदेशात आजच्या तारखेत अघोषित आणीबाणी असून, घोषित एकाधिकारशाहीचे चित्र दिसून येत आहे. दडपशाहीचे वातावरण असून सामान्य जनतेच्या मनात रोष आहे. पद्म पुरस्कारांची निवड करताना सरकार सर्वसमावेशक असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न झाला. परंतु ती धूळफेकच आहे. कट्टरतावाद वाढविण्यावर सरकारचा भर आहे. अशा कट्टरतावादाला आंबेडकरवाद्यांनी थारा देऊ नये.-प्रज्ञा दया पवार, प्राध्यापिकाजनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्नदेशात नेमका कुठला व कशा पद्धतीने संघर्ष सुरू आहे, हे समजून घेण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा उपयोग करण्यात येत आहे. जनतेमध्ये उन्माद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्यांना राष्ट्रद्रोही म्हणण्यात येत आहे. मूठभर लोकांच्या हाती विकासाची सूत्रे सोपविण्यात येत आहे. जनतेनेच पुढाकार घेण्याची वेळ आली आहे.-भालचंद्र कानगो, राज्य सरचिटणीस, भाकपही जागे होण्याची वेळगेल्या तीन वर्षांपासून देशात वेगळेच वातावरण असून गुलामगिरीचा नवा चक्रव्यूह निर्माण झाला आहे. आताचे असोत किंवा अगोदरचे सत्ताधारी, सर्वच लोक पुरोगामी प्रवाहांसोबत शत्रूसारखेच वागत आले आहेत. जनतेच्या विश्वासाला तडा देत केवळ आपल्या पोळ्या शेकण्याचे काम केले. मात्र आता जनतेने जागे होण्याची वेळ आली आहे.-धनाजी गुरव,मौन तोडले पाहिजेजातीपातीमध्ये भेदभाव करणे हे संविधानाच्या मूळ तत्त्वांच्या विरोधातच आहे. असे प्रयत्न करणारे लोक हे संविधानविरोधीच आहे. संविधानाचे संरक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. संविधानाचे उल्लंघन करणाऱ्यांना न्यायालयात खेचायला हवे. आता मौन तोडले पाहिजे.-के.के.चक्रवर्तीसंविधानाचे रक्षण झाले पाहिजेदेशात सत्ताबदल झाल्यापासून जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. देशाच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या संविधानासोबत छेडछाड करण्याची भाषा केंद्रातील मंत्री करतात. त्यामुळे पुढील धोक्यांची सूचना मिळते आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेतला पाहिजे.-दामोदर मौझो

टॅग्स :Mahatma Gandhiमहात्मा गांधीDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर