शहरं
Join us  
Trending Stories
1
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
2
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
3
सार्वजनिक निधीचा वापर नेत्यांच्या पुतळ्यांसाठी करता येणार नाही- सर्वोच्च न्यायालय
4
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
5
PAK v SL: २१८० दिवस... श्रीलंका त्याचाच फायदा घेणार, पाकिस्तान आज आशिया कपमधून बाहेर होणार?
6
कोणी बिजनेसवुमन तर कोणी बॉलिवूड स्टार! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या नवदुर्गा काय करतात?
7
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
8
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
9
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
10
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
11
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
12
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
13
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
14
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
15
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
16
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
17
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
18
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
19
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
20
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान

चीनविरोधात जनतेने आर्थिक युद्ध लढावे - गोविंदाचार्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2017 20:41 IST

भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य यांनी केले.

नागपूर, दि. 9 - भारताच्या सामरिक सीमेत घुसखोरी करू पाहणा-या चीनने देशात आर्थिक आक्रमण केले आहे. अशा स्थितीत देशाला स्वावलंबी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे सीमेवर जवान लढतात, त्याचप्रमाणे प्रत्येक नागरिकाने चिनी वस्तूंचा बहिष्कार करून आर्थिक युद्धात आपले योगदान दिले पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे संस्थापक के.एन.गोविंदाचार्य यांनी केले. आॅगस्ट क्रांती दिनाचा मुहूर्त साधून त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय पातळीवरील चिनी वस्तूंच्या विरोधातील आंदोलनाचा शंखनाद झाला. यावेळी ते बोलत होते. मानस चौकातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याजवळ चिनी वस्तूंची होळी करून बहिष्कार आंदोलनाची सुरुवात झाली. यावेळी स्वदेशी जागरण मंचच्या विचार विभागाचे राष्ट्रीय प्रमुख अजय पत्की, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक पवन श्रीवास्तव, राष्ट्रीय संघटनमंत्री बसवराज पाटील, राष्ट्रीय महामंत्री प्रदीप नागपूरकर प्रामुख्याने उपस्थित होते. चीनने केलेले आर्थिक आक्रमण परतवून लावण्याची जनतेचीदेखील जबाबदारी आहे. सध्या चीनविरोधात जे वातावरण निर्माण झाले आहे, ते सरकारसाठीदेखील साहाय्यकारक आहे. मात्र चीनला प्रत्युत्तर द्यायचे असेल तर अगोदर तेथील नेते व नागरिकांची मानसकिता, संस्कृती, मनोविज्ञान इत्यादींचा सखोल अभ्यास झाला पाहिजे. पोखरण स्फोटांनंतर अमेरिकेने भारताचा अभ्यास करण्यासाठी विशेष संस्था स्थापन केली होती. त्याच धर्तीवर भारतानेदेखील ‘इंडियन इन्स्टिट्यूट फॉर चायनीज स्टडीज्’ सुरू करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले. राममंदिराच्या मुद्यावर गोविंदाचार्य यांनी भाष्य केले. राममंदिर बनावे ही देशातील जनतेची भावना आहे व तो श्रद्धेशी जुळलेला विषय आहे. याबाबत संवाद, कायदा यांचा आधार घेऊन केंद्राने पुढाकार घेतला पाहिजे. गोहत्याबंदी व राममंदिर या मुद्यांवर सरकार सत्तेत आले. आता जनादेशाचा कौल लक्षात घेत यांच्या अंमलबजावणीसाठी कायदा करण्याचीदेखील तयारी ठेवली पाहिजे, असे ते म्हणाले.केंद्राबाबत सावध भुमिका... एकेकाळी भाजपात असलेल्या गोविंदाचार्य यांनी नोटाबंदीनंतर केंद्र शासनावर टीकेची तोफ डागली होती. मात्र चीनच्या मुद्यावर त्यांनी सावध पवित्रा घेतला. डोकलाम मुद्यावर केंद्र शासनाची भूमिका संतुलित आहे असे ते म्हणाले. नोटाबंदीच्या वेळी केंद्राची योग्य तयारी नव्हती. मात्र जीएसटीसंदर्भात एक ठोस भूमिका रहावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.