शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

प्राध्यापकांवरील कारवाई टाळण्यामागे राजकीय दबाव?

By admin | Updated: February 25, 2015 02:35 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने विविध प्रकरणांत दोषी ठरविलेल्या २० हून अधिक प्राध्यापकांवर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने विविध प्रकरणांत दोषी ठरविलेल्या २० हून अधिक प्राध्यापकांवर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. यातील काही प्राध्यापकांचे वजनदार राजकीय पक्ष तसेच राजकारण-समाजकारणाशी जुळलेल्या मोठ्या संघटनांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळेच कारवाई करण्यास प्रभारी कुलगुरु डॉ. विनायक देशपांडे व प्रकुलगुरु डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्याकडून टाळाटाळ करण्यात येत आहे अशी माहिती विद्यापीठ वर्तुळातील सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, विद्यापीठाचे प्रशासन अधिकारी चालवत आहेत की ते राजकीय पक्षांचे ‘रिमोट कंट्रोल’ झाले आहेत असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.विद्यापीठात गेल्या दोन वर्षांत परीक्षा प्रणालीत सहभागी असणाऱ्या प्राध्यापकांकडून अ़नेक चुका घडल्या. यात परीक्षाकेंद्रांवर चुकीचे पाकीट उघडून तांत्रिकदृष्ट्या पेपर फोडणे, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न विचारणे, मूल्यांकनात हलगर्जीपणा अशा आशयाचा चुकांचा समावेश होता. यातील अनेक प्रकरणे विद्यापीठाच्या शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात आली होती. समितीने केलेल्या शिफारशींच्या आधारावर ९ जानेवारी व ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत यातील काही प्राध्यापकांवर कारवाई करण्याचा निर्णय झाला. काहींना परीक्षेच्या कामातून ‘डिबार’ करण्याचादेखील निर्णय घेण्यात आला. शिवाय विद्यापीठाला परत पेपर छापणे व त्यांचे वितरण करणे यासाठी बसलेल्या आर्थिक भुर्दंडापोटी त्यांना दंडदेखील ठोठावण्यात आला. (प्रतिनिधी)‘प्रोटेक्ट’ करण्यामागे दडले काय?या निर्णयानंतर विद्यापीठाने या प्राध्यापकांना तातडीने ‘नोटीस’ बजावणे अपेक्षित होते. परंतु प्राध्यापकांना ‘प्रोटेक्ट’ करण्याची भूमिका डॉ.देशपांडे यांनी घेतली. परीक्षा मंडळाच्या बैठकीत कारवाई करण्यासंदर्भात अध्यक्ष असलेल्या डॉ.देशपांडे यांनी होकार दर्शविला होता. त्यानुसार एकमताने निर्णयदेखील घेण्यात आला. या बैठकीचे ‘मिनिट्स’देखील मान्य करण्यात आले. परंतु नंतर यातील राजकीय ‘कनेक्शन’ लक्षात आल्यानंतर हा मुद्दा व्यवस्थापन परिषदेत मांडू, असे ते म्हणाले. विद्यापीठ कायद्याच्या कलम १४ (५) नुसार परीक्षा मंडळाच्या निर्णयाची अंमलबजावणी करणे त्यांना आवश्यक आहे. जर प्रभारी कुलगुरूंना शिस्तपालन शिफारसी मान्य नव्हत्या तर त्यासंदर्भात त्यांनी बैठकीतच आपली मतभिन्नता नोंदवायला हवी होती. परंतु तेव्हा मौन बाळगून बाहेर वेगळी भूमिका घेणे यामागे स्पष्टपणे राजकीय दबाव दिसून येत आहे.