शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:41 IST

परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे.

ठळक मुद्देदोन दिवसीय आयोजन : महावितरणच्या नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे. सोमवारी सायंटिफिक सभागृहात प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर तसेच परीक्षक मधू जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ यांच्यासोबतच महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरीश गजबे, सम्राट वाघमारे, उमेश शहारे, सुनील देशपांडे, दिलीप दोडके, मनीष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे उपस्थित होते. उद्घाटनानंतर अमरावती परिमंडलाने ‘काही सावल्यांचे खेळ’ हे नाटक सादर केले. लेखक प्रसन्न शेंबेकर, दिग्दर्शक हेमराज ढोके होते. अभिजित सदावर्ती, वैशाली ठाकरे, विकास बांबल यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या. दुपारच्या सत्रात चंद्रपूर परिमंडलाने ‘अधांतर’ तर सायंकाळी अकोला परिमंडलाने ‘एक क्षण आयुष्याचा’ नाटक सादर केले. ‘अधांतर’ या नाटकात ८० च्या दशकातील मुंबईतील विस्कळीत जीवनाचे चित्र रंगविण्यात आले. या नाटकाचे लेखक जयंत पवार असून पंकज होनाडे यांनी दिग्दर्शन केले. स्नेहांजली तुंबडे, माधुरी सोनावणे, रोहिणी ठाकरे, शशांक डगवार. कृपाल लांजे, विवेक माटे, भालचंद्र घोडमारे, रवींद्र राऊन, नितीन पिंपळकर यांनी यात भूमिका साकारल्या. ‘एक क्षण आयुष्याचा’ या नाटकाने आजच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेल्या यंत्रणेविरुद्ध एल्गार पुकारला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदूरकर दिग्दर्शित या हृदयस्पर्शी नाट्याविष्काराचे सूत्रधार अरविंद भादीकर तर निर्मिती गुलाबराव कडाळे यांची होती.उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा अमृते, संचालन आणि आभार मधुसूदन मराठे यांनी मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर