शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2022 21:11 IST

Nagpur News मागील काही काळापासून विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात पुढाकार घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांचे नाणारसाठी मतपरिवर्तन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ठळक मुद्देगडकरींच्या नागपूरसाठी पुढाकारानंतर राज्य शासनाकडून नाणारसाठी मतपरिवर्तन?

नागपूर : रत्नागिरीतील नाणार प्रकल्पाच्या विरोधातील स्थानिकांच्या आंदोलनाला साथ देत शिवसेनेने नाणार प्रकल्प जाणार अशी भूमिका घेतली होती. त्यामुळे नाणार येथील रिफायनरी प्रकल्प शिवसेनेच्या विरोधामुळे बारगळला होता. मात्र आता या प्रकल्पासाठी राज्य शासनाने सकारात्मक संकेत दिल्याचे चित्र आहे. दुसरीकडे मागील काही काळापासून विदर्भात पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स व रिफायनरी उभारण्यासाठी राजकीय प्रयत्न सुरू झाले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यात पुढाकार घेतल्यानंतर शिवसेना नेत्यांचे नाणारसाठी मतपरिवर्तन होत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

समुद्रकिनारा नसेल तरी पेट्रोकेमिकल रिफायनरी उभारली जाऊ शकते

या प्रकल्पासाठी मुबलक जमीन उपलब्ध असलेला विदर्भ हा चांगला पर्याय ठरू शकतो व याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना पत्र लिहिले होते. गडकरींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनादेखील पत्र लिहून राज्य शासनाने नागपूरसाठी पुढाकार घ्यावा, अशी विनंती केली होती. देशातील काही प्रकल्पांतून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे एकूण स्थिती व मागणीचा विचार करता रत्नागिरीपेक्षा नागपुरातच पेट्रोलियम कॉम्प्लेक्स-रिफायनरी व्यवहार्य असल्याचा दावा या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. सर्वच बाबींचा विचार करता रत्नागिरीऐवजी नागपूरचाच विचार झाला पाहिजे. चुकीच्या ठिकाणी असे मोठे प्रकल्प केवळ राजकीय कारणांसाठी टाळले पाहिजेत, असे मत ‘वेद’चे उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी यांनी व्यक्त केले.

पश्चिम किनारपट्टीवर अगोदरपासूनच खतांचे युनिट्स

रत्नागिरी आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्ये अनेक मोठ्या खतांचे युनिट्स आहेत. ज्यात डीएपी, युरिया, अमोनियम नायट्रेट आणि इतर प्रकारांची जास्तीतजास्त श्रेणी तयार केली जाते. येथे नैसर्गिक वायू, सल्फर, रॉक फॉस्फेट ही रिफायनरीची उपउत्पादने आहेत. गोवा, गुजरातसह पश्चिम किनारपट्टीवर अशी अनेक युनिट्स आहेत.

विदर्भामुळे लॉजिस्टिक खर्चात बचत होईल

विदर्भ आणि मध्य भारत अनेक दशकांपासून रिफायनरीच्या उपउत्पादांच्या लांब पल्ल्याच्या खरेदीवर पूर्णपणे अवलंबून आहे. त्यामुळे दळणवळण व लॉजिस्टिक खर्चात प्रचंड निधी जातो. रिफायनरीमुळे विदर्भात खतांच्या संपूर्ण श्रेणींचे उत्पादन झाल्यास शेतकरी व सरकार दोघांचाही खर्च वाचेल. तसेच अनुदानाचा बोजादेखील कमी होईल.

मध्य भारतालादेखील फायदा होईल

विदर्भात रिफायनरीची स्थापना झाली तर छत्तीसगड, मध्य प्रदेशसह संपूर्ण मध्य भारताला फायदा होईल. शिवाय या भागाचा आयातीचा खर्चदेखील कमी होईल. विदर्भात रिफायनरीसह पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्स आले तर त्याचा फायदा संरक्षण क्षेत्रालादेखील होऊ शकतो.

सहज दळणवळणाची सुविधा

रत्नागिरीच्या तुलनेत नागपूर दळणवळणाच्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरेल. रस्ते, रेल्वे, विमान मार्गाने नागपूर देशाच्या सर्व भागांशी जोडले गेले आहे. शिवाय विदर्भात विविध ठिकाणी मोठमोठी गोदामे असून, ड्रायपोर्टचादेखील फायदा होईल. रत्नागिरीतून देशाच्या पूर्व, उत्तर, दक्षिण भागात उत्पादने पोहोचविण्यास वेळ लागेल व त्यातून खर्च वाढेल.

टॅग्स :Petrolपेट्रोल