शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्लास्टिक बॅन अशक्यच! रिसायकल व नियाेजन आवश्यक; तज्ज्ञांचे स्पष्ट मत

By निशांत वानखेडे | Updated: June 5, 2023 18:54 IST

Nagpur News प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

निशांत वानखेडेनागपूर : प्लास्टिकवर बंदी लावण्याचा कितीही दावा केला तरी हे पाऊल प्रभावी ठरेल, हे शक्य नाही. त्याऐवजी प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण, वापरलेल्या प्लास्टिकचे नियाेजन आणि पुनर्वापरासाठी रिसायकल करणे, हेच महत्त्वाचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करून उपाययाेजना कराव्या लागतील, असे स्पष्ट मत प्लास्टिक रिसायकल क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांनी व्यक्त केले.

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशाेधन संस्था (नीरी) च्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्लास्टिकच्या पुनर्प्रक्रियेवर परिसंवाद आयाेजित करण्यात आला. याप्रसंगी विभागीय उपायुक्त (विकास) कमलकिशाेर फुटाणे, प्लास्टिक न्युट्रॅलिटी रिसायकल इंडियाच्या वरिष्ठ व्यवस्थापक रचना गंपा, राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाचे संचालक आर. एम. क्षीरसागर, नीरीचे संचालक डाॅ. अतुल वैद्य, नीरीच्या वैज्ञानिक डाॅ. रिता धापाेडकर प्रामुख्याने उपस्थित हाेते. कमलकिशाेर फुटाणे यांनी ‘माझी वसुंधरा कॅम्पेन ४.०’ सह पर्यावरण संवर्धनाबाबत राज्य शासनाच्या विविध याेजनांची माहिती दिली. आर. क्षीरसागर यांनी सरकार प्लास्टिक वापर आणि कचऱ्याच्या नियाेजनासाठी वेगवेगळ्या उपाययाेजना राबवित आहे, मात्र आणखी माेठा टप्पा गाठायचा असून प्लास्टिक विराेधी लढाईत नागरिकांनी जबाबदारी घेण्याची गरज व्यक्त केली. संचालन डाॅ. देबीश्री खान यांनी केले, तर वरिष्ठ वैज्ञानिक डाॅ. प्रकाश कुंभारे यांनी आभार मानले.

दरराेज २६ हजार टन निघते, ८ टक्केच रिसायकल : धापाेडकरडाॅ. रिता धापाेडकर यांनी देशात प्लास्टिकच्या स्थितीची भीषणता अधाेरेखित केली. देशात दरराेज २६,००० टन प्लास्टिकचा कचरा निघताे. त्यातून केवळ ८ टक्के रिसायकल हाेताे, २९ टक्क्यांवर चुकीचे नियाेजन हाेते आणि उरलेला कचरा जलसाठे आणि अन्नसाखळीत मिसळताे. या सरळ अर्थकारणाला खंडित करून चक्राकार अर्थकारणात रूपांतरित करण्याची गरज आहे. प्लास्टिकचा सातत्याने पुनर्वापर करणारी चक्राकार इकाॅनाॅमी विकसित करण्याचा राेडमॅप तयार हाेत असल्याचे सांगत पुढच्या काही दशकात भारतातील कचरा व्यवस्थापन, पुनर्प्रक्रिया क्षमता, डिजिटल प्लॅटफार्म, जागृती व प्रशिक्षणाला मजबुती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

केदारनाथ पॅटर्न प्रभावी ठरेल : गंपा

रचना गंपा यांनी प्लास्टिकवर बंदी लादणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत रिसायकल हा माेठा पर्याय असल्याचे सांगितले. देशात दर मिनिटाला १० लक्ष प्लास्टिक बाॅटल खरेदी केल्या जातात. दरराेज ४०५९ मेट्रिक टन प्लास्टिक कचरा बाहेर निघताे. यावर नियंत्रणासाठी लाेकांच्या वर्तनात बदल करण्याची गरज आहे. त्यांच्या संस्थेतर्फे केदारनाथमध्ये प्लास्टिक बाॅटलसह साहित्य खरेदी करणाऱ्या भाविकांकडून प्रतिवस्तू १० रुपये शुल्क घेण्यास सुरुवात केली. ही वस्तू परत आणेल, त्याच्याकडून क्यूआर काेड स्कॅन करून त्याचे पैसे परत देण्याची माेहीम सुरू केली. या उपक्रमाला प्रचंड यश मिळाले. आता हा पॅटर्न देशात ६० पर्यटन व धार्मिक स्थळी सुरू केला असून एका महिन्यात ४० लक्ष क्यूआर काेड स्कॅन झाल्याचे त्यांनी सांगितले. सरकारची मदत मिळाली की हा पॅटर्न देशभर राबविण्यास मदत हाेईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी