शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय

By योगेश पांडे | Updated: February 21, 2023 07:00 IST

Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे.

ठळक मुद्देसोने-चांदी चमकविण्याची बतावणी करून ‘हातचलाखी’वृद्ध, महिलांना करताहेत ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. सोने-चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून या टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करत असून या माध्यमातून सव्वा महिन्यात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गत सव्वा महिन्यात नागपुरात यासंदर्भातील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणांत दागिन्यांची कागदपत्रे नसल्याने तक्रारदार समोरच आलेले नाहीत. संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात. साधारणत: दुपारच्या सुमारासच हे लोक येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच आहेत, तेथे हे जातात. अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करत ते ‘डेमो’ देतात. यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल’ व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात. साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात. येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो. लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात. त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात. समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असताना हे लोक घरातून काढता पाय घेतात. पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

सव्वा महिन्यात चार गुन्हे

अनेक जणांकडे दागिने किंवा भांड्यांच्या पावत्या नसतात. त्यामुळे या टोळीने फसवणूक केल्यावरदेखील लोक पोलिसांत तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. गत सव्वा महिन्यात राणाप्रतापनगरातील अरुण रानडे (७०), सीताबर्डीतील कांता डंभारे (७५), वाडीतील रंगराव तायडे (६८), हुडकेश्वरमधील मनीषा चौधरी (४८) या चौघांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा दावा

- अगोदर हे आरोपी संबंधित भागाची ‘रेकी’ करतात.

- दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात.

- ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.

- ‘सर्व्हे’ सुरू असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी