शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

ईव्हीएम घोळावर हायकोर्टात याचिका

By admin | Updated: March 2, 2017 21:00 IST

ईव्हीएम घोळावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक नव्याने घेण्यात यावी

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 02 - ईव्हीएम घोळावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणूक नव्याने घेण्यात यावी व महापौरपदाच्या निवडणुकीवर स्थगिती देण्यात यावी अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. ही याचिका येत्या ९ मार्च रोजी न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व इंदिरा जैन यांच्या न्यायपीठासमक्ष सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.
राकेश मोहोड असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते सामाजिक कार्यकर्ते आहेत. महानगरपालिका निवडणुकीनंतर ‘ईव्हीएम’वरून विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस यश मिळाले असून अन्य पक्षांना अपेक्षेनुसार आकडा गाठता आलेला नाही. काही उमेदवारांनी त्यांना हमखास म्हणता येतील अशीही मते मिळाली नसल्याचा दावा केला आहे. सर्वांचा रोष ‘ईव्हीएम’वर आहे. निवडणुकीत सदोष ‘ईव्हीएम’ वापरून मतांची पळवापळवी झाल्याचा आरोप केला जात आहे. निवडणुकीत प्रभागातील चार विभागांकरिता वेगवेगळ्या ‘ईव्हीएम’ ठेवण्यात आल्या नाहीत. एका विभागाचे उमेदवार संपल्यानंतर दुसºया विभागातील उमेदवारांची यादी ‘ईव्हीएम’वर लावण्यात आली होती. याद्यांचा रंग वेगवेगळा होता. असे असले तरी असंख्य मतदारांचा यामुळे गोंधळ उडाला. मतदान कसे करावे हेच त्यांना कळले नाही. अनेकांनी निवडणूक अधिकाºयांच्या मदतीने मतदान केले. आपण दिलेले मत आपल्याला हव्या त्याच उमेदवाराच्या खात्यात गेले हे समजायला काहीच मार्ग नव्हता. हा सर्व गोंधळ पाहता याचिकाकर्त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. रोहण छाब्रा कामकाज पाहणार आहेत.
 
‘व्हीव्हीपॅट’ आवश्यक
सर्वोच्च न्यायालयाने सुब्रमण्यम स्वामी यांच्या प्रकरणावरील निर्णयात ‘ईव्हीएम’मध्ये ‘व्हीव्हीपॅट’(व्होटर व्हेरिफाईड पेपर आॅडिट ट्रेल) प्रणाली वापरण्याचा आदेश दिला आहे. परंतु, निवडणूक आयोगाने या आदेशावर अद्यापही अंमलबजावणी केली नाही. महानगरपालिका निवडणुकीत वापरण्यात आलेल्या ‘ईव्हीएम’मध्ये ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली नव्हती. त्यामुळे मतदारांना त्यांनी टाकलेले मत संबंधित उमेदवाराच्याच खात्यात जमा झाले हे कळू शकले नाही. ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली असलेल्या ‘ईव्हीएम’मधून मतदाराला मतदान केल्यानंतर पावती मिळते. त्यातून आपण दिलेले मत योग्य उमेदवाराच्या खात्यात जमा झाले किंवा नाही हे कळते. ‘व्हीव्हीपॅट’ प्रणाली वापरण्यात आली नसल्यामुळे महानगरपालिका निवडूक अवैध ठरते. ही निवडणूक पारदर्शीपणे झाली असे म्हणता येणार नाही. परिणामी निवडणूक रद्द करणे आवश्यक आहे असेही याचिकेत नमूद करण्यात आले आहे.