शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

बार कौन्सिल निवडणुकीत मतपत्रिकांची फोटोग्राफी; नियमांना दाखविली केराची टोपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 10:03 IST

निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.

ठळक मुद्देवकिलांनीच काढले फोटोकोणाला मतदान केले हे स्पष्ट दिसते

राकेश घानोडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कायद्याच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या बार कौन्सिल आॅफ महाराष्ट्र अ‍ॅन्ड गोवाच्या निवडणुकीमध्ये राज्यघटनेतील गुप्त मतदानाच्या तरतुदीला धक्का पोहोचविणारी व लोकशाहीला तडा देणारी अशी घटना घडली आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी गेलेल्या वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढून घेतले आहेत. त्या फोटोवरून वकिलांनी कुणाला कोणत्या पसंतीचे मतदान केले, हे दिसून येत आहे. या गैरप्रकारामुळे कौन्सिलची निवडणूक अडचणीत येणार आहे.कौन्सिलच्या २५ जागांसाठी बुधवारी निवडणूक झाली. यावेळची निवडणूक विविध कारणांनी वादग्रस्त ठरल्यामुळे कौन्सिल प्रत्येक गोष्टीविषयी सावधान होते. निवडणुकीचे कामकाज पाहण्यासाठी न्यायालय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यापूर्वी विधिज्ञ संघटनांच्या सदस्यांकडे ही जबाबदारी राहात होती. परंतु, वाद टाळण्यासाठी त्यांना निवडणूक व्यवस्थेपासून लांब ठेवण्यात आले होते. निवडणूक कक्षातील अनधिकृत हालचाली रेकॉर्ड करून संबंधितावर आवश्यक कारवाई करता यावी, यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. तसेच, मतदान कक्षामध्ये मोबाईल नेण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. वकिलांना मतदान कक्षात प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्याकडील मोबाईल निवडणूक कर्मचाऱ्यांकडे जमा करायचे होते. परंतु, मतदार वकील व निवडणूक कर्मचाऱ्यांनी या नियमाला केराची टोपली दाखविली.नागपूरमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठ आणि जिल्हा व सत्र न्यायालयात मतदान केंद्रे ठेवण्यात आली होती. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे. या दोन्ही ठिकाणी वकिलांनी मोबाईल सोबत नेऊन मतदान केले. त्यांनी कौन्सिलचे निर्देश पाळले नाहीच, पण निवडणूक कर्मचाऱ्यांनीही त्यांना मोबाईल जमा करण्यास सांगण्याची तसदी घेतली नाही. न्यायदान व्यवस्थेत रोज कार्य करणाऱ्या या दोन्ही घटकांनी नियमाची पायमल्ली केली. काही वकिलांनी त्याही पुढे जाऊन पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेचे मोबाईलने फोटो काढले. त्या फोटोच्या आधारे उमेदवारांसोबत आर्थिक व अन्य विविध प्रकारचे व्यवहार केले जातील, असा संशय विधी वर्तुळात व्यक्त केला जात आहे.छायाचित्रातील मतपत्रिकेत मतदानछायाचित्रातील मतपत्रिकेमध्ये संबंधित वकिलाने जिल्हा विधिज्ञ संघटनेचे माजी अध्यक्ष सुदीप जयस्वाल (नागपूर) यांना पहिल्या पसंतीचे, अ‍ॅड. शाहेनशाह शाहनवाज काझी (औरंगाबाद) यांना सोळाव्या पसंतीचे तर, अ‍ॅड. सुनील लाचरवार (नागपूर) यांना बाराव्या पसंतीचे मत दिले असल्याचे दिसून येत आहे. अशाप्रकारे अनेक वकिलांनी पसंती क्रमांक नोंदविलेल्या मतपत्रिकेची फोटोग्राफी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

चौकशी केली जाईलवकील मतदारांना मतदान कक्षात मोबाईल घेऊन जाण्यास सक्त मनाई करण्यात आली होती. निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. असे असताना मतदार वकील मतदान कक्षात मोबाईल घेऊन गेले असतील तर, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून कायद्यानुसार पुढील कार्यवाही केली जाईल. तक्रारींवर निर्णय घेण्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्यात आले आहे. चौकशीनंतर हे प्रकरण न्यायाधिकरणासमक्ष सादर केले जाईल, अशी प्रतिक्रिया निवडणूक निरीक्षण समितीचे सदस्य अ‍ॅड. श्यामसुंदर दांगट यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Electionनिवडणूक