शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५२ महत्त्वाचे मुद्दे
2
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
3
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
4
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
5
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
6
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
7
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
8
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
9
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
10
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
11
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
12
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
13
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
14
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
15
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
16
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
17
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
19
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
20
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा! प्रकाश गजभिये : केंद्र्रीय कृषिमंत्री

By admin | Updated: June 5, 2017 01:59 IST

भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, ...

राधा मोहन सिंह यांना निवेदन लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भाजपाने महाराष्ट्रातील जनतेला निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले, या आश्वासनाला तब्बल तीन वर्षे पूर्ण होऊन सुध्दा कर्जमाफी दिली नाही, याची आठवण करून देत शेतकऱ्यांचे कर्जमाफ करण्यास राज्य सरकारला केंद्र सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते आमदार प्रकाश गजभिये यांनी केली असून ेकेंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांना यासबंधीच्या मागणीचे निवेदन सादर केले.देशाच्या इतिहासात प्रथमच महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांनी संपावर जाऊन अन्नधान्य, भाजीपाला, दूध आदीं वस्तू रस्त्यावर फेकून भाजप सरकारचा निषेध केला, आजही हे आंदोलन सुरू असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या लक्षात आणून दिले.आपण केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला आर्थिक मदत देऊन भाजपने निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन पूर्ण करावे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. यावेळी केंद्र्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी राज्याची कर्जमाफी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच करतील, असे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी हे शब्द उच्चारून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केंद्र सरकारची उदासीनता दाखविली व महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान केला, असा आरोपही आ. प्रकाश गजभिये यांनी केला.