शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

नागपुरात दागिने लुटणारी ‘पॉलिश गँग’ सक्रिय

By योगेश पांडे | Updated: February 21, 2023 07:00 IST

Nagpur News सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे.

ठळक मुद्देसोने-चांदी चमकविण्याची बतावणी करून ‘हातचलाखी’वृद्ध, महिलांना करताहेत ‘टार्गेट’

योगेश पांडे

नागपूर : सोने-चांदी-पितळेचे दागिने व भांडी चमकवून देण्याची बतावणी करून फसवणूक करणारी ‘पॉलिश गँग’ नागपुरात सक्रिय झाली आहे. दुपारच्या वेळी शहरातील विविध भागांत जाऊन वृद्ध व महिलांना ‘टार्गेट’ करण्यावर या टोळीचा भर आहे. सोने-चांदीचे दागिने चमकविण्याचा दावा करून या टोळीतील लोक ‘हातचलाखी’ करत असून या माध्यमातून सव्वा महिन्यात लाखो रुपयांचे दागिने लंपास केले आहेत. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. गत सव्वा महिन्यात नागपुरात यासंदर्भातील चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर काही प्रकरणांत दागिन्यांची कागदपत्रे नसल्याने तक्रारदार समोरच आलेले नाहीत. संबंधित टोळीचे सदस्य एखाद्या पावडर कंपनीचे नाव सांगून घरात प्रवेश करतात. साधारणत: दुपारच्या सुमारासच हे लोक येतात. विशेषत: ज्या घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक किंवा महिलाच आहेत, तेथे हे जातात. अगोदर भांडी चमकवून देण्याचा दावा करत ते ‘डेमो’ देतात. यादरम्यान त्यांच्याजवळील ‘केमिकल’ व खऱ्या पावडरचा उपयोग करून ते खरोखर संबंधित भांडी चमकवून देतात. त्यामुळे समोरच्या व्यक्तीचादेखील विश्वास बसतो. त्यानंतर हे लोक एखादे चांदीचे लहानसे भांडे मागतात व त्यालादेखील काही वेळात डोळ्यासमोर चमकवून देतात. साहजिकच समोरील व्यक्तीचा विश्वास आणखी वाढतो व त्यानंतर सोने-चांदीचे दागिनेदेखील त्यांना देण्यात येतात. येथूनच टोळीचा खरा खेळ सुरू होतो. लाल रंगाची पावडर पाण्यात टाकून ते मिश्रण तयार करतात व त्यात दागिने टाकतात. त्यानंतर एखाद्या डब्यात किंवा भांड्यात ते पाणी व दागिने टाकून ते गॅसवर गरम करायला सांगतात व पाच मिनिटांनी दागिने पाण्यातून बाहेर काढण्याची सूचना करतात. समोरील व्यक्ती त्यात व्यस्त असताना हे लोक घरातून काढता पाय घेतात. पाच मिनिटांनंतरच आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येते. मात्र तोपर्यंत उशीर झालेला असतो.

सव्वा महिन्यात चार गुन्हे

अनेक जणांकडे दागिने किंवा भांड्यांच्या पावत्या नसतात. त्यामुळे या टोळीने फसवणूक केल्यावरदेखील लोक पोलिसांत तक्रार करण्यासाठी समोर येत नाही. गत सव्वा महिन्यात राणाप्रतापनगरातील अरुण रानडे (७०), सीताबर्डीतील कांता डंभारे (७५), वाडीतील रंगराव तायडे (६८), हुडकेश्वरमधील मनीषा चौधरी (४८) या चौघांची अशाच प्रकारे फसवणूक झाली. त्यांनी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर अनोळखी आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘उजाला’, ‘पतंजली’चे प्रतिनिधी असल्याचा दावा

- अगोदर हे आरोपी संबंधित भागाची ‘रेकी’ करतात.

- दुपारची वेळ पाहून घरासमोर जाऊन आवाज देतात किंवा बेल वाजवितात.

- ‘उजाला’ किंवा ‘पतंजली’ या कंपन्यांचे प्रतिनिधी असल्याचा दावा करतात.

- ‘सर्व्हे’ सुरू असल्याचे सांगत मोफत भांडे चमकवून देण्याची बतावणी करतात.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी