शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

गरीब विद्यार्थ्यांसाठी कायद्याच्या शिक्षणाचा ‘प्लॅटफॉर्म’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 23:34 IST

विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.

ठळक मुद्देथेट रोजगाराची संधी : विदर्भातील विधीक्षेत्रात अनोखा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदेशातील विद्यापीठात शिक्षण घेतल्यानंतर साधारणत: बहुतांश जणांचा तेथेच ‘करिअर’ घडविण्याकडे कल दिसून येतो. मात्र गलेलठ्ठ ‘पॅकेज’च्या मागे न धावता आपणही देशाच्या मातीचे देणे लागतो ही भावना ठेवून फारच कमी लोक कार्य करतात. अशीच भावना घेऊन ती देखील विदेशात गेली होती. लहानपणी पाहिलेला ‘स्वदेस’ आणि देशाच्या ओढीने परत येणारा ‘मोहन भार्गव’ तिच्या मनात घर करुन राहिला होता. विधीसारख्या अभ्यासक्रमात विदेशातील विद्यापीठात ‘मेरिट’ आल्यानंतर गगन ठेंगणे होणे सहज शक्य होते. मात्र स्वत:चे पाय मातीशीच जुळवून ठेवले आणि चक्क एक अनोखा संकल्पच केला. विधीचे शिक्षण घेतल्यानंतर गरीब घरातील विद्यार्थ्यांना ‘प्लॅटफॉर्म’ उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेतला असून विदर्भातील ‘टॅलेंट’ घडविण्याचा तिने विडाच उचलला आहे. ही कहाणी आहे, पायल बावनकुळे-आष्टनकर या तरुणीची.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून ‘एलएलबी’ची पदवी प्राप्त केल्यानंतर पायलने लंडन येथे ‘युनिव्हर्सिटी ऑफ इसेक्स’मध्ये प्रवेश घेतला. ‘मास्टर्स इन इंटरनॅशनल बिझनेस लॉ’ अभ्यासक्रमात जगभरातील विविध देशांतील विद्यार्थी होते. मात्र भारतीय गुणवत्ता सिद्ध करत पायलने तेथे अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर तेथेच गलेलठ्ठ ‘पॅकेज’वर ‘कॉर्पोरेट’ क्षेत्रात काम करण्याची तिला संधी होती. मात्र स्वत:ला सिद्ध करण्यासोबतच तिला तरुण विद्यार्थ्यांना एक ‘रोडमॅप’ तयार करुन द्यायचा होता. त्यामुळेच भारतात परतण्याचा शेवटी निर्णय घेतला. वडील चंद्रशेखर बावनकुळे हे राज्यातील मंत्री असल्याने देशातदेखील मोठ्या कंपनीत ती सहजपणे काम करु शकली असती. मात्र वडिलांच्या नावाचा उपयोग न करता पायलने स्वत:मधील कर्तृत्वाने नागपुरातच ‘केपीबी बिझनेस अ‍ॅडव्हायझर्स लिमिटेड’ या विधी ‘फर्म’ची स्थापना केली. पाच वर्षे अभ्यास करुन पदवी प्राप्त केल्यानंतर विद्यार्थ्यांना लगेच आर्थिक मिळकत सुरू होईल याची शाश्वती नसते. अनेकदा तर मोठ्या वकीलाच्या मार्गदर्शनात कुठलेही मानधन न घेता काही वर्षे काम करावे लागते. त्यानंतर ‘प्रॅक्टिस’ सुरू होऊन जम बसायला वेळ लागतो. वयाची तिशी ओलांडल्यावरही अनेक जण आर्थिकदृष्ट्या स्थिरस्थावर होत नाहीत. यामुळे गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांची सर्वात जास्त फरफट होते. त्यामुळेच या ‘फर्म’च्या माध्यमातून अशा गुणवंत विद्यार्थ्यांना थेट रोजगार देण्याचा माझा मानस असल्याचे पायलने सांगितले.विदर्भात विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वलमहाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ सुरू झाले असून नागपुरात ‘सिम्बॉयसिस’ येत असल्याने विधी शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे. मागील काही वर्षात नागपूरचा झपाट्याने विकास होत आहे. ‘मेट्रो’ आल्यामुळे जागतिक कंपन्यांची नजर नागपूरकडे आहे. ‘आयटी’ कंपन्या अगोदरपासूनच येथे आलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात नागपुरात ‘कॉर्पोरेट’ संस्कृती वाढीस लागेल. अशा स्थितीत विधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल असून विधीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने विचार करावा. नागपूर व विदर्भातील विधी पदवीधारकांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना केवळ प्रोत्साहन देण्याची गरज आहे, असे मत पायलने मांडले.तरुणींनी पुढाकार घ्यावावकील झाल्यानंतर साधारणत: स्वत:ची ‘प्रॅक्टीस’ करण्याकडे अनेकांचा कल असतो. मात्र विधी पदवीधारकांची ‘कॉर्पोरेट’सह विविध क्षेत्रात प्रचंड आवश्यकता आहे. मोठ्या शहरात एकच ‘फर्म’ विविध क्षेत्रातील समस्या हाताळताना दिसते. नागपुरात तशी फारशी सुरुवात झालेली नाही किंवा तसे अनुकूल वातावरण नाही. माझ्या ‘फर्म’च्या माध्यमातून मी तो पुढाकार घेतला आहे. तरुणींनी विधी क्षेत्रात झपाट्याने पुढे येण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन यावेळी पायलने केले.

 

 

टॅग्स :advocateवकिलEducationशिक्षण