शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पोलिसांनी उद्ध्वस्त केले नागपुरातील गुन्हेगारांचे अड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 23:55 IST

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे.

ठळक मुद्देकुख्यात आबूचे पानठेले हटविले : गुन्हेशाखेच्या पोलिसांची मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुन्हेगारांचे अड्डे झालेले पानठेले आणि खाद्यपदार्थांची दुकाने संपविण्याची मोहीम सुरू केली आहे. पोलिसांनी विशेष पथक तयार करून महापालिकेच्या मदतीने अशा अड्ड्यांविरुद्ध कारवाईला सुरुवात केली आहे. गुरुवारी सायंकाळी झोन क्रमांक ४ अंतर्गत इमामवाडा, सक्करदरा, नंदनवन, अजनी तसेच हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात आले. निवडणुक समोर असल्यामुळे सुरु करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली आहे.शहरात ठिकठिकाणी पानठेले, आमलेट आणि चायनीजचे ठेले आहेत. हे ठेले गुन्हेगारांशिवाय दारुड्यांची पसंतीची बैठक आहे. अनेक खाद्यपदार्थ विक्रेता दारुचीही विक्री करतात. येथे दारू पिताना अनेक गुन्ह्यांच्या योजना आखल्या जातात. स्थानिक पोलीस आणि महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक त्यांच्या विरुद्ध कारवाई करीत नाही. यामुळे गुन्हेगार बिनधास्तपणे येथे वावरतात. परंतु काही घटना घडल्यानंतर पोलिसांना त्याचे परिणाम भोगावे लागतात. अनेक घटनांमध्ये ही बाब समोर आली आहे. यामुळे गुन्हे शाखा पोलिसांनी विशेष पथक तयार केले आहे. हे पथक अतिक्रमण पथकाच्या मदतीने कारवाई करीत आहे. गुरुवारी सायंकाळी सक्करदरा ठाण्यांतर्गत ताजाबाद येथून कारवाईला सुरुवात झाली. ताजाबादमध्ये कुख्यात गुन्हेगार आबू खानचा भाऊ शेख फारूकने रस्त्याच्या कडेला शासकीय जमिनीवर मोठमोठे पानठेले तयार केले होते. पोलिसांनी दोन्ही पानठेल्यांना उद्ध्वस्त करून सामान जप्त केले. आबू एमडीच्या तस्करीत तुरुंगात आहे. एमडी तस्करी जारी असल्याच्या माहितीमुळे पोलिसांनी पानठेला त्वरित हटविण्याचा निर्णय घेतला. या कारवाईमुळे नागरिकांनी पोलिसांची स्तुती केली आहे. सक्करदराच्या माटे वाईन शॉपजवळील हातठेल्यावर मद्यपींची गर्दी राहते. तेथेही ठेले हटवून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. नंदनवनमध्ये गुरुदेवनगर चौक येथील स्वराज वाईनशॉपजवळ बंद दुकानासमोर ग्राहक दारु पित होते. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली. अशा प्रकारची कारवाई पोलिसांनी अनेक ठिकाणी करून अतिक्रमणधारकांना पळवून लावले. या मोहिमेमुळे नागरिकांमध्ये आनंद पसरला आहे. या अड्ड्यांमुळे महिलांना खूप त्रास होत होता. यामुळे त्रस्त नागरिकांनी वेळोवेळी तक्रारी करूनही कारवाई होत नव्हती. ही कारवाई पोलीस उपायुक्त गजानन राजमाने, सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सत्यवान माने, सहायक पोलीस निरीक्षक दिलीप चंदन, किरण चौगुले, सहायक उपनिरीक्षक रमेश उमाठे, हवालदार देवेंद्र चव्हाण, सचिन तुमसरे, श्रीकांत मारवाडे यांनी केली.कारवाई सुरु राहणारगुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी सांगितले की, अतिक्रमणामुळे नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असलेल्या स्थळांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. निवडणुक पुढे असल्यामुळे पोलिसांनी गुन्हेगारांची धरपकड सुरु केली आहे. या मोहिमेमुळे गुन्हेगारांवर मोठा परिणाम होणार आहे. गुन्हे शाखेचा पदभार सांभाळल्यानंतर राजमाने यांनी अनेक बदल घडविले आहेत.

टॅग्स :Nagpur Policeनागपूर पोलीसEnchroachmentअतिक्रमण