शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

चेहऱ्यावरचे मास्क गेले भुर्रर्र, कोरोनाची उडवली जातेय टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 10:30 IST

गेल्या दीड वर्षात घरादारात प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर असलेले मास्क आता गायब झाले आहेत. मास्क न वापरण्याची कारणेही मजेदार आहेत. सगळेच बिनधास्त वावरताना दिसतात.

ठळक मुद्देनिर्बंध केवळ कागदावरचबाजारात, सोहळ्यात नागरिक बिनधास्त

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमणाचा कहर सगळ्यांनीच अनुभवला आहे. तिसऱ्या लाटेची भविष्यवाणी म्हणा, संकेतही दिले जात आहेत. मात्र, या धास्तीची, कोरोना प्रोटोकॉलची आणि घ्यावयाच्या काळजीची टर उडवताना बहुतांश नागरिक दिसत आहेत. गेल्या दीड वर्षात घरादारात प्रत्येक नागरिकाच्या चेहऱ्यावर असलेले मास्क आता गायब झाले आहेत. मास्क न वापरण्याची कारणेही मजेदार आहेत. सगळेच बिनधास्त वावरताना दिसतात. जणू कोरोना नावाच्या विषाणूचे निर्दालन झाल्याचीच भावना अनेकांच्या चेहऱ्यावर दिसून येते.

मास्क ना रस्त्यावर, ना बाजारात

महाल, इतवारी - महाल ही शहरातील सर्वात जुनी बाजारपेठ आहे, तर नजीकच मध्य भारताची कुबेरपेठ म्हणून ओळखला जाणारा इतवारी बाजार आहे. बाजारपेठा अनलॉक झाल्यापासून ग्राहकांनी ही पेठ खुलून उठली आहे. येथे येणाऱ्या एखाद् दुसऱ्या ग्राहकाच्याच चेहऱ्यावर मास्क दिसतो. इतर सर्व ग्राहक बिनधास्त फिरताना दिसतात. विक्रेत्यांच्या चेहऱ्यावरही मास्क अभावानेच दिसतो. सॅनिटायझरचा वापर तर जवळपास संपुष्टातच आल्याची स्थिती आहे.

सीताबर्डी - ही शहरातील सर्वात व्यस्त अशी बाजारपेठ आहे. रस्त्यावरील विक्रेत्यांपासून ते आलिशान पॉश दुकानांची येथे गर्दी आहे. काय हवे ते सर्व या बाजारपेठेत मिळते. त्यामुळे, शहरातील दूरवरून येणाऱ्या ग्राहकांची संख्याही येथे मोठी आहे. फिजिकल डिस्टंसिंगचा फज्जा उडतो, याचे उदाहरण बघायचेच झाले, तर सीताबर्डी बाजारपेठेशिवाय दुसरे ठिकाण नाही. मास्क, सॅनिटायझर, कशाचाच इथे वापर होताना दिसत नाही.

सक्करदरा - सक्करदरा बाजारपेठेत सोमवारी पेठेतील नित्य भरणारा भाजीबाजार, तिरंगा चौक येथील चहा-नाश्त्याचे ठेले आणि कापड, किराणा दुकानदार सर्व आहेत. सकाळपासून ते उत्तररात्रीपर्यंत ही बाजारपेठ ग्राहकांनी फुल्ल असते. येथे येणाऱ्या शंभरातील दहा जणांच्या चेहऱ्यावरच मास्क दिसून येतो.

कारवाईचा ससेमिरा झाला कमी

लॉकडाऊनमध्ये महानगरपालिकेच्या कोविड पथकाकडून नागरिकांवर टेहळणी ठेवली जात होती. प्रथम ५०० रुपये आणि नंतर एक हजार रुपयाचा दंडही ठोठावण्यात येत होता. अनलॉक झाल्यापासून मात्र कारवाई थंडावल्याचे दिसून येते. त्याचे कारण म्हणजे आता नागरिकही कंटाळले असून, पथकाला प्रत्युत्तर द्यायला लागले आहेत. अनेक सभागृहातील सोहळ्यांमध्ये कारवाईचा इशारा दिल्यावरही आयोजकांकडून दुर्लक्ष केले जात आहे. लोक ऐकत नाहीत, तर आम्ही काय करू, असे उत्तर आयोजकांकडून पथकातील सदस्यांना दिले जाते.

श्वास घ्यायला होतो त्रास

आता हिवाळ्याचे दिवस आहेत. गारठा वाढतो आहे आणि त्यामुळे चेहऱ्यावर मास्क असला, तर श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणून मी मास्क वापरत नाही. कारवाई होऊ नये म्हणून मास्क चेहऱ्यावर टांगलेला असतो.

- एक तरुण

कुणीच वापरत नाही, तर मीच कशाला?

मी मास्क बाळगते. पण, बाहेर कुणीच मास्क वापरताना दिसत नाही. म्हणून मी सुद्धा वापरत नाही. शिवाय, मास्कमुळे कान दुखायला लागले आहेत. पर्समध्ये मास्क ठेवते. विचारणा झालीच तर लगेच मास्क काढते.

- एक तरुणी

चष्म्यावर वाफ जमा होते

माझे वय ६९ आहे आणि चष्म्याशिवाय बाहेर पडूच शकत नाही. हिवाळ्याचे दिवस असल्याने तोंडातून वाफ निघत असते. मास्कमुळे ती वाफ चष्म्यावर येते. हा त्रास सतत असतो. म्हणून मास्क वापरणे टाळतो. पोलिसांनी हटकल्यावर त्यांना हेच कारण सांगतो.

- एक ज्येष्ठ नागरिक

टॅग्स :Healthआरोग्यCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्या