शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

दादागीरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला व्यापाऱ्यांनी घेरले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 00:17 IST

traders tense मोमीनपुरा येेथे बुधवारी लॉकडाऊनचा विराेध करीत असलेल्या स्थानिक दुकानदारांचा राग तहसील पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर निघाला.

ठळक मुद्देशिवीगाळ, पैसे मागत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये होता रोष : मोमीनपुऱ्यातील चुडी गल्लीतील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मोमीनपुरा येेथे बुधवारी लॉकडाऊनचा विराेध करीत असलेल्या स्थानिक दुकानदारांचा राग तहसील पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर निघाला. दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास मोमीनपुऱ्यातील चुडी गल्लीत तहसीलचे पोलीस कॉन्स्टेबल समीर शेख यांच्या अभद्र व्यवहारामुळे संतापलेल्या स्थानिक दुकानदारांनी त्यांना घेरले. मारामारीपर्यंत गोष्ट गेली. परंतु, काही लोकांनी मध्यस्थी करीत पोलीस कर्मचाऱ्यास तेथून बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, मोमीनपुरा येथील दुकानदार युनियन लॉकडाऊनचा विराेध करीत होते. त्याच पार्श्वभूमीवर काही लोक आपली दुकाने उघडू लागली, तर काही दुकाने साफसफाईसाठी उघडण्यात आली होती. यादरम्यान पोलीस कर्मचारी शेख हे मोमीनपुरा येथे लस्सी विकत असलेल्या एका वृद्धास शिवीगाळ करू लागले. यानंतर दुसरा एक पोलीस कर्मचारी मोबाईल दुकानदारासह अभद्र व्यवहार करू लागला तसेच इतर दुकानदारांसोबतचही दादागिरी करीत चुडी गल्लीत पोहोचला. पोलिसांच्या या व्यवहाराने संतापलेल्या दुकानदारांनी पोलीस कर्मचाऱ्यास घेरले. पाहता-पाहता वाद वाढला. दुकानदारांचे म्हणणे होते की, लॉकडाऊन लागल्यापासून पोलीस कर्मचाऱ्यांच्या व्यवहारामुळे दुकानदार त्रस्त होते. त्यामुळेच वाद वाढला.

मोठ्या हॉटेलवर पोलीस मेहरबानी

नागरिकांचे म्हणणे आहे की, मोमीनपुरा परिसरात अनेक हॉटेल रात्रभर सुरू असतात. त्यांच्यावर पोलिसांची मेहरबानी आहे. दुसरीकडे लहान दुकानदारांना त्रास दिला जात आहे. काही दिवसांपूर्वी गरीब नवाज मशीदजवळ याच पोलीस कर्मचाऱ्याने एका टपरीवरील सामान फेकले होते. त्याचप्रकारे दुकानदारांचे सामान फेकणे, शिवीगाळ करणे, पैसे मागणे या कारणांमुळे दुकानदार त्रस्त आहेत.

दुकानदारांना शिवीगाळ करणे, पैसे मागणे बरोबर आहे का?

मोमीनपुरा दुकानदार ट्रेडर्स असोसिएशनचे माजी सचिव व कपडा व्यवसायी जावेद अहमद अंसारी यांनी सांगितले की, लॉकडाऊन दरम्ययान दुकानदारांना त्रास देणे, शिवीगाळ करणे आणि अभद्र व्यवहार होत असल्यामुळेच लोक संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर संतापले होते. दुकानदारांचे सामान फेकणे आणि पैशाची मागणी करणे रोजचीच बाब झाली होती. एका पोलीस कर्मचाऱ्याचे असे वागणे बरोबर आहे का? त्यामुळे दुकानदारही संतापले होते.

दुकानदारांना रोजच त्रास दिला जात होता

मोमीनपुरा दुकानदार ट्रेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष व स्थानिक दुकानदार जावेद अख्तर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे अगोदरच लोक आर्थिक संकटात आहेत. अशा परिस्थितीत कुणा दुकानदाराने साफसफाईसाठी दुकान उघडले तरी त्याला पोलीस कर्मचारी धमकावू लागले. लॉकडाऊनमध्ये तर दुकानदारांना रोजच त्रास दिला जात आहे. वयोवृद्ध नागरिकांना शिवीगाळ करणे आणि कुणावरही हात उगारणे हे तर पोलिसांसाठी रोजचीच बाब झाली आहे. सहनशक्तीचीही एक सीमा असते. अभद्र व्यवहारामुळेच दुकानदारांनी पोलीस कर्मचाऱ्यास घेरले.

व्यवहार चांगला नाही, पण पैशांची गोष्ट चुकीची आहे

कॉन्स्टेबल समीर शेख यांच्या व्यवहारामुळे दुकानदारांमध्ये रोष आहे. परंतु, पैसे मागण्याची गोष्ट बिलकूल चुकीची आहे. लोकांचा काही गैरसमज झाला होता. त्यामुळे वाद वाढला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध मिळालेल्या तक्रारीबाबत विचार केला जाईल.

- जयेश भंडारकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गांधीबाग

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीस