शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

सावल्यांच्या खेळातून उलगडल्या वेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 00:41 IST

परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे.

ठळक मुद्देदोन दिवसीय आयोजन : महावितरणच्या नाट्य स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : परदेशी राहणाऱ्या मुलांना भेटायला आतूर झालेल्या म्हाताऱ्या आईवडिलांची व्यथा, आमटीत पडलेल्या ओल्या सुंभासारखे, घुमसणारे हे असुखी-निसुखी जीव, उजेडाला दीपणारे पण अंधाराला ओळखी सांगणारे, मुलांच्या भेटीकरिता व्याकूळ असलेली आई सुलोचना आणि वास्तव्याचे भान असलेले वडील विनायक यांच्या आयुष्यातील या कृष्णधवल सावल्या अन् या सावल्यांमधून अभिव्यक्त होणाऱ्या वेदना नागपूरकर प्रेक्षकांनी अनुभवल्या. निमित्त होते महावितरणच्या आंतरपरिमंडलीय नाट्य स्पर्धेचे. सोमवारी सायंटिफिक सभागृहात प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने या स्पर्धेचा प्रारंभ झाला. यावेळी महावितरणचे मुख्य अभियंते रफीक शेख, सुहास रंगारी, दिलीप घुगल, अरविंद भादीकर तसेच परीक्षक मधू जोशी, शोभना मोहरील, किशोर डाऊ यांच्यासोबतच महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार, अधीक्षक अभियंते हरीश गजबे, सम्राट वाघमारे, उमेश शहारे, सुनील देशपांडे, दिलीप दोडके, मनीष वाठ, नारायण आमझरे, सुहास मेत्रे उपस्थित होते. उद्घाटनानंतर अमरावती परिमंडलाने ‘काही सावल्यांचे खेळ’ हे नाटक सादर केले. लेखक प्रसन्न शेंबेकर, दिग्दर्शक हेमराज ढोके होते. अभिजित सदावर्ती, वैशाली ठाकरे, विकास बांबल यांनी यात प्रमुख भूमिका साकारल्या. दुपारच्या सत्रात चंद्रपूर परिमंडलाने ‘अधांतर’ तर सायंकाळी अकोला परिमंडलाने ‘एक क्षण आयुष्याचा’ नाटक सादर केले. ‘अधांतर’ या नाटकात ८० च्या दशकातील मुंबईतील विस्कळीत जीवनाचे चित्र रंगविण्यात आले. या नाटकाचे लेखक जयंत पवार असून पंकज होनाडे यांनी दिग्दर्शन केले. स्नेहांजली तुंबडे, माधुरी सोनावणे, रोहिणी ठाकरे, शशांक डगवार. कृपाल लांजे, विवेक माटे, भालचंद्र घोडमारे, रवींद्र राऊन, नितीन पिंपळकर यांनी यात भूमिका साकारल्या. ‘एक क्षण आयुष्याचा’ या नाटकाने आजच्या भ्रष्टाचाराने पोखरून टाकलेल्या यंत्रणेविरुद्ध एल्गार पुकारला. चंद्रकांत शिंदे लिखित आणि नितीन नांदूरकर दिग्दर्शित या हृदयस्पर्शी नाट्याविष्काराचे सूत्रधार अरविंद भादीकर तर निर्मिती गुलाबराव कडाळे यांची होती.उद्घाटनीय कार्यक्रमाचे प्रास्ताविक मेघा अमृते, संचालन आणि आभार मधुसूदन मराठे यांनी मानले.

टॅग्स :cultureसांस्कृतिकnagpurनागपूर