शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

'हमसे क्या भूल हुई', अनेकांचा प्रश्न; पोलीस दलात धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2020 15:22 IST

पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.

ठळक मुद्देटॉप-टू-बॉटम बदलीचाच विषय

नरेश डोंगरे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य पोलिस दलाला सध्या एकाच विषयाने ढवळून काढले आहे. धावपळ वाढवली आहे. पीसी (पोलीस कॉन्स्टेबल) टू डीजीपी (पोलीस महासंचालक) अशा सर्वांच्याच मुखात असलेला हा विषय म्हणजे बदलीचा (स्थानांतरण) विषय होय. बदलीच्या या विषयामुळे संबंधितांकडून कोरोनाचीही चर्चा तात्पुरती बाजूला सारली जात आहे.

दरवर्षी जून-जुलैपर्यंत राज्य पोलीस दलातील सार्वत्रिक बदल्या व्हायच्या. बदलीसाठी पात्र असलेल्या पोलिसांच्या पाल्यांच्या शाळा-महाविद्यालय प्रवेशाचा मुद्दा लक्षात घेऊन जून-जुलैचा कालावधी निश्चित करण्यात आला होता. माजी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात जून-जुलैला फाटा देऊन बदलीचा विषय लांबणीवर टाकण्यात आला. त्यांच्यानंतर सरकार बदलले आणि पोलिसांच्या बदलीचा विषय आणखीनच क्लिष्ट ठरला. त्यात कोरोनानेही नाक खुपसले. बहुतांश पोलिस अधिकाऱ्यांच्या नावावर आणि ठिकाणावर एकमत होत नसल्याने वारंवार बदलीच्या मुद्याला बगल दिली जाऊ लागली. अखेर सप्टेंबर महिन्यात हा विषय मार्गी लागला. २ आणि ३ तसेच १७ सप्टेंबरला बदलीसाठी पात्र असणाऱ्यांपैकी बहुतांश अधिकाऱ्यांची बदली झाली. अनेकांना पदोन्नतीही मिळाली.अनेक ‘गॅस’वरगुरुवारी जाहीर झालेल्या यादीनुसार, पोलीस अधीक्षक, उपायुक्तांपासून तो अतिरिक्त महासंचालकांपर्यंतच्या अनेक अधिकाऱ्यांना वेटिंगवर (पोलिसांच्या भाषेत गॅसवर) ठेवण्यात आल्यामुळे ते ‘हमसे क्या भूल हुई’, असा प्रश्न करीत आहेत. दुसरे म्हणजे, डीवायएसपी, पोलीस निरीक्षक आणि पोलिस कर्मचाऱ्यांच्या ‘निवड-नियुक्ती’चा मुद्दाही शिल्लक आहे. त्यासाठी त्यांनी आता धावपळ सुरू केली आहे. नागपुरात नऊ हजारांपैकी सुमारे एक हजार अधिकारी-कर्मचारी बदलीस पात्र आहेत. त्यातील काहींनी आपापल्या परीने लॉबिंगही चालविले आहे. काहींनी पॅकिंगही सुरू केले आहे.मुख्यालयातून २४ तासांचा अल्टिमेटमशहर पोलीस मुख्यालयातून १७ सप्टेंबरला स्थानिक वरिष्ठांना पत्र पाठविण्यात आले. बदलीसाठी पात्र असलेल्या तुमच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांचा सेवापट पोलीस मुख्यालयात विशेष दूतामार्फत सादर करा, असे या पत्रात नमूद आहे. सेवापटाच्या यादीत संबंधित कर्मचाऱ्याला मिळालेले रिवॉर्ड, शिक्षा आणि अन्य बाबींचाही उल्लेख करण्याच्या स्पष्ट सूचना आहेत. १८ सप्टेंबरच्या सकाळी ११ वाजेपर्यंत सेवापटाची यादी पोलीस मुख्यालयात सादर न झाल्यास संबंधित लिपिकाला जबाबदार धरण्यात येईल, अशी तंबीही या पत्रातून देण्यात आली आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस