शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

सुखद धक्का : चोरल्या गेलेल्या ४५ लाखांच्या चिजवस्तू प्रवाशांना परत

By नरेश डोंगरे | Updated: January 7, 2024 18:28 IST

१७८ प्रकरणांचा उलगडा : रेल्वे सुरक्षा दलाची कामगिरी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘सेवा ही संकल्प’ अशी गाठ बांधून कर्तव्यावर राहणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या वर्षभरात चोरी गेलेल्या, गहाळ झालेल्या माैल्यवान चिजवस्तू परत करून रेल्वे प्रवाशांना सुखद धक्का दिला.

रेल्वे स्थानक अथवा रेल्वे गाडीत चोरी झाली किंवा घाईगडबडीत कोणती माैल्यवान चिजवस्तू, रक्कम गहाळ झाली तर ती परत मिळणार नाही, असेच अनेकांना वाटते. त्यामुळे कित्येक प्रवासी छोट्या, मोठ्या रक्कम अथवा चिजवस्तूची तक्रार नोंदविण्याची तसदी घेत नाहीत. काही जण रेल्वे पोलीस किंवा रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना साधी माहितीही देत नाही. मात्र, ते चुकीचे आहे. रक्कम, वस्तूची किंमत कितीही असो, ती चोरी गेली किंवा गहाळ झाली तर त्याची माहिती रेल्वे पोलिस किंवा आरपीएफला दिल्यास ती परत मिळण्याची आशा असते. गेल्या वर्षभरात अर्थात २०२३ मध्ये १७८ प्रकरणात रेल्वे सुरक्षा दलाने अशा प्रकारे ४४ लाख, ९४ हजार, २०५ रुपये किमतीचे साहित्य ज्याचे त्याला परत केले. त्यात कुणाची पर्स, कुणाची बॅग, कुणाचा मोबाइल तर कुणाचा लॅपटॉप आदीचा समावेश आहे.

विशेष म्हणजे, ज्यांनी तक्रार नोंदवली होती, त्यातील कित्येकांनी नंतर आपल्या सामानाचे काय झाले, त्याची साधी चाैकशीही कधी केली नव्हती. मात्र, आरपीएफने स्वत:च त्या व्यक्तींचा पत्ता शोधून त्यांच्याशी संपर्क केला आणि त्यांच्या चिजवस्तू त्यांना परत केल्याची माहिती आरपीएफचे विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी दिली आहे.

तक्रार, माहिती देण्याचे आवाहन

ज्या कुणा प्रवाशाची चिजवस्तू चोरीला गेली किंवा गहाळ झाली अशांनी रेल्वे पोलिस किंवा आरपीएफकडे माहिती द्यावी. घटनेनंतर लगेच प्रत्यक्ष भेटून तक्रार अथवा माहिती देणे शक्य नसेल तर १३९ या टोल फ्री क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी. त्यामुळे भविष्यात त्यांना त्यांची चिजवस्तू परत मिळू शकते, अशी माहितीही आर्य यांनी दिली आहे.