शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय

By योगेश पांडे | Updated: February 21, 2023 07:00 IST

Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे.

ठळक मुद्देसोने-चांदी चमकविण्याची बतावणी करून ‘हातचलाखी’वृद्ध, महिलांना करताहेत ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. सोने-चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून या टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करत असून या माध्यमातून सव्वा महिन्यात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गत सव्वा महिन्यात नागपुरात यासंदर्भातील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणांत दागिन्यांची कागदपत्रे नसल्याने तक्रारदार समोरच आलेले नाहीत. संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात. साधारणत: दुपारच्या सुमारासच हे लोक येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच आहेत, तेथे हे जातात. अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करत ते ‘डेमो’ देतात. यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल’ व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात. साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात. येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो. लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात. त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात. समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असताना हे लोक घरातून काढता पाय घेतात. पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

सव्वा महिन्यात चार गुन्हे

अनेक जणांकडे दागिने किंवा भांड्यांच्या पावत्या नसतात. त्यामुळे या टोळीने फसवणूक केल्यावरदेखील लोक पोलिसांत तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. गत सव्वा महिन्यात राणाप्रतापनगरातील अरुण रानडे (७०), सीताबर्डीतील कांता डंभारे (७५), वाडीतील रंगराव तायडे (६८), हुडकेश्वरमधील मनीषा चौधरी (४८) या चौघांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा दावा

- अगोदर हे आरोपी संबंधित भागाची ‘रेकी’ करतात.

- दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात.

- ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.

- ‘सर्व्हे’ सुरू असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी