शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
आजचे राशीभविष्य, २७ ऑक्टोबर २०२५: धनलाभ योग, ठरवलेली कामे होतील; यशाचा-प्रसन्न दिवस
3
Video - अग्निकल्लोळ! रेस्टॉरंटमध्ये भीषण आग; एकामागून एक ४ सिलिंडरचा स्फोट, महिलेचा मृत्यू
4
राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा फेरा, हातातोंडाशी आलेल्या पिकांवर मारा; जोर वाढण्याची शक्यता, चार-पाच दिवस सावट
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
6
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
7
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
8
गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकासास पूर्ण मुभा; कोर्टाच्या निर्णयामुळे संभ्रम दूर, जुने परिपत्रक मागे घेण्याचे आदेश
9
११३९ कोटी कधी मिळणार? १६ लाख शेतकरी अजून बँकांच्या केवायसीत अडकलेले
10
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
11
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
12
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
13
एमबीबीएस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उडाला गोंधळ; निकालापूर्वीच बीएएमएस, बीएचएमएस प्रवेश फेरी सुरू
14
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
15
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
16
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
17
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
18
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
19
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
20
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा

निवडणूक कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्र बाळगण्यास मनाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 23:43 IST

देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.

ठळक मुद्देसह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ जाहीर झाली असून नागपूर शहरात ११ एप्रिल २०१९ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. ही निवडणूक नि:पक्ष, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. त्यासाठी निवडणूक कालावधीत शस्त्रे अथवा हत्यारे, दारुगोळा यांचा गैरवापर होऊन कोणताही अनुचित प्रकार घडू नये, मानवी जीवित हानी किंवा सुरक्षिततेला व मालमत्तेला धोका पोहचू नये, सार्वजनिक शांतता भंग होऊ नये यासाठी शस्त्रास्त्र, हत्यारे, दारुगोळा याचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असल्यामुळे असे शस्त्रास्त्र सार्वजनिक ठिकाणी जवळ बाळगण्यास, धारण करण्यास तसेच वाहून नेण्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (अ) अन्वये सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यावर बंदी घालण्यात आली असल्याचे सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.या आदेशातून बंदोबस्तासाठी असणारे अधिकारी, कर्मचारी तसेच बँका व सार्वजनिक मालमत्तेच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या सुरक्षा कर्मचारी यांना वगळण्यात आले आहे. बँका अथवा सार्वजनिक संस्था यांच्याकडील सुरक्षा रक्षकाकडून निवडणूक कालावधीमध्ये त्यांच्याकडील शस्त्रांचा/हत्यारांचा गैरवापर होणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबंधित बँक, संस्थेच्या अधिकाऱ्यावर राहील, असेही सह पोलीस आयुक्तांनी कळविले आहे.हा मनाई आदेश ज्या समाजास त्यांच्या दीर्घकालीन स्थाई कायदा रुढी व परंपरा यानुसार शस्त्र बाळगण्याचा अधिकार आहे त्या समाजाला लागू असणार नाही. अशा समाजातील व्यक्तीचा हिंसाचारात सहभाग आढळून आल्यास आणि कायदा व सुव्यवस्थेस बाधा आल्यास, निवडणूक शांततेच्या मार्गाने पार पडण्यास अडथळा निर्माण झाल्यास अशा व्यक्तींची शस्त्रास्त्र अडकवून ठेवण्याचा प्रशासनास अधिकार राहील. हा आदेश २७ मे २०१९ पर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये करावाईस पात्र ठरतील, असेही सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम यांनी कळविले आहे.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpolice commissioner office Nagpurपोलीस आयुक्त कार्यालय