शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
2
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
3
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
4
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
5
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
6
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
7
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
8
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
9
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
10
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
11
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
12
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
13
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
14
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
15
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
16
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
17
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
18
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
19
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
20
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?

नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी तात्काळ नियोजन करा  : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:22 IST

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

ठळक मुद्देआराखडा तयार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी, आरोग्य सेवा व कम्युनिटी किचन या बाबींचा आराखड्यात प्राधान्याने समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बुधवारी पालकमंत्री राऊत यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा उपस्थित होते.लॉकडाऊन वाढल्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. यासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. नागरिकांना लागणारे भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित करावे. सामाजिक संस्थांना यासाठी निधी देण्यात येईल. यावर पोलीस विभागाने नियंत्रण ठेवावे. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी बँक ांतील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.वैद्यकीय साधनांच्या खरेदीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाखकोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लागणारी वैद्यकीय साधने घेण्यासाठी आमदार निधीमधून प्रत्येकी ५० लाख निधी घेणेबाबत सर्व आमदारांना पत्र लिहावे, असे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. आपत्तीशी लढा देताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजना व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.रेशनकार्ड व आधार कार्ड नसलेल्यांनाही मिळावे धान्यज्यांच्याकडे आधारकार्ड आहे पण रेशनकार्ड नाही तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्डही नाही अशा नागरिकांना किराणा धान्य किट देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागात किराणा धान्य किट वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरु असून शहरात वाटपाचे नियोजन आवश्यक असल्याचे पालकमंत्री राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्री