शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
6
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
7
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
8
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
9
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
10
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
11
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
12
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
13
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
14
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
15
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
16
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
17
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
18
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
19
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
20
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव

नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय

By योगेश पांडे | Updated: February 21, 2023 07:00 IST

Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे.

ठळक मुद्देसोने-चांदी चमकविण्याची बतावणी करून ‘हातचलाखी’वृद्ध, महिलांना करताहेत ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. सोने-चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून या टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करत असून या माध्यमातून सव्वा महिन्यात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गत सव्वा महिन्यात नागपुरात यासंदर्भातील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणांत दागिन्यांची कागदपत्रे नसल्याने तक्रारदार समोरच आलेले नाहीत. संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात. साधारणत: दुपारच्या सुमारासच हे लोक येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच आहेत, तेथे हे जातात. अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करत ते ‘डेमो’ देतात. यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल’ व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात. साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात. येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो. लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात. त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात. समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असताना हे लोक घरातून काढता पाय घेतात. पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

सव्वा महिन्यात चार गुन्हे

अनेक जणांकडे दागिने किंवा भांड्यांच्या पावत्या नसतात. त्यामुळे या टोळीने फसवणूक केल्यावरदेखील लोक पोलिसांत तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. गत सव्वा महिन्यात राणाप्रतापनगरातील अरुण रानडे (७०), सीताबर्डीतील कांता डंभारे (७५), वाडीतील रंगराव तायडे (६८), हुडकेश्वरमधील मनीषा चौधरी (४८) या चौघांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा दावा

- अगोदर हे आरोपी संबंधित भागाची ‘रेकी’ करतात.

- दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात.

- ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.

- ‘सर्व्हे’ सुरू असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी