शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
2
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
3
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
4
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
5
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
6
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
7
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
8
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
9
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
10
भाजपाला धक्का, महादेव जानकरांची काँग्रेससोबत आघाडी, एकत्र निवडणूक लढवणार  
11
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
12
'धुरंधर'च्या यशावर रणवीर सिंह गप्प का? सिनेमातील 'डोंगा'नेच दिली प्रतिक्रिया; म्हणाला...
13
Taurus Yearly Horoscope 2026: वृषभ राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल, प्रतिभा आणि संयमाची कसोटी; 'या' वर्षात कुटुंबाची साथ ठरेल यशाची गुरुकिल्ली!
14
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
15
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
16
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
17
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
18
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
19
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
20
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त वक्तव्याविरुद्धची याचिका फेटाळली

By admin | Updated: July 24, 2014 00:54 IST

प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रसारण व प्रकाशनाविरुद्ध दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर

नागपूर : प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष व सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मार्कंडेय काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्याचे प्रसारण व प्रकाशनाविरुद्ध दाखल रिट याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी फेटाळून लावली.अ‍ॅड. उदय दास्ताने यांनी ही याचिका केली होती. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व सुनील शुक्रे यांनी प्रकरण निकाली काढताना भारतीय राज्यघटनेने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले असून याचिकेत काहीच गुणवत्ता नसल्याचे मत व्यक्त केले. काटजू यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरील कोणताही कार्यक्रम किंवा बातमीचे प्रसारण, पुन:प्रसारण व प्रकाशनाला प्रतिबंध करण्यात यावा, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली होती. न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला. सर्वोच्च न्यायालयाचे तीन निवृत्त सरन्यायाधीश आर. सी. लाहोटी, वाय. के. सबरवाल व के. जी. बाळकृष्णन यांनी तत्कालीन मनमोहनसिंग सरकारच्या दबावाखाली भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मद्रास उच्च न्यायालयाच्या एका अतिरिक्त न्यायाधीशाला सेवेत कायम ठेवण्यासाठी अनुचित तडजोडी केल्याचा आरोप काटजू यांनी २० जुलै रोजी एका राष्ट्रीय वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला होता. याशिवाय त्यांनी ‘सत्यम बृयत - जस्टीस काटजू’ या ब्लॉगवर ‘मद्रास उच्च न्यायालयात भ्रष्टाचारी न्यायमूर्ती कसे कायम राहिले’ या मथळ्याखाली लेख लिहिला आहे. मुलाखत प्रसारित होताच देशभर खळबळ माजली. अन्य वृत्तवाहिन्यांनीही यासंदर्भात बातम्या प्रसारित करायला सुरुवात केली. तज्ज्ञांना बोलावून चर्चा घडवून आणल्या गेल्या. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांमध्ये बातम्या व तज्ज्ञांचे लेख प्रकाशित झाले. २२ जुलै रोजी विधीतज्ज्ञाच्या प्रतिक्रिया दाखविण्यात आल्या. तत्कालीन कायदे मंत्र्यांनीही टीव्ही वाहिन्यांवर आपले विचार व्यक्त केले. यामुळे केबल टेलिव्हिजन नेटवर्क कायद्याच्या कलम ५ मधील तरतूदींचे उल्लंघन झाल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला होता. काटजू यांच्या विधानामुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नागरिकांच्या मनातील न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलीन झाली आहे. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालय, इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग सेंटर व प्रेस कौन्सिल आॅफ इंडिया यांना हा विषय सक्षमपणे हाताळता आला नाही. त्यांना या कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवता आले नाही, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे होते. अ‍ॅड. उदय दास्ताने यांनी स्वत:ची बाजू मांडली, तर प्रतिवादींतर्फे एएसजीआय रोहित देव यांनी कामकाज पाहिले.(प्रतिनिधी)