शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी उद्ध्वस्त केले नागपुरातील गुन्हेगारांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 23:55 IST

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकुख्यात आबूचे पानठेले हटविले : गुन्हेशाखेच्या पोलिसांची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी झोन क्रमांक ४ अंतर्गत इमामवाडा, सक्करदरा, नंदनवन, अजनी तसेच हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. निवडणुक समोर असल्यामुळे सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरात ठिकठिकाणी पानठेले, आमलेट आणि चायनीजचे ठेले आहेत. हे ठेले गुन्हेगारांशिवाय दारुड्यांची पसंतीची बैठक आहे. अनेक खाद्यपदार्थ विक्रेता दारुचीही विक्री करतात. येथे दारू पिताना अनेक गुन्ह्यांच्या योजना आखल्या जातात. स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक त्यांच्या विरुद्ध कारवाई करीत नाही. यामुळे गुन्हेगार बिनधास्तपणे येथे वावरतात. परंतु काही घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. अनेक घटनांमध्ये ही बाब समोर आली आहे. यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक अतिक्रमण पथकाच्या मदतीने कारवाई करीत आहे. गुरुवारी सायंकाळी सक्करदरा ठाण्यांतर्गत ताजाबाद येथून कारवाईला सुरुवात झाली. ताजाबादमध्ये कुख्यात गुन्हेगार आबू खानचा भाऊ शेख फारूकने रस्त्याच्या कडेला शासकीय जमिनीवर मोठमोठे पानठेले तयार केले होते. पोलिसांनी दोन्ही पानठेल्यांना उद्ध्वस्त करून सामान जप्त केले. आबू एमडीच्या तस्करीत तुरुंगात आहे. एमडी तस्करी जारी असल्याच्या माहितीमुळे पोलिसांनी पानठेला त्वरित हटविण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांची स्तुती केली आहे. सक्करदराच्या माटे वाईन शॉपजवळील हातठेल्यावर मद्यपींची गर्दी राहते. तेथेही ठेले हटवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नंदनवनमध्ये गुरुदेवनगर चौक येथील स्वराज वाईनशॉपजवळ बंद दुकानासमोर ग्राहक दारु पित होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी अनेक ठिकाणी करून अतिक्रमणधारकांना पळवून लावले. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे. या अड्ड्यांमुळे महिलांना खूप त्रास होत होता. यामुळे त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सत्यवान माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, किरण चौगुले, सहायक उपनिरीक्षक रमेश उमाठे, हवालदार देवेंद्र चव्हाण, सचिन तुमसरे, श्रीकांत मारवाडे यांनी केली.कारवाई सुरु राहणारगुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले की, अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. निवडणुक पुढे असल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारांवर मोठा परिणाम होणार आहे. गुन्हे शाखेचा पदभार सांभाळल्यानंतर राजमाने यांनी अनेक बदल घडविले आहेत.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसEnchroachmentअतिक्रमण