शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

नागपूर जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्ये खेळाडू विद्यार्थ्यांचे अतोनात हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:02 IST

जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू आहे. परंतु आयोजकांकडून स्पर्धकांना साध्या सोईसुविधा देखील पुरविण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.

ठळक मुद्देक्रीडा स्पर्धांना सुविधांचा दुष्काळआॅक्टोबर हिटमध्ये विद्यार्थ्यांची लाहीलाहीना पाणी, ना शौचालय, विद्यार्थिनींची कुचंबणा

मंगेश व्यवहारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जिल्हास्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा मानकापूर क्रीडा संकुल परिसरात सुरू आहे. क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी खेड्यापाड्यातून प्रवास करून खेळाडू विद्यार्थी येथे पोहचले आहे. आॅक्टोबर हिटच्या चटका सहन करत हे खेळाडू आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहे. परंतु आयोजकांकडून स्पर्धकांना साध्या सोईसुविधा देखील पुरविण्यात आल्या नसल्याने विद्यार्थ्यांच्या जीवाची लाहीलाही होत आहे.विद्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी शासनातर्फे या क्रीडा स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. त्यासाठी शाळांना जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याकडे प्रति खेळाडू २५ रुपये असे शुल्क भरावे लागत असल्याची माहिती आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातून किमान ३०० च्या वर शाळांचे हजारो विद्यार्थी सहभागी होतात. गेल्या दोन दिवसांपासून मानकापूरच्या क्रीडा संकुलात या स्पर्धा सुरू आहे. शुक्रवारी ग्रामीण भागातील शाळांच्या स्पर्धा पार पडल्या. शनिवारी शहरी भागातील शाळांच्या स्पर्धा झाल्यात. लोकमतने या क्रीडा स्पर्धेची प्रत्यक्ष पाहणी केली. आॅक्टोबरची हिट चांगलीच तापत आहे. ग्रामीण भागातून १०० ते १५० किलोमीटरचा प्रवास करून खेळाडू सकाळी ८ पासून रिपोर्टिंग करीत होते. उन्हाचा पारा चांगलाच तापत असताना, खेळाडूंसाठी साधी सावलीची व्यवस्था सुद्धा आयोजकांना करता आली नाही. आपला परफॉर्मंमन्स दिल्यानंतर दम खात तळपत्या उन्हात खेळाडू बसले होते. ग्रामीणच्या स्पर्धा सुरू असताना पिण्याच्या पाण्याची सुद्धा सोय नव्हती. शिक्षकांनी तक्रारी केल्यानंतर कसेबसे पाणी पोहचले. पण तेही अपुरे. ना शौचालयाची सोय, ना विद्यार्थिनी खेळाडूंसाठी चेंिजंग रुमची सोय करण्यात आली होती. त्यामुळे चांगलीच कुचंबणा होत होती. या खेळाडूंसोबत आलेले शिक्षक, पालक यांना बसण्यासाठी साध्या खुर्च्या सुद्धा उपलब्ध नव्हत्या. सकाळी ८ ते सायंकाळी ६ पर्यंत विद्यार्थ्यांना उन्हाचा तडाखा सहन करावा लागला. झाड्यांचा सावलीत विद्यार्थी, शिक्षक बसून होते.एवढ्या भव्य स्पर्धा होत असताना प्रथमोपचाराची सोयसुद्धा नव्हती. उन्हाच्या तडाख्यात एखाद्याला भोवळ आली, आरोग्य बिघडल्यास रुग्णालयात भरती करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सची सोयसुद्धा करण्यात आली नव्हती. सोईसुविधेचा अभाव असताना, आयोजकांच्या व्हॉलेंटीयरची दादागिरी सुद्धा भलतीच होती. त्यांच्याकडून असभ्य भाषेचा वापर होत असल्याच्या तक्रारी शिक्षकांनी केल्या. क्रीडा स्पर्धेच्या नावावर निव्वळ बोगसपणा दिसून आला.

क्रीडा स्पर्धेचा निधी जातो कुठे?या स्पर्धेसाठी निधीची तरतूद करण्यात येत असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकाºयांनी सांगितले. शिवाय क्रीडा शुल्कापोटी शाळांना सुद्धा शुल्क भरावे लागते. असे असतानाही काहीच सोईसुविधा उपलब्ध होत नसतील तर हा निधी जातो कुठे?

चेंजिंग रुम उपलब्ध करून दिली, पण दूर होतीयासंदर्भात जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांना विचारणा केली असता, मैदान अंडर कन्स्ट्रक्शन आहे. सुविधा पुरविण्यासाठी क्रीडा स्पर्धेचे इनचार्ज योगेश खोब्रागडे यांना सूचना दिल्या होत्या. मुलींसाठी क्रीडा प्रबोधनी येथे चेंजिंग रुम उपलब्ध करून दिली होती, पण ती दूर होती.

टॅग्स :Governmentसरकार