शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

बलात्काऱ्यांना का पकडत नाहीत पोलीस

By admin | Updated: December 9, 2015 03:15 IST

घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला.

नागपूर : घरात गरीबीच आयुष्य व्यापून उरलेली. त्यामुळे येणारी असहायतादेखील रोजचीच नशिबाला पूजलेली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. शिक्षण घेऊन या परिस्थितीतून बाहेर पडण्याची आणि एका चांगल्या आयुष्याची स्वप्न रंगविणाऱ्या एका तरुणीच्या स्वप्नांचा गावातीलच काही गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी चुराडा केला आणि त्या तरुणीचे भावविश्वच कोसळले. गरिबीचे चटके सोसणाऱ्या एका असहाय तरुणीला काही तरुणांनी सहा दिवस एका खोलीत डांबून ठेवून सातत्याने अत्याचार केला. या तरुणांना धडा शिकविण्यासाठी पीडित तरुणी संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेली. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करून न घेता, तिलाच दमदाटी करून पिटाळून लावले. एवढेच नव्हे तर तक्रार दिल्यास पीडित तरुणी आणि तिच्या आईविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यासही पोलीस विसरले नाहीत. हिवाळी अधिवेशनात तरी मायबाप सरकार आपली दखल घेईल, या भावनेने ती नागपुरात पोहचली. परंतु येथेही दिवसभर भटकंती करून तिच्या पदरात निराशाच पडली. स्त्रियांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी तमाम कडक कायदे असतानाही एका युवतीला न्यायासाठी दारोदार भटकावे लागते, यापेक्षा काय शोकांतिका असावी?चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस तालुक्यातील एका गावातील वनमजूर महिलेच्या मुलीसोबत घडलेली ही क्रूर घटना आहे. घरची परिस्थिती हलाखीची असूनही शिक्षणाची आवड असल्यामुळे कशीबशी बारावीला शिकत असलेल्या तरुणीसोबत ही अमानुष घटना घडली आहे. ४ नोव्हेंबरला तिच्याच गावातील गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी घरी एकटी असल्याचे पाहून चाकूच्या धाकावर तिला पळवून नेले. पोलिसांनीच दिली धमकी नागपूर : एका मित्राच्या खोलीवर सहा दिवस डांबून ठेवले. सहा दिवसात त्यांनी सातत्याने तिच्यावर अत्याचार केला. त्यांच्या तावडीतून शिताफीने सुटका केल्यावर तरुणी घरी पोहचली. आईला तिने आपबिती सांगितली. लगेच तिच्या आईने तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. परंतु पोलिसांची भूमिका बघून त्यांना धक्काच बसला. गुन्हा दाखल करायचा सोडून, या मायलेकींनाच खोट्या प्रकरणात गोवण्याची धमकी पोलिसांनी देऊन पिटाळून लावले. चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांचीही तिने भेट घेतली. परंतु त्यांनीही तिचे समाधान केले नाही. अद्याप न्याय मिळालाच नाहीकुणीतरी दखल घ्यावी, या भावनेतून ही युवती आपल्या आईसोबत मंगळवारी नागपुरात दाखल झाली. सरकार नागपुरात दाखल झाले आहे. त्यांच्यापर्यंत पोहचून आपल्या वेदना सांगण्यासाठी तिने दिवसभर प्रयत्न केला. लाल गाडीच्या दिव्याजवळ जाण्याचा तिने प्रयत्नही केला. पण सामान्य युवतीचे ऐकून घेण्यासाठी कुणीच वेळ दिला नाही. कुणाच्या तरी सांगण्यावरून ती धरणे परिसरातही गेली. खाकी वर्दीतले पोलीस न्याय देतील, अशी अपेक्षा होती. पण नाहीच. शेवटी पत्रकार भवनात ती पोहचली. आपल्या वेदना व्यक्त करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्याचे तिने ठरविले. पत्रकार परिषदेला पैसे लागत असल्याचे तिला समजल्याने ती हतबल झाली. पत्रकार संघाने आणि काही पत्रकारांनी पुढाकार घेऊन तिच्याकडून एकही रुपया न घेता, तिची बाजू पत्रकार परिषदेत ऐकून घेतली. उपाशी असलेली ही मुलगी आणि तिच्या आईची पत्रकारांनी भोजनाची व्यवस्था करून परतीसाठी आर्थिक मदतही केली. तिला न्याय मात्र अद्यापही मिळालेला नाही.