शहरं
Join us  
Trending Stories
1
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
2
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
3
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
4
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
7
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
8
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
9
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
10
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
11
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
12
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
13
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
14
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
15
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
16
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
17
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
18
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
19
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
20
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टिक कचरा अर्ध्यावर : प्रमाण ३२ टनावरून १६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:06 IST

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोईचे होत आहे.

ठळक मुद्देबंदीमुळे वापर घटला

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर-प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोईचे होत आहे.प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी शहरातील विविध भागातून दररोज गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात ३० ते ३२ टन प्लास्टिक असायचे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर हे प्रमाण १६ टन इतके कमी झाले आहे. आधीच्या कचऱ्यात नुसत्या प्लास्टिक पिशव्या दिसायच्या. आता प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा. आता हा त्रास कमी होत आहे.प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नसल्याने त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम व्हायचा तसेच त्या नाल्यांमध्ये अडकून वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळे शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेतला. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. सोबतच शहरात गेल्या आठ महिन्यात ७०० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. या सर्व प्रयत्नांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. भांडेवाडीमध्ये हा कचरा साठवला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे करणे त्रासाचे आहे. आता हा त्रास कमी झाला आहे.प्लास्टिक पिशव्यांमुळे सुुरुवातीला व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता अनेक दुकानदार कापडी पिशव्या देतात. यातून नवा रोजगार निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न