शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस आयुक्त म्हणतात, गुन्हेगारी नियंत्रणात

By admin | Updated: October 30, 2015 03:03 IST

उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त ...

नागपूर : उपराजधानी झपाट्याने वाढत असताना आम्ही शहरातील गुन्हेगारी कमी करण्यात यश मिळवले, असा दावा पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी आज पत्रकारांशी चर्चा करताना केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खुनाचे प्रमाण ५० टक्के आहे, चेनस्रॅचिंगच्या ६९ घटना गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहेत, असाही दावा आयुक्तांनी केला. आता महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यावर आम्ही भर देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शहर पोलीस दलाच्या मासिक बैठकीत गुन्हेगारी अहवाल घेतल्यानंतर पोलीस आयुक्त आणि पत्रकारांशी विस्तृत चर्चा केली. ते म्हणाले, आहे तेवढ्या मनुष्यबळात अधिकाधिक चांगली सेवा देण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी नागरिकांच्या सहकार्यांची नितांत गरज आहे. नागपुरातील नागरिक आणि प्रसारमाध्यमांची सुदैवाने पोलिसांना चांगली साथ लाभत आहे, त्याचमुळे येथील गुन्हेगारी नियंत्रित करण्यात आम्हाला यश मिळत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. जोपर्यंत नागरिक तक्रारी करणार नाही, तोपर्यंत गुन्हेगारांच्या कारवायांची माहिती कळणार नाही, त्याच्या मुसक्या आवळण्यासाठीही आम्ही धावपळ करू शकणार नसल्याचे त्यांनी अनेक उदाहरणे देत सांगितले. नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीची दखल घेण्याचे आणि तक्रारकर्त्याचे समाधान करण्याचे आदेश प्रत्येक पोलीस ठाण्याला देण्यात आले आहे. त्यामुळे ठाण्यात तक्रार द्यायला आले आणि त्यांना परत पाठविले, असे प्रकार आता घडणार नाहीत. तसे कुठे झाले तर त्या ठाण्यातील संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले. खुनाची संख्या अर्ध्यावर आल्याचे सांगताना हाआकडामात्र उपलब्ध झाला नाही. यावेळी सहपोलीस आयुक्त राजवर्धन सिन्हा, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, उपायुक्त अभिनाशकुमार, भारत तांगडे, शैलेश बलकवडे, रंजन शर्मा, दीपाली मासिरकर आणि संजय लाटकर उपस्थित होते.बलात्कार, विनयभंग आणि महिला अत्याचाराशी संबंधित गुन्हे रोखण्यासाठी पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत, असे सांगून यंदाच्या गुन्ह्यांचे विश्लेषण करताना त्यांनी पत्रकारांना आकडेवारीही दिली.अपहरण, पळवून नेणेफूस लावून पळवून नेणे किंवा अपहरण करण्याचे २५९ गुन्हे या ९ महिन्यात घडले. त्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार २०२ गुन्हे दाखल करण्यात आले. १९० गुन्ह्यांचा पोलिसांनी छडा लावला. पळवून नेलेल्या १७७ मुलींपैकी ११९ मुली, तर, ८७ मुलांपैकी ६२ मुले परत मिळाली. त्यातील ९८ जणांना पोलिसांनी शोधून काढले. ६० स्वत:च परत आले. १६ पालकांनी तर ३ जणांना स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी शोधले. यापुढे महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी पोलीस काय करणार त्या उपाययोजनांचीही माहिती उपायुक्त दीपाली मासिरकर यांनी दिली. नऊ महिन्यात १३० बलात्कारउपराजधानीत यंदा जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यात बलात्काराचे १३० गुन्हे घडले. त्यातील १२९ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले. ४६ महिला-मुलींनी लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारी नोंदविल्या आहेत. धाक दाखवून १० बलात्कार घडले. तर, प्रेमसंबंधातून ९ बलात्काराच्या घटना घडल्या. नोकरीचे आमिष दाखवून ९ जणींवर बलात्कार झाले. तर, लग्न करणार आहोत, अशी समज झाल्यामुळे २२ जणींनी शरीरसंबंध प्रस्थापित केले. नंतर मात्र लग्नास नकार दिल्याने त्यांनी तक्रार नोंदवली. उपराजधानीत या कालावधीत सामूहिक बलात्काराच्या पाच घटना घडल्या. तर, नवीन सुधारणा कायदा २०१३ अन्वये लैंगिक शोषण अथवा तसा प्रयत्न केल्याच्या २९ घटना घडल्या.यावर्षी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक (देहविक्रय) १०५ कारवाया पोलिसांनी केल्या. १६७ आरोपींना अटक करण्यात आली. ५४ पीडित मुलींची पोलिसांनी सुटका केली आणि १८ कुंटणखान्यातील ३४ खोल्या सील करण्यात आल्या.