शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात प्लास्टिक कचरा अर्ध्यावर : प्रमाण ३२ टनावरून १६ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2019 21:06 IST

प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोईचे होत आहे.

ठळक मुद्देबंदीमुळे वापर घटला

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर-प्लास्टिक पिशव्यांच्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावताना अडचणी येत होत्या. तसेच मोकाट जनावरांच्या जीवाला धोका वाढला होता. मात्र प्लास्टिकबंदीचा चांगला परिणाम शहरात दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण अर्ध्यावर आले आहे. यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लावणे सोईचे होत आहे.प्लास्टिकबंदी होण्यापूर्वी शहरातील विविध भागातून दररोज गोळा करण्यात आलेल्या कचऱ्यात ३० ते ३२ टन प्लास्टिक असायचे. मात्र, प्लास्टिकबंदी लागू झाल्यानंतर हे प्रमाण १६ टन इतके कमी झाले आहे. आधीच्या कचऱ्यात नुसत्या प्लास्टिक पिशव्या दिसायच्या. आता प्लास्टिक पिशव्यांचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे साफसफाई करताना कर्मचाऱ्यांना त्रास व्हायचा. आता हा त्रास कमी होत आहे.प्लास्टिक पिशव्या नष्ट होत नसल्याने त्यांचा पर्यावरणावर विपरीत परिणाम व्हायचा तसेच त्या नाल्यांमध्ये अडकून वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण व्हायचा. त्यामुळे शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदीचा निर्णय घेतला. याबाबत महापालिकेच्या वतीने जनजागृती करण्यात आली. सोबतच शहरात गेल्या आठ महिन्यात ७०० टन प्लास्टिक जप्त करण्यात आले. या सर्व प्रयत्नांचा चांगला परिणाम आता दिसायला लागला आहे. कचऱ्यातील प्लास्टिकचे प्रमाण कमी झाले आहे. भांडेवाडीमध्ये हा कचरा साठवला जात असताना त्यातून प्लास्टिक वेगळे करणे त्रासाचे आहे. आता हा त्रास कमी झाला आहे.प्लास्टिक पिशव्यांमुळे सुुरुवातीला व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या होत्या. आता अनेक दुकानदार कापडी पिशव्या देतात. यातून नवा रोजगार निर्माण झाला आहे.

 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीGarbage Disposal Issueकचरा प्रश्न