शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

नागपुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी तात्काळ नियोजन करा  : पालकमंत्री नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2020 23:22 IST

नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले.

ठळक मुद्देआराखडा तयार करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘लॉकडाऊन’चा कालावधी वाढल्यामुळे नागरिकांची जीवनावश्यक वस्तूंची मागणी वाढणार आहे. या परिस्थितीत प्रशासनाने जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी तात्काळ नियोजन करावे. नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा नियमित पुरवठा व्हावा तसेच विस्थापित बेघर व मजूर व्यक्तींच्या निवासाची तसेच भोजनाची व्यवस्था व्हावी यादृष्टीने प्रशासनाने आराखडा तयार करावा, असे निर्देश पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिले. किराणा, भाजीपाला, दूध, औषधी, आरोग्य सेवा व कम्युनिटी किचन या बाबींचा आराखड्यात प्राधान्याने समावेश असावा, असेही त्यांनी सांगितले.‘लॉकडाऊन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बुधवारी पालकमंत्री राऊत यांनी विविध विषयांचा आढावा घेतला. बैठकीत महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अप्पर पोलीस आयुक्त नीलेश भरणे, पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा उपस्थित होते.लॉकडाऊन वाढल्यामुळे नागरिकांची आर्थिक अडचण वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भोजनाची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करावी लागणार आहे. यासाठी कम्युनिटी किचनची व्यवस्था करावी. नागरिकांना लागणारे भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित करावे. सामाजिक संस्थांना यासाठी निधी देण्यात येईल. यावर पोलीस विभागाने नियंत्रण ठेवावे. नागरिकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी बँक ांतील व्यवहार सुरळीत सुरू ठेवण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.वैद्यकीय साधनांच्या खरेदीसाठी आमदार निधीतून प्रत्येकी ५० लाखकोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी लागणारी वैद्यकीय साधने घेण्यासाठी आमदार निधीमधून प्रत्येकी ५० लाख निधी घेणेबाबत सर्व आमदारांना पत्र लिहावे, असे पालकमंत्री राऊत यांनी सांगितले. आपत्तीशी लढा देताना सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन उपाययोजना व नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.रेशनकार्ड व आधार कार्ड नसलेल्यांनाही मिळावे धान्यज्यांच्याकडे आधारकार्ड आहे पण रेशनकार्ड नाही तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड व आधारकार्डही नाही अशा नागरिकांना किराणा धान्य किट देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. ग्रामीण भागात किराणा धान्य किट वाटपाचे काम योग्य पद्धतीने सुरु असून शहरात वाटपाचे नियोजन आवश्यक असल्याचे पालकमंत्री राऊत म्हणाले.

टॅग्स :Nitin Rautनितीन राऊतguardian ministerपालक मंत्री