शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पीएनबी घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करावी; यशवंत सिन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 10:36 IST

गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला.

ठळक मुद्देमोदी सरकार माहिती लपवीत आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंजाब नॅशनल बँकेत नीरव मोदी याने केलेला घोटाळा यूपीएच्या काळात २०११ मध्ये सुरू झाला, असा दावा भाजपतर्फे केला जात आहे. परंतु गेल्या चार वर्षांपासून मोदी सरकार सत्तेवर आहे. या काळात हा घोटाळा उघड का झाला नाही, असा सवाल करीत मोदी सरकार बरीच माहिती लपवीत आहे, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. या घोटाळ्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केला.गारपीटग्रस्तांना नुकसानभरपाई मिळण्याच्या मागणीसाठी भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांचे काटोल येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला सिन्हा यांनी शुक्रवारी भेट दिली. यानंतर नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार नीरव मोदी याचा समावेश डावोस येथील पंतप्रधानांच्या दौऱ्यात होता. नीरव मोदी याचा फोटो हा पंतप्रधानांनी उद्योजक, अधिकाऱ्यांसोबत काढलेले अधिकृत छायाचित्र आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्यात नीरव मोदीच्या झालेल्या समावेशाबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलेला युक्तिवाद हास्यास्पद आहे, असे सांगत गुन्हा दाखल झाल्यावर नीरव देश सोडून कसा पळून गेला, असा सवालही त्यांनी केला.

आरोग्य विमा योजना फसवीकेंद्रीय अर्थसंकल्पातील अनेक फसव्या योजना जाहीर करण्यात आल्याची टीका त्यांनी केली. गेल्या अर्थसंकल्पात कृषी सिंचन व दुग्ध व्यवसायासाठी योजना जाहीर झाल्या होत्या. या योजनांची अंमलबजावणी झाली नाही. आरोग्य विमा योजनाही फसवी असून देशात ५० कोटी लोकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Yashwant Sinhaयशवंत सिन्हा