शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

By admin | Updated: December 9, 2015 03:15 IST

घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला.

नागपूर : घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. शिक्षण घेऊन या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आणि एका चांगल्या आयुष्याची स्वप्न रंगविणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांचा गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी चुराडा केला आणि त्या तरुणीचे भावविश्वच कोसळले. गरिबीचे चटके सोसणाऱ्या एका असहाय तरुणीला काही तरुणांनी सहा दिवस एका खोलीत डांबून ठेवून सातत्याने अत्याचार केला. या तरुणांना धडा शिकविण्यासाठी पीडित तरुणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता, तिलाच दमदाटी करून पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर तक्रार दिल्यास पीडित तरुणी आणि तिच्या आईविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यासही पोलीस विसरले नाहीत. हिवाळी अधिवेशनात तरी मायबाप सरकार आपली दखल घेईल, या भावनेने ती नागपुरात पोहचली. परंतु येथेही दिवसभर भटकंती करून तिच्या पदरात निराशाच पडली. स्त्रियांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी तमाम कडक कायदे असतानाही एका युवतीला न्यायासाठी दारोदार भटकावे लागते, यापेक्षा काय शोकांतिका असावी?चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस तालुक्यातील एका गावातील वनमजूर महिलेच्या मुलीसोबत घडलेली ही क्रूर घटना आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शिक्षणाची आवड असल्यामुळे कशीबशी बारावीला शिकत असलेल्या तरुणीसोबत ही अमानुष घटना घडली आहे. ४ नोव्हेंबरला तिच्याच गावातील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी घरी एकटी असल्याचे पाहून चाकूच्या धाकावर तिला पळवून नेले. पोलिसांनीच दिली धमकी नागपूर : एका मित्राच्या खोलीवर सहा दिवस डांबून ठेवले. सहा दिवसात त्यांनी सातत्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका केल्यावर तरुणी घरी पोहचली. आईला तिने आपबिती सांगितली. लगेच तिच्या आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलिसांची भूमिका बघून त्यांना धक्काच बसला. गुन्हा दाखल करायचा सोडून, या मायलेकींनाच खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी पोलिसांनी देऊन पिटाळून लावले. चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांचीही तिने भेट घेतली. परंतु त्यांनीही तिचे समाधान केले नाही. अद्याप न्याय मिळालाच नाहीकुणीतरी दखल घ्यावी, या भावनेतून ही युवती आपल्या आईसोबत मंगळवारी नागपुरात दाखल झाली. सरकार नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यापर्यंत पोहचून आपल्या वेदना सांगण्यासाठी तिने दिवसभर प्रयत्न केला. लाल गाडीच्या दिव्याजवळ जाण्याचा तिने प्रयत्नही केला. पण सामान्य युवतीचे ऐकून घेण्यासाठी कुणीच वेळ दिला नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून ती धरणे परिसरातही गेली. खाकी वर्दीतले पोलीस न्याय देतील, अशी अपेक्षा होती. पण नाहीच. शेवटी पत्रकार भवनात ती पोहचली. आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे तिने ठरविले. पत्रकार परिषदेला पैसे लागत असल्याचे तिला समजल्याने ती हतबल झाली. पत्रकार संघाने आणि काही पत्रकारांनी पुढाकार घेऊन तिच्याकडून एकही रुपया न घेता, तिची बाजू पत्रकार परिषदेत ऐकून घेतली. उपाशी असलेली ही मुलगी आणि तिच्या आईची पत्रकारांनी भोजनाची व्यवस्था करून परतीसाठी आर्थिक मदतही केली. तिला न्याय मात्र अद्यापही मिळालेला नाही.