शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

सुखद धक्का : चोरल्या गेलेल्या ४५ लाखांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत

By नरेश डोंगरे | Updated: January 7, 2024 18:28 IST

१७८ प्रकरणांचा उलगडा : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेवा ही संकल्प’ अशी गाठ बांधून कर्तव्यावर राहणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात चोरी गेलेल्या, गहाळ झालेल्या माैल्यवान चिजवस्तू परत करून रेल्वे प्रवाशांना सुखद धक्का दिला.

रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत चोरी झाली किंवा घाईगडबडीत कोणती माैल्यवान चिजवस्तू, रक्कम गहाळ झाली तर ती परत मिळणार नाही, असेच अनेकांना वाटते. त्यामुळे कित्येक प्रवासी छोट्या, मोठ्या रक्कम अथवा चिजवस्तूची तक्रार नोंदविण्याची तसदी घेत नाहीत. काही जण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना साधी माहितीही देत नाही. मात्र, ते चुकीचे आहे. रक्कम, वस्तूची किंमत कितीही असो, ती चोरी गेली किंवा गहाळ झाली तर त्याची माहिती रेल्वे पोलिस किंवा आरपीएफला दिल्यास ती परत मिळण्याची आशा असते. गेल्या वर्षभरात अर्थात २०२३ मध्ये १७८ प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रकारे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किमतीचे साहित्य ज्याचे त्याला परत केले. त्यात कुणाची पर्स, कुणाची बॅग, कुणाचा मोबाइल तर कुणाचा लॅपटॉप आदीचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, ज्यांनी तक्रार नोंदवली होती, त्यातील कित्येकांनी नंतर आपल्या सामानाचे काय झाले, त्याची साधी चाैकशीही कधी केली नव्हती. मात्र, आरपीएफने स्वत:च त्या व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या चिजवस्तू त्यांना परत केल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी दिली आहे.

तक्रार, माहिती देण्याचे आवाहन

ज्या कुणा प्रवाशाची चिजवस्तू चोरीला गेली किंवा गहाळ झाली अशांनी रेल्वे पोलिस किंवा आरपीएफकडे माहिती द्यावी. घटनेनंतर लगेच प्रत्यक्ष भेटून तक्रार अथवा माहिती देणे शक्य नसेल तर १३९ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी. त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांची चिजवस्तू परत मिळू शकते, अशी माहितीही आर्य यांनी दिली आहे.