शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

प्लास्टिकबंदी; उशिरा सुचलेले शहाणपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 23:13 IST

पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्या प्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.

ठळक मुद्देआशिष जयस्वाल : ‘खरी-खरी प्लास्टिीकबंदी आवश्यक की अनावश्यक’ यावर चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पर्यावरण संवर्धनासाठी शालेय अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश करण्याची गरज आहे. शासनाने घेतलेल्याप्लास्टिकबंदीचा घेतलेला निर्णय योग्यच आहे. परंतु याची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत शंका आहे. बंदीचा निर्णय म्हणजे राज्य शासनाला उशिरा सुचलेले शहापण होय, असे मत माजी आमदार आशिष जयस्वाल यांनी शनिवारी मांडले.वनराई फाऊं डेशन व तेजस्विनी महिला मंचतर्फे श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात आयोजित खरी-खरी प्लास्टिकबंदी आवश्यक की अनावश्यक या विषयावरील चर्चासत्रात जयस्वाल बोलत होते. अध्यक्षस्थानी वनराईचे गिरीश गांधी होते. व्यासपीठावर नीरीचे संशोधक डॉ. अतुल वैद्य, उद्योजक रमेश मंत्री, पर्यावरण कार्यकर्ते पराग करंदीकर, मकरंद पांढरीपांडे, अजय पाटील, महिला मंचच्या अध्यक्ष किरण मुंदडा आदी उपस्थित होते.गौण खनिजांचे उत्खनन करताना खनिकर्म विभागात प्राप्त होणाऱ्या महसुलातील २० टक्के निधी हा पर्यावरण संवर्धनासाठी खर्च करणे आवश्यक आहे. परंतु राज्यात हा निधी खर्च केला जात नाही. औद्योगिक विकासात प्रदूषण अटळ आहे. याला आळा घालण्यासाठी प्लास्टिकबंदीच्या निर्णयाला नागरिकांनी सहकार्य करणे अपेक्षित असल्याचे जयस्वाल म्हणाले.कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा पर्यावरणासाठी घातकच असतो. असेच प्लास्टिकच्या अतिवापराचे दुष्परिणाम होत आहे. नागरिकांनी प्लास्टिक वापराचा अतिरेक टाळावा. यासाठी राज्य शासनाने घेतलेला प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच असल्याचे प्रतिपादन अतुल वैद्य यांनी केले. विकसित देशात भारताच्या तुलनेत प्लास्टिकचा वापर अधिक आहे. परंतु प्लास्टिकची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जाते. मात्र आपल्या देशात वापर कमी असूनही प्लास्टिकमुळे समस्या निर्माण झाली आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या वापरावर बंदी घालण्यात आल्याचे अतुल वैद्य म्हणाले.प्लास्टिकबंदीचा निर्णय योग्यच आहे. नागरिकांनीही प्लास्टिकचा वापर न करण्याचा संकल्प करण्याची गरज आहे. लोकांनी या निर्णयाचा सकारात्मक विचार करावा, असे आवाहन मकरंद पांढरीपांडे यांनी केले. प्लास्टिकबंदी ही लोकचळवळ झाल्याशिवाय यशस्वी होणार नाही, असे मत गिरीश गांधी यांनी मांडले. प्रास्ताविक किरण मुंदडा यांनी तर सूत्रसंचालन अजय पाटील यांनी केले. उपस्थितांचे आभार कल्पना मोहता यांनी मानले.

टॅग्स :Ashish Jaiswalआशीष जयस्वालPlastic banप्लॅस्टिक बंदी