शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 10:03 IST

निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.

ठळक मुद्देवकिलांनीच काढले फोटोकोणाला मतदान केले हे स्पष्ट दिसते

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये राज्यघटनेतील गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी अशी घटना घडली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीविषयी सावधान होते. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले होते. निवडणूक कक्षातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. परंतु, मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली.नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे.छायाचित्रातील मतपत्रिकेत मतदानछायाचित्रातील मतपत्रिकेमध्ये संबंधित वकिलाने जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल (नागपूर) यांना पहिल्या पसंतीचे, अ‍ॅड. शाहेनशाह शाहनवाज काझी (औरंगाबाद) यांना सोळाव्या पसंतीचे तर, अ‍ॅड. सुनील लाचरवार (नागपूर) यांना बाराव्या पसंतीचे मत दिले असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे अनेक वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेची फोटोग्राफी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

चौकशी केली जाईलवकील मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना मतदार वकील मतदान कक्षात मोबाईल घेऊन गेले असतील तर, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. चौकशीनंतर हे प्रकरण न्यायाधिकरणासमक्ष सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक निरीक्षण समितीचे सदस्य अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक