शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

विदर्भात नियुक्तीबाबत पोलीस अधिकारी उदासीन

By admin | Updated: January 23, 2017 01:50 IST

राज्यातील पोलीस अधिकारी नागपूर किंवा विदर्भातील नियुक्तीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत.

 बदलीच्या १५ दिवसानंतरही जागा रिक्तच : अतिरिक्त प्रभारींच्या भरवशावर काम सुरू जगदीश जोशी   नागपूर राज्यातील पोलीस अधिकारी नागपूर किंवा विदर्भातील नियुक्तीला फारसे गांभीर्याने घेत नाहीत. ते येथे येणे पसंतच करीत नाहीत. सरकारचे धोरण आणि इच्छा याचा कुठलाही परिणाम त्यांच्यावर होत नाही. नुकत्याच झालेल्या पोलिसांच्या बदल्या याचे ताजे उदाहरण आहे. मुख्यमंत्र्यांच्या शहरातच हे चित्र असेल तर दुसऱ्या शहरांमध्ये काय सुरू असेल हे दिसून येते. गृह विभागाने ५ जानेवारी रोजी सहपोलीस आयुक्त संतोष रस्तोगी यांची राज्य अन्वेषण विभाग (एसआयडी) मुंबई येथे बदली केली होती. त्यांच्या जागेवर कुणालाही नियुक्ती देण्यात आलेली नाही. महापालिका निवडणुका जवळ असल्याने गृह विभागाने ९ जानेवारीला रस्तोगी यांच्या जागेवर नक्षलवादीविरोधी अभियानाचे महानिरीक्षक शिवाजी बोडखे यांची बदली केली होती. बोडखे यांच्या जागेवर शैलेश शेलार यांना पाठविण्यात आले. या आदेशानंतर रस्तोगी यांना शहर पोलिसातून मुक्त करण्यात आले. त्यांनी तातडीने मुंबईत पदभारही स्वीकारला. परंतु बदली आदेश होऊन १५ दिवस लोटल्यानंतरही सहपोलीस आयुक्तांचे पद मात्र रिक्त आहे. त्यांच्या जागेवर पाठविण्यात आलेले शिवाजी बोडखे शहरातच आहे. परंतु त्यांच्या ठिकाणी पाठविण्यात आलेल्या शेलारे यांनी अजुनही पदभार न स्वीकारल्याने बोडखे त्यांच्या ठिकाणी कायम आहेत. नक्षलविरोधी अभियानची जबाबदारी महत्त्वाची आहे. निवडणुकांदरम्यान नक्षली कारवाया वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बोडखे हे त्यांच्या जागेवर कुणी आले तरच संयुक्त पोलीस आयुक्तांचे पद स्वीकारू शकतात. आता सर्व काही शेलारे यांच्यावर अवलंबून आहे. ९ जानेवारी रोजी लोहमार्ग पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांचीही ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून बदली करण्यात आली. बलकवडे यांच्या जागेवर साहेबराव पाटील यांना पाठविण्यात आले. बलकवडे यांनी १० जानेवारी रोजी ग्रामीण पोलीस अधीक्षकाचा पदभार स्वीकारला. परंतु साहेबराव पाटील मात्र अजूनही आलेले नाही. ५ जानेवारीला गृह विभागाने अप्पर आयुक्त प्रतापसिंह पाटणकर यांना महानिरीक्षक म्हणून पदोन्नती देत विशेष महानिरीक्षक बनविले होते. त्यांच्या जागेवर कुणालाही नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांनी सुद्धा २१ डिसेंबर २०१६ रोजी म्हणजेच बदलीच्या केवळ १५ दिवसांपूर्वीच अप्पर आयुक्ताचे पद स्वीकारले होते. पाटणकर यांनी सुद्धा १० जानेवरी रोजी कार्यमुक्त होऊन विशेष महानिरीक्षकाची जबाबदारी स्वीकारली. सध्या शहर पोलिसात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पाच जागा रिक्त आहेत. यात संयुक्त आयुक्त, तीन अप्पर आयुक्त आणि एक उपायुक्ताचे पद आहे.(प्रतिनिधी) निवडणुकीचीही नाही चिंता सहपोलीस आयुक्त हे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचे प्रमुख असतात. मनपा निवडणुका जवळ आल्या आहेत. राजकीय पक्षांसाठी निवडणुका या प्रतिष्ठेचा असतात. गुन्हेगारही निवडणकांमध्ये सक्रिय होतात. आचारसंहिता लागलेली आहे. त्यामुळे आता बदली करता येणार नाही. अशा परिस्थितीत पोलिसांची मुख्य भूमिका आहे. शहरातील पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पद रिक्त असणे हे चिंतेचे कारण आहे. सहपोलीस आयुक्तांचा अतिरिक्त पदभार रंजनकुमार शर्मा यांच्याकडे आहे. डीसीपी शर्मा स्वत: दीड वर्षांपासून गुन्हे शाखेच्या आयुक्ताचा अतिरिक्त कारभार पाहत आहेत.