शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

नियम मोडाल तर पोलीस कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारंवार आवाहन केल्यानंतरही शहरातील नागरिक कोविड नियमांचे पालन करीत नाहीत. संसर्ग वाढत असल्याने अखेर सोमवारी प्रशासनाने अनेक निर्बंध लागू केले. ७ मार्चपर्यंत शहरातील शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस, मंगल कार्यालय, लॉन आदी बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी . यांनी दिले आहेत.

मनपा व पोलीस प्रशासन संयुक्त कारवाई करणार असल्याची माहिती मनपा आयुक्तांनी लोकमतला दिली. शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागेल. मास्क शिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. बाजारातील गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी दिशा-निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतरही नियम मोडले तर साथरोग नियंत्रण अधिनियम व आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत पोलीस कारवाई केली जाणार आहे. आता कोणतीही सूट दिली जाणार नाही. आयुक्तांच्या आदेशानंतर अंमलबजावणीसाठी नियोजन सुरू आहे. मनपा अधिकाऱ्यांसोबत बैठका सुरू असल्याची माहिती आहे.

सध्या एनडीएस पथकामार्फत मास्क न लावणे, मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदींवर कारवाई केली जात आहे. आता संबंधितांवर आठवडी बाजार बंद करणे व रात्री ९ पर्यंत हॉटेल, रेस्टाॅरन्ट, बार, उपहारगृह आदी बंद करण्याची जबाबदारी सोपविली जाईल. दुसरीकडे सीताबर्डी, इतवारी, महाल, गांधीबाग, जरीपटका, खामला, धरमपेठ, गोगुळपेठ आदी बाजार भागातील गर्दीवर नजर ठेवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार तीनवेळा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीतजास्त ५० हजार रुपये दंड लावला जाणार आहे. त्यानंतर मंगल कार्यालय, लॉन, सभागृह सील करण्यात येईल. आदेशानुसार कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकांचे सत्र सुरू होते. तसेच संक्रमितांचा शोध घेऊन परिसर सील करण्याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर आधीच देण्यात आली आहे. होम क्वारंटाईन असलेल्यांच्या डाव्या हातावर होम क्वारंटाईन असल्याचा शिक्का मारण्याचे आदेश चार दिवसांपूर्वी मनपा आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार कारवाई सुरू आहे.

...

दोन दिवस ढील कशासाठी ?

मंगल कार्यालय, लॉन, सभागृह आदी ठिकाणी होणारे लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रमांवर २५ फेब्रुवारीपासून बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवसानंतर कारवाई होणार असल्याने दोन दिवस ढील कशासाठी असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.