शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक : चंद्रशेखर बावनकुळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 23:03 IST

अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिनकस्तूरचंद पार्क येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे सर्व तातडीच्या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. जनतेनेही दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. 

ऐतिहासिक कस्तूरचंद पार्कवर महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ वा वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रध्वज वंदन करून सशस्त्र पोलीस दलाच्या पथसंचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. त्यानंतर जनतेला महाराष्ट्र दिनाच्या तसेच जागतिक कामगार दिनाच्या शुभेच्छा देताना चंद्र्रशेखर बावनकुळे बोलत होते.विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यावेळी उपस्थित होते.दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती देताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी लोकसहभागातून विविध जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. काटोल, नरखेड या भागात लोकसहभागासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून कामांना सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तात्काळ उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत असल्याची ग्वाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली.राज्याच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये शेतकरी उद्योजक तसेच विविध उद्योगांमध्ये प्रत्यक्ष काम करणाऱ्या सर्व कामगार बंधूंचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. लोकसभा निवडणुकीचा उत्सव नुकताच साजरा झाला असून, जनतेने लोकशाहीच्या या उत्सवामध्ये उत्साहात सहभागी होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले आहे. जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची प्रक्रिया यशस्वीपणे हाताळल्याबद्दल जिल्हा प्रशासन व पोलिसांचे अभिनंदन केले.यावेळी महापौर नंदा जिचकार, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खा. डॉ. विकास महात्मे, सहपोलीस आयुक्त रवींद्र कदम यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक आणि जिल्हा व पोलीस प्रशासनाचे विविध अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक साळीवकर यांनी केले.पोलीस पथकाच्या परेडने वेधले लक्ष 
यावेळी परेड कमांडर सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या नेतृत्वाखाली विविध पोलीस पथकाचे संचलन झाले. त्यांच्यासोबत सेकंड इन कमांडर राखीव पोलीस उपनिरीक्षक त्र्यंबक प्रधान तर राज्य राखीव पोलीस बल गट क्र. ४ चे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोर्ला, गडचिरोलीचे दिलीप तरारे, गोंदियाचे अरुण धुळसे, नागपूर शहर सशस्त्र पोलीस दल शशिकांत नागरगोजे, नागपूर ग्रामीणचे सहायक पोलीस निरीक्षक दिनेश गावंडे, लोहमार्ग पोलिसचे विनोद तिवारी, नागपूर शहर (महिला) पोलिसचे उपनिरीक्षक विजयकुमार पुंडे, राज्य आपत्ती प्रतिसाद पथकाचे घनश्याम दुजे, वाहतूक शाखेचे जितेंद्र्र ठाकूर, होमगार्ड जिल्हा समादेशकचे प्लाटून कमांडर रोशन गजभिये आणि संजीवनी बोदेले, बँड पथकाचे प्रदीप लोखंडे, रामू ससाने, संजय पंचभुते, चंद्रकांत मानवटकर, सुरेश सनेश्वर, श्वान पथक ‘जीवा’सह शिवशंकर जोशी, ‘वज्र’चे वीरेनशहा खंडाते, बॉम्ब नाशक पथकाचे विजय मैंद, वरुण वॉटर कॅनॉनचे संतोष श्रीवास, अग्निशमन दलाचे विनोद जाधव आणि सामान्य रुग्णालयाच्या डॉ. रोहिना शेख यांचा पथसंचलनात सहभाग होता.

टॅग्स :Maharashtra Dayमहाराष्ट्र दिनguardian ministerपालक मंत्रीKasturchand Parkकस्तूरचंद पार्क