शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

विजेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:09 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रेवराल : माैदा तालुक्यातील बहुतांश गावांत वादळामुळे विजेचे खांब व तारांची पडझड झाली. परंतु याकडे महावितरणच्या ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रेवराल : माैदा तालुक्यातील बहुतांश गावांत वादळामुळे विजेचे खांब व तारांची पडझड झाली. परंतु याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष न देता केवळ थातूरमातूर दुरुस्ती केल्याचे दिसून येत आहे. वादळामुळे तुटून पडलेल्या जिवंत विद्युत तारेला स्पर्श झाल्याने खंडाळा शिवारात गाईचा मृत्यू झाला. सुदैवाने गाईचा मालक थाेडक्यात बचावला. त्यामुळे ग्रामीण भागातील विजेच्या देखभाल-दुरुस्तीची कामे तत्काळ करा, अन्यथा आंदाेलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

खंडाळा व परिसरातील गावात १० मे राेजी चक्रीवादळामुळे विद्युत तारा तुटल्या. दरम्यान, दुसऱ्या दिवशीही तुटून पडलेल्या तारांमध्ये वीजप्रवाह सुरू हाेता. शेतशिवारात चराईसाठी गेलेल्या गाईचा जिवंत तारेला स्पर्श हाेऊन मृत्यू झाला. यात गाईचा मालक संदेश राजू बर्वे हा थाेडक्यात बचावला. परिसरात थाेडादेखील वादळ वारा आल्यास वीजपुरवठा खंडित हाेताे. विद्युत समस्या व महावितरणच्या भाेंगळ कारभारामुळे या भागातील गावकरी त्रस्त झाले आहेत. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष पुरवून चाचेर, खंडाळा, तारसा परिसरात वीजपुरवठा करणारे विद्युत खांब व तारांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात यावी. तसेच गाईच्या मृत्यूची नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा महावितरणविराेधात आंदाेलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.