शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीस-शिंदेंमध्ये दुरावा? बिहारला ना एकत्र गेले, ना एकत्र आले, एकमेकांकडे पाहून कोरडंच हसले; नेमके काय घडले? 
2
'एनडीएने बिहारची मते ५.५ रुपये प्रतिदिन दराने खरेदी केली', प्रशांत किशोर यांचा मोठा दावा
3
'मुलगा गोरा कसा?'; संशयी पतीने क्रौर्याची सीमा ओलांडली! बाळाच्या रंगावरून पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेतला अन्.. 
4
कराची शेअर बाजारात तेजी... पाकिस्तानची सर्वात मोठी कंपनी कोणती? रिलायन्सच्या तुलनेत कुठे?
5
Mumbai Crime: ऑफिसमधून बाहेर पडताच कारच्या समोरून आले आणि घातल्या गोळ्या; मुंबईतील घटनेचा व्हिडीओ आला समोर
6
Jara Hatke : जगातील अद्भुत कोपरा, जिथे सूर्य दोन महिने 'सुट्टीवर' जातो; तापमानही जाते शून्याच्या खाली!
7
Numerology 2026: ६ मूलांकांचे दु:खाचे दिवस सरणार, सुवर्ण काळ येणार; २०२६ला मालामाल-भाग्योदय!
8
उदयपूरमध्ये शाही विवाह सोहळा, ज्युनियर ट्रम्पपासून VVIP पाहुणे येणार; कोण आहे वधू आणि वर?
9
Smriti Mandhana : समझो हो ही गया... स्मृती मंधानाने केली साखरपुड्याची अनोखी घोषणा, रविवारी होणार विवाह
10
किलर स्माईल ते किलर्स स्माईल! माधुरी दीक्षितची सस्पेन्स सीरिज 'या' दिवशी होणार रिलीज
11
एकनाथ शिंदेंकडून दिल्लीत तक्रार पण मंत्री उदय सामंतांनी रवींद्र चव्हाणांचं केलं भरभरून कौतुक
12
धक्कादायक! शाळेच्या छतावरून उडी घेऊन १३ वर्षीय विद्यार्थिनीने आयुष्य संपवले, नेमके कारण काय?
13
असं काय झालं की, लग्नाला फक्त ३ दिवस बाकी असताना नवरदेवाने संपवले आयुष्य; ४ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
14
"युट्यूबमधून मी जास्त पैसे कमावते...", फराह खानचा खुलासा; कोरिओग्राफी-दिग्दर्शनाबद्दल म्हणाली...
15
Jalana: १३ वर्षीय विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन; पालकांचा शिक्षकावर गंभीर आरोप
16
"जर मी तिला शाळेत पाठवलं नसतं तर..."; चौथ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या अमायराच्या आईचा टाहो
17
मोमोजचा व्यवसाय, प्रचंड मेहनती, नवीन फ्लॅटही घेतला; साहिलने जे कमावलं ते ड्रायव्हिंगने गमावलं
18
The Family Man 3 Review: 'श्रीकांत तिवारी'वरच 'टास्क फोर्स'ला संशय; या मिशनमध्ये 'द फॅमिली मॅन' पास की फेल? वाचा रिव्ह्यू
19
Pune Accident: ताम्हिणी घाटात जीप ५०० फूट दरीत कोसळली, ६ तरुणांचा मृत्यू
20
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील कचऱ्यापासून वीज तयार करण्याची योजना संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:06 IST

कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.

ठळक मुद्देगडकरींनी घेतला एस्सेलच्या अधिकाऱ्यांचा क्लास : काम सुरू न झाल्यास रद्द होणार करार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कचऱ्यापासून वीज तयार करणारी महत्त्वाकांक्षी योजना संकटात सापडली आहे. मे २००७ मध्ये या योजनेसाठी मनपाने एस्सेल समूह व हिताची जोसन लि.शी करार केला होता. परंतु अजूनपर्यंत ही योजना साकार करण्याच्या दिशेने काहीही झालेले नाही. अशा परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेल समूहाच्या अधिकाऱ्यांना नागपुरात बोलावून त्यांचा ‘क्लास’ घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितले की, तातडीने काम सुरू न झाल्यास ते महापालिकेला करार रद्द करण्याची शिफारस करतील.भांडेवाडीमध्ये प्रस्तावित या प्रकल्पासाठी मनपा, एस्सेल व हिताचीने जॉईंट व्हेंचर कंपनी स्थापित केली होती. याअंतर्गत मनपाकडून दर दिवशी मिळणाऱ्या ८०० टन कचऱ्यापासून ११.५ मेगावॅट विजेचे उत्पादन करण्याचा विचार आहे. महावितरण या प्रकल्पातील वीज ७ रुपये युनिटच्या दराने खरेदीसाठी तयार होते. राज्य सरकारने या प्रकल्पासाठी नोव्हेंबर २०१७ मध्ये १ रुपये दरानुसार भांडेवाडी येथे १० एकर जागा १५ वर्षांसाठी वितरित केली होती. यात केवळ इतकीच अट होती की, या जमिनीचा उपयोग वीज प्रकल्पाशिवाय इतर कुठल्याही कामासाठी होणार नाही. या जमिनीचा उपयोग कर्ज घेण्यासाठी किंवा गहाण ठेवण्यासाठीसुद्धा करता येऊ शकत नाही.सध्या अनेक प्रयत्नानंतरही ही योजना साकार होत नव्हती. सूत्रानुसार या प्रकल्पातील सर्वात मोठे संकट म्हणजे ऑपरेटरला देण्यात येणाऱ्या शुल्कामुळे निर्माण झाले आहे. महापालिकेने सॉलिड वेस्टचे टिपिंग शुल्क ७५० रुपये प्रति टनावरून कमी करून २२५ रुपये केले आहे. कारण यासाठी केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ऑपरेटरला ९६.२२ कोटी रुपये मिळणार आहेत.अनेक कर्मचाऱ्यांनी सोडली नोकरीमनपा सूत्रानुसार एस्सेलने या प्रकल्पासाठी एक कार्यालय सुरू केले होते. काही कर्मचारीसुद्धा नियुक्त करण्यात आले होते. परंतु बहुतांश कर्मचाऱ्यांनी नंतर नोकरी सोडली. या प्रकल्पासाठी सध्या केवळ प्रकल्प संचालक जीवन सोनवणे हेच कार्यरत आहेत.दोन वर्षात पूर्ण होणार प्रकल्पया प्रकल्पासंदर्भात दाखल याचिकेवर उत्तर सादर करताना मनपाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात असे आश्वासन दिले आहे की, या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार असून, दोन वर्षात काम पूर्ण करण्यात येईल.सहा आठवड्यात सुरू होणार कामनितीन गडकरी यांनी गुरुवारी एस्सेलचे सीईओ संदीप चमोनिया व अध्यक्ष कमल माहेश्वरी यांना स्पष्टपणे सांगितले की, प्रकल्पाचे काम तातडीने सुरू झाले नाही तर करार रद्द करून दुसऱ्या कंपनीला काम सोपविले जाईल. एस्सेलच्या अधिकाऱ्यांनी चार ते सहा आठवड्यात काम सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे. माहेश्वरी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, प्रकल्पाचे काम सुरू आहे. कार्यालयसुद्धा सुरू आहे. आता कामाला गती देण्यात येईल. मनपा आयुक्तांनाही याची माहिती देण्यात आली आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीelectricityवीज